Tuesday, December 26, 2006

सिद्धगड

सिद्धगडाचा ट्रेक , पुढील काही फोटोमधुन गडाचं आणि गडाकडे जाणाऱ्या वाटांचं सौंदर्य वर्णन करण्यास पुरेसे आहेत...


केवळ सौंदर्य शब्दच नाहीत वर्णन करायला !!!!



वाटेवरुन दिसणारा गोरखगड

मागे परततांनाची रम्य संध्याकाळ

Tuesday, December 12, 2006

काही तुकडे

हत्तीची मूर्ती कशी बनवायची?
-सोपं आहे.. दगड घेउन त्यातला हत्तीसारखा न दिसणारा भाग छिन्नीने काढून टाकायचा.

एक सरदारजी बससाठी रांगेत उभा होता. त्याचा क्रमांक चौथा होता.त्याला हवी असलेली बस आली. बस रिकामी होती बर्‍यापैकी. पण सरदारजी बसमधे चढला नाही. मागे सरकला. का?
-बसवर 'दो या तीन..बस्स' लिहीले होते म्हणून.


एकदा हत्ती आणि मुंगी स्कुटरवर जात असतात.
त्याचा अपघात होतो
हत्ती मरतो, पण मुंगी वाचते...
ते कसं काय?
..... कारण तिनी हेलमेट घातलेलं असतं...



केनियामध्ये पोहोण्याचा तलाव बांधला तर त्याचे नाव काय ठेवावे?
"या डुंबा डुंबा"



एकदा एक डास आणि माशी लग्न करतात. त्यांच्या लग्नाला बरेच दिवस होतात पण त्यांना काहिच मूलबाळ होत नाही. का?

.

.

.

.

.

.

कारण ती माशी 'ओडोमॉस' लावून झोपायची .



प्र. : सुईच्या नेढ्यातून हत्ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे
पळापळ करत असेल .. तर त्याला कसं थांबवायचं?
उ. : त्याच्या शेपटीला गाठ मारून !

प्र. : एक माणूस काळा शर्ट , काळी पँट , काळा टाय , काळे मोजे , काळे बूट , काळी टोपी आणि दिसायलाही काळा असा रस्त्यानी चाललेला.. समोरून एक काळी गाडी येते आणि रस्ता ओलांडताना हा माणुस त्या गाडी समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या अग्गदी जवळ येऊन ती गाडी ब्रेक मारून थांबवली जाते.. अग्गदी थोडक्यात तो वाचतो.. रस्त्यावर लाईट वगैरे लावलेले नसतात.. मग हे कसं काय होतं?
उ. : कारण तेव्हा दिवस असतो !

प्र. : एका शर्यतीत एक मुलगा १५० मिनिटातच शेवटाला येतो आणि एक मुलगा मात्र अडीऽऽऽच तासानी कुठे धपापत शेवटाला येतो. तर कोण जिंकतं?
उ : दोघंही. कारण १५० मिनिट = अडीच तास.

प्र. : एक माणूस खूपच बुटका असतो. त्याचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर असतं. तो घरून बाहेर जाताना नेहमीच लिफ्ट वापरायचा पण बाहेरून घरी जायचं म्हटलं तर त्याची गंमत असायची.. ती म्हणजे.. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तो अर्धा भाग लिफ्टनी आणि बाकीचा भाग चालत चालत जायचा.. पण पावसाळ्यात मात्र घरापर्यंत लिफ्टनी जायचा तर असं का?
उ. : त्याची उंची कमी होती .. त्यामुळे त्याला खाली उतरायच्या वेळेस तळमजल्याचं बटन दाबणं जमायचं आणि तो थेट येऊ शकायचा. पण तेच खालून वर जाताना उंचीमुले हात न पुरल्यानी त्याच्या अपेक्षित मजल्याचं बटन दाबता न आल्यानी जेवढा हात पुरेल तेवढं करून ज्या मजल्यापर्यंत जाता येईल तितकं जाऊन तो बाकीचं चालत जायचा.. पण पावसाळ्यात छत्री सोबत असल्यानी त्याला त्याच्या मजल्याचं बटन दाबता येत असल्यानी तो तिथपर्यंत लिफ्ट वापरू शकायचा ! :)




एक माणूस ( तलावात बुडताना): वाचवा, मला पोहता येत नाही; मला पोहता येत नाही.

शेजारुन चाललेला सायकलस्वार चिडतो: काय रे ए, ओरडतो कशाला ? मलाहि पोहता येत नाही, मी ओरडतोय का ?



एकदा एका सुंदर उपवर खेकडीला बघायला एक खेकडा येतो. त्यांची प्रश्नोत्तरे वगैरे होतात. खेकडा पण चांगला असतो. खेकडीला आवडतो. मग शेवटची परिक्षा म्हणून खेकडी खेकड्याला म्हणते, 'चालून दाखव.त्या खांबापर्यंत जा.' खेकडा चालून दाखवतो. अगदी सरळ नाकासमोर चालत जाऊन खांबासमोर थांबतो. खेकडीण त्याला नाकारते. का बरे???
- ती म्हणते 'हा खेकडा दारु पितो.म्हणून सरळ चालतो.' (गृहित: नेहमीची खेकड्याची चाल वाकडी असते.)

Saturday, December 02, 2006

पाडगावकर यांची एक सुंदर कविता

दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !

मंगेश पाडगावकर

Thursday, October 19, 2006

Puzzle

मला फार आवडलेले एक कोडे...

समजा एका जंगलात दोन गुहा आहेत, एक आहे जीवनाची गुहा, आणि दुसरी आहे मृत्युची गुहा. दोन्ही गुहे समोर प्रत्येकी एक रक्षक उभा आहे. या रक्षकांपैकी एक जण केवळ खरेच बोलतो तर दुसरा केवळ खोटेच बोलतो. कल्पना करा की तुम्ही त्या दोघांच्या समोर उभे आहात. तर तुम्हाला त्या दोघांपैकी कुणालाही एक असा प्रश्न (दिशादर्शक)विचारायचा आहे की समोरच्याने तुम्हाला जीवनाच्याच गुहे कडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. लक्षात असु द्या त्यांच्या सवयी, खरे आणि खोटे बोलण्याच्या आणि हे सुद्धा लक्षात असु द्या की तुम्हाला याची कल्पना नाही की त्यातिल कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, पण त्या दोघांना मात्र आपसात याची कल्पना आहे की आपणांपैकी कोण खरे बोलतो आणि कोण खोटे. ...

करा विचार..

...

...
असा प्रश्न की जो दोघांपैकी कुणालाही विचारला तरी उत्तर तेच मिळेल, अर्थात जीवनाच्या गुहेकडे जाणारा मार्ग.. एकच प्रश्न...


विचार सुरु ठेवा,... हा विनोदी प्रश्न नाही हे लक्शात घ्या...




काय नाही जमत म्हणुन कसे चालेल कागद आणि पेन घ्या आणि प्रयत्न करा, ....


ज्या तत्वाच्या आधारे उत्तर येणार आहे ते आपण दहावीच्या वर्गात शिकलो आणि संगणकाच्या जगात याचा फार मोठा वापार होतो...


अजुनही नाही

प्रयत्न करा आणि उत्तर










उत्तर :

तुझ्या शेजारचा मला मृत्युची गुहा म्हणुन कुठली गुहा दाखवेल

प्रयत्न करुन पहा..

Wednesday, October 04, 2006

प्रेरणादायी

प्रिय गुरूजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात ; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.

माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.

त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.

माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.

….अब्राहम लिंकन
रूपांतर - वसंत बापट

Saturday, September 23, 2006

Ekaa Vaakyaat

लग्न म्हणजे असे नाते की जिथे एका व्यक्तीचे नेहमी बरोबर असते आणि दुसऱ्या व्यक्तीला 'नवरा' म्हणतात.

आमचे मांजर चिनी हस्तक आहे, अहो, सारखे 'माओ माओ' असा जप करत असते.
"शेजाऱ्यांवर प्रेम करा"*
- पण पकडले जाऊ नका.

नवरा आणि बायको म्हणजे लिव्हर आणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी कारण.............. लिव्हर खराब तर किडनी लगेच फ़ेल होते आणि किडनी फ़ेल झाली तर...............लिव्हर दुसऱ्या किडनी वर काम चालवत.........

पुरेशी झोप घेतल्याने म्हातारपण टाळत येते म्हणे... विशेषतः गाडी चालवतना.
तुकाराम महाराज म्हणून गेलेत "नावात काय आहे?"

एकदा एका लॉर्डला स्वप्न पडलं की तो हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहे आणि त्याला जाग आली तेव्हा त्याला आढळलं की आपण खरोखरच हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहोत.

१. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.

आपल्या शत्रूंना नेहमी क्षमा करा..त्याने त्यांचा तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही.
काही माणसे जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, काही जेव्हा तिथून जातात तेव्हा.
मला भितींशी बोलायला आवडतं, त्या दुरुत्तर करत नाहीत.
अनुभव हे चुकांना दिलेलं गोड गोंडस नाव आहे.
मी मोह सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.
आत्मचरित्र हा मृत्यूबद्दलची भीती आणखी वाढवणारा साहित्यप्रकार आहे...

नवरा, "लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचे?", बायको, " अशा ठिकाणी जिथे मी कधीही गेले नाही", नवरा, "स्वयंपाकघर कसे वाटते?"

हे औषध दम्यावर अगदी रामबाण उपाय! मी जन्मभर वापरतोय.


दारू म्हणजे हळू हळू मारणारं विष आहे.......

- असूदे की.... इथे घाई कोणाला आहे ?

*********************************************************************************

दोन सरदार बुध्दीबळ खेळत होते.


*********************************************************************************

'मी या घरचा स्वामी आहे' आणि असे विधान करायला माझ्या बायकोची मला परवानगी आहे.

*********************************************************************************
दोन बायका समोरासमोर गप्प बसल्या होत्या.

*********************************************************************************

शेवटी पैसा म्हणजे सर्व काही नाही .....


- व्हीसा आणि मास्टरकार्ड आहेत ना !
*********************************************************************************
जगात एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे......... थांबा हं, जरा आठवून सांगतो......
*********************************************************************************

प्राण्यांवर नेहेमी प्रेम करावं....


- किती चविष्ट असतात ते !
*********************************************************************************
९९% वकीलांच्या वागणुकीमूळे बिचारे बाकीचे वकील बदनाम होतात.
*********************************************************************************
"तुम्ही किती वाजेपर्यंत उघडे असता?" एका मध्यमवयीन स्त्रीने औषधांच्या दुकानात (पुरुष) दुकानदाराला विचारलेला प्रश्न!
*********************************************************************************
जगात यशस्वी होण्याची दोनच सोपी सूत्रं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला माहित असलेलं सारं काही दुसऱ्याला सांगू नका.
*********************************************************************************
आळस हा माणसाचा शत्रु आहे.....

पण माझे आळसावर प्रेम आहे.... का?

कारण ....

माणसाने शत्रुवरहि प्रेम करावे

*********************************************************************************

दोन बटणे असलेल्या विजारीचे एक बटण तुटल्यावर दुसऱ्या बटणावर येते ना, ती "जबाबदारी" !



[COURTSY: INTERNET]

Monday, July 24, 2006

वैराटगड

२२-२३ जुलै ला हरिश्चंद्रगड करायचा असे सर्वानुमते (एकमताने नव्हे) ठरले होते, मात्र मर्फीच्या नियमाला अनुसरुन ठरवल्याप्रमाणे होउ शकले नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी तो बेत टाळावा लागला (यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण तरी सुद्धा निदान एक दिवस तरी सत्कारणी लागावा असा विचार करुन शनिवारी वैराटगडावर जाण्याचे ठरले (हे मात्र एकमताने). सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थनकावर सर्वांनी यायचे असे ठरले होते, त्याप्रमाणे आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले (येथे ताप शब्दावर श्लेष असावा का ?). मग जमलेल्या मंडळींनी वैराटगड की चंदन वंदन या मधुन वैराटगडाला पसंती दिली. आणि कर्नाटक सरकारची सातार्‍याला जाणारी बस पकडली. जोरदार पाउस सुरु होता, आणि वाटेत कात्रज घाटापासुनच आम्हाला निसर्गाची आमच्या वर कृपा होणार हे लक्षात आले. वाटेत तुडुंब भरुन वाहणार्‍या नीरा नदिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.

वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्‍या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्‍यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्‍या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्‍याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्‍या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही.

गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्‍यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो.

मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.

Thursday, June 29, 2006

मेस

'मी कारल्याची भाजी खाणार नाही'
'अरे चांगलं असतं आरोग्याला, शाळेत शिकतोस ना तु हे ' आई
'ते काही असो पण मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी खाणार नाही'
'आता करतोयस नाटकं, मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल'

शेपुट फुटण्याचा काळातला हा संवाद दिवसाआड घरा घरातुन होतच असे. शाळेतले दिवस संपुन कॉलेजची ओढ लावणार्‍या अनेक गोष्टींपैकी मेस हि सुद्ध एक महत्वाची गोष्ट होती. अगोदर कॉलेजच्या निमित्तने आणि नंतर नोकरीच्या निमित्तने मेस या प्रकरणाशी सातत्याने संबध येत गेला. कॉलेजला प्रवेश मिळवणे, रहाण्यासाठी रुम शोधणे वैगरे प्रकार संपले की मग शोध सुरु व्ह्यायचा चांगल्या मेस साठी. कॉलेजचं होस्टेल आणि मेस उपलब्ध असेल तरिही बरीच मंडळि बाहेरच राहणं आणि खाणं पसंत करीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रोफेसरांसमोर दिवस घालवणच जीवावर येतं त्यांच्या समोर जेवण करणं किती जीवावर येत असेल. आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस" तसेच त्यावेळी मित्र समोरासमोर भेटल्यावर विचारले जाणारे प्रश्न दोनच, कुठे जेवतोस आणि कुठे राहतोस.

मेस या गोष्टिचा खाण्याशी जरी बराच जवळचा संबध असला तरी मेस शोधतांना इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष दिल जात असे. कारण अत्यंत चांगलं जेवण देणारी मेस (एखाद दुसरा अपवाद वगळता) मिळणं अशक्य होतं. त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला मेस बदलण हा नित्याचा उपक्रम असे. त्यातुन प्रत्येक मेस ची पाटी 'आमच्याकडे घरच्या सारखे जेवण मिळेल' अशी असल्याने त्या पाटीचा उपयोग फक्त 'इथे मेस आहे' हे समजण्यापुरताच होत असे. मेस मुख्यतः तिथे मिळणार्‍या खाण्या पेक्षा तिच्या मालकावरुन (विशेषतः मालकिणीवरुन) ओळखली जात असते. मालकिणीवरुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे स्वयंपाकाचे खाते त्यांच्याकडेच, आणि अशा बर्‍याच मेस मधुन हिशेब लावण्यापासुन भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे काकुच करत, आणि काकांच काम फक्त चटई टाकणे आणि चटई उचलणे एवढेच असे.जेवण काय मिळते या पेक्षा ते कसे मिळते याकडेच सर्वांचे लक्ष जास्त. उदाहरण द्यायचे झाले तर, आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासुन बराच दुर अंतरावर एक मेस होती, या मेस मधे गर्दी होत असे ती केवळ विशिष्ठ वेळेलाच, आणि ही विशिष्ठ वेळ म्हणजे क्रिकेटची मॅच. त्या काकांना क्रिकेटची एवढी आवड होती की मॅच असलेल्या दिवशी ते आतल्या खोलीतला TV आम्ही जेवायचो त्या हॉल मधे आणुन ठेवत, त्यावेळी Mobile score वैगर फारसे प्रचलीत नसल्यामुळे काकांची ही युक्ती फार काम करत असे, कारण प्रत्येकाला जेवणाच्या quality पेक्षा मॅच महत्वाची वाटत असे. त्यामुळे अधुन मधुन कुठल्या क्रिकेटरने अतिक्रिकेट बद्दल शब्द काढला तर काकांची फार चिडचिड होत असे, कारण याच अतिक्रिकेट मुळे त्यांची मेस जोरात चालत असे.

अर्थात सगळ्याच मेस काही खराब जेवण देत नसत, मला कॉलेजच्या दुसर्‍या वर्षी लाभलेली एक मेस फारच उत्तम जेवण देणार्‍यांपैकी होती. त्या काकु अगदी अगत्याने स्वागत करुन मायेने जेवु वैगरे घालत असत. मात्र त्यांच्या याच अगत्यशीलतेचा फायदा घेउन बर्‍याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले आणि त्यांना मेस बंद करण्यावाचुन इलाज उरला नाही. काही काही मेस वाले तर फारच बेरकी होते, म्हणजे काय की पहिल्या दिवशी जेवयाला गेलो त्यांच्याकडे की अत्यंत उत्तम पद्धतीचे जेवण देणार, आणि चांगले जेवण मिळते म्हणुन तुम्ही पैसे भरलेत की मग त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात. त्यामुळे अशा अनेक मेस एक दोन महिन्यातुनच बदलाव्या लागत. त्या काळात weekends ची आम्ही जेव्हढी वाट पहायचो तेव्हढी आज नाही बघत, याचं मुख्य कारण म्हणजे शनिवारी घरी जायला मिळायचे. आणि घरी गेल्यावर आई ने किंवा आज्जीने जवळ घेउन 'फारच चेहरा उतरला हो आमच्या सोनुचा' एवढं म्हटलं की लगेच आपण जेवणाची ऑर्डर सोडायला मोकळे. पुढे दोन दिवस मात्र आवर्जुन आपल्या आवडत्या भाज्या बनविल्या जायच्या.

मेस मधुन दोन प्रकारांनी जेवण मिळत असे. एक म्हणजे त्यांच्याच घरी जायचे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कडुन डब्बा घेउन आपापल्या रुम वर जावुन जेवायचे. आमची सहसा पसंती दुसर्‍या प्रकाराला असायची, कारण सुज्ञपणाने प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी मेस लावलेली असे, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकत्र येउन त्याचा गोपाळकाला तयार होई. त्यात भर घालत आमचे स्थानीक मित्र, सर्वांनी एकत्र रहायचे या धोरणाला अनुसरुन प्रत्येक जण आपापल्या घरुन जेवणासाठी काहीतरी घेउन येत असे. मग कॉलेजचे सर्व दोस्त, वेगवेगळ्या चवीचे जेवण आणि सोबतीला गप्पा असा सामुदायीक जेवणाचा एक सोहळा साजरा होत असे. अशा अनेक सोहळ्याच्या जन्माला पुरतील एवढ्या आठवणी आहेत. दुसर्‍या प्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात मेसवर जावुन जेवणे हा विकल्प काही विशीष्ठ परिस्थीत निवडला जाई. या विशीष्ठ परिस्थीतीचंच एक उदाहरण सांगयच झालं तर, एकदा एका मेसकडे अचानक गर्दी वाढली आणि सर्वांनीच थेट मेस मधेच जेवणाचा आग्रह सुरु केला, पुढे जाउन याचे कारण लक्षात आले की त्याच मेसला लेडिज हॉस्टेल ची अधिकृत मेस म्हणुन मान्यता मिळाली होती. बाग, कॉलेजचे वाचनालय, वर्ग याच बरोबर मेस हे सुद्धा अनेक प्रेमिकांचे भेटण्याचे ठिकाण होते, आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.

मेसचे नियम हा तर एक फार मोठा संशोधनाचा विषय होउ शकेन. पुणेरी पाट्या आपण बर्‍याच ठिकाणी वाचतो, पण कुठलीही पाटी न लावता मेस मधुन नियम ठरवले जात असत. आमच्या एका मेस मधे नियम होत (आणि तो ही लिखीत) 'तुमच्या नातेवाईकांचे तुमच्यावर फारच प्रेम आहे हे आम्ही जाणतो, पण तरिही पुर्वपरवानगी शिवाय नातेवाईकांना जेवायला आणु नये'. दिवस मोजतांना होणारा गोंधळ तर फारच कॉमन होता. काही ठिकाणी एकुण जेवणावर पैसे, तर काही ठिकाणी
दिवसांप्रमाणे. काही ठिकाणि अगोदर न सांगता जेवण न केल्यास पैसे कट, तर काही ठिकानी सोबत guest आणल्यास पैसे कट. प्रत्येक रविवारी Feast नामक एक वैताग बर्‍याच मेस मधुन असायचा. ही Feast म्हणजे सकाळी काही तरी (म्हणजे दोन तेलकट आणी एक गोड पदार्थ) खायचे आणि संध्याकाळी मेसला सक्तीची सुट्टी. कॉलेजच्या काळात घरुन मीळणारे पुर्ण पैसे ऑडिट करुन मिळत असल्यामुळे, संध्याकाळी बाहेर जेवायला जाणे सर्वच जण टाळायचे आणि या वेळी परत मदत घेतली जायची स्थानिक मित्रांची.

काही मेस मात्र आवर्जुन लक्षात रहाव्यात अश्या, म्हणजे आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या सुख दुखआत सामील करुन घेत. घरी सत्य नारायण असेल तर आवर्जुन सर्वांना जेवण देत (अर्थात पैसे न घेता), स्वयंपाक अगोदर उरकला असेल तर त्या काकु, दळण दळता दळता आपल्या लेकीच्या संसारातील अडचणी आम्हाला सांगत बसायच्या. कुणि विद्यार्थी आजरी असेल तर त्याला पथ्याचं खाण पिणं सुद्धा मिळायच त्यांच्यकडेच. शक्य तेव्हढ्या लोकांच्या आवडीनिवडी जपत भाजी ठरवली जायची. मात्र या सगळ्यात व्यावसायीकता कुठेही नसल्याने जास्त दिवस चालवणे अशक्य होउन बसे.

नोकरीच्या निमित्ताने बाहेर रहाणे होत असल्यास एखाद्या दिवशी जेवण आवडले नाही तर बाहेर जाउन जेवता येत पण कॉलेजच्या वेळी असे काही शक्य नव्हते. कॉलेजच्या आठवणित अनेक गोष्टिंचा समावेश होतो, पण मेस ही त्यातील महत्वाची आठवण. अन्न हे पुर्णब्रह्म शिकवणारी ही मेस, आईच्या हाताची चवीची खरी ओळख करुन देणारी ही मेस, घरापासुन दुर गेल्यावर झालेल्या सैरभैर मनाशी थेट नाते जोडणारी ही मेस.

आजही आठवतात जेवतांना मारलेल्या गप्पा, गोपाळकाला, काकुंनी मधेच येउन पोळीवर वाढलेलं तुप, feast , आणि हो 'फारच चेहरा उतरलाय माझ्या सोनुचा' हे वाक्य.

सुभाष डिके

Monday, June 26, 2006

'जादु तेरी नजर'

शनिवारी प्रशांत दामलेचं 'जादु तेरी नजर' बघण्याचा योग जुळुन आला. अगोदरच या नाटकाविषयी बरचं ऐकुन होतो, त्या सर्व अपेक्षांवर हे नाटक पुर्ण पणे उतरते. प्रशांत दामलेच्या अभिनयाच्या बाबतीत तर बोलायलाच नको, पण सर्वात जास्त पसंती मिळते ती सतीश तारे ला. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत प्रत्येक प्रवेशाला हास्याचे कल्लोळ निर्माण करतो हा माणुस. यातच प्रशांत दामलेच्या बहिणिचे काम केले आहे (त्या मुलिचे नाव लक्शात नाही आता) त्या अभिनेत्रीचे काम खुपच आवडले, प्रेमासाठी आतुर तरुणी फार सुंदर रेखाटली आहे तिने. नाटकात बरिच गाणी आहेत, एक-दोन गाणी सोडली तर बाकी सर्व गाणी संगित, शब्द आणि प्रसंग सगळ्याच बाबतीत चांगली आहेत.

खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..

Monday, June 12, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.

१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -

माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.

२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.

३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.

४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.

५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके

१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-

एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.

या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.

शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.

Wednesday, June 07, 2006

विडंबन - कदाचीत

या विडंबनासाठीची प्रेरणा असलेली कविता 'कदाचीत' या दुव्यावर वाचावयास मिळेल
(सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्‍याचं मनोगत...)

कदाचित

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता


(केवळ निरिक्षणातुनच )

Wednesday, May 24, 2006

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

संदिप खरेच्या अनेक आवडत्या कवितांपैकी मला आवडलेली एक कविता

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारावरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडक्यापरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गांजवीत बसतो
तो लांघुन चौकट पार निघाया बसतो

डोळ्यात माझीया सुर्याहुन संताप
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते
घडवुन दागिने सुर्यफुलापरी झुलतो

मी पायी रुतल्या काचावरी चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडुनी बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याची खोली
नवसांची ठेउनी लाच लावितो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन साऱ्या
अन धन्यवाद देवाचे घेउन जातो

मज अध्यात्माचा रोज नवा श्रृंगार
लपतो ना परि चेहरा आत भेसुर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरिही
त्या श्याम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो.

--- संदिप खरे..

Tuesday, May 23, 2006

हरिश्चन्द्र गड,

हरिश्चन्द्र गड, मी ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर पासुन ज्या किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले होते, तो हरिश्चन्द्र गड अनुभवण्याचा योग असा अचानक जुळुन येईल असे वाटले नव्हते.

हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे.

हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्‍या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्‍याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला.

आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..

Tuesday, May 16, 2006

भारत पाकिस्तान - एक शीतयुद्ध

अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळुन आले आहे की काही दिवसांपुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे अणुयुद्धासाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. सादर आहे याच सर्व हालचालींचा लेखाजोखा खास बातमी दारांकडुन ...


पाकिस्तानी सैन्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या सरकारची परवानगीची गरज नाही, त्यामुळे लगेचच त्यांनी उलटगणतीला सुरुवात केली. इकडे भारतीय तंत्र सुधारलेले असल्यामुळे भारतीय सैन्याला आठ सेकंदाच्या आत पाकिस्तानच्या या हालचालीची माहीती मिळाली. भारतीय सैन्याने लगेचच उत्तरादाखल आपला अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली पण त्यांना यासाठी सरकारची परवानगी हवी असते त्यामुळे त्यांनी तशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली. राष्ट्रपतींनी ती मागणी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठविली. त्यावर पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनाची घोषणा केली. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा वारंवार होणारे वॉक-आउट्स आणि विरोधी पक्षाने केलेला गदारोळ यामुळे संसद अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपतींनी मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावले. तिकडे दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सैन्याने तयारी करुन ठेवलेला अणुबॉम्ब तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सोडता आला नाही. त्यांचे यासाठी प्रयत्न सुरुच राहीले..
इकडे भारतीय सरकार ज्या पक्षाच्या पाठींब्यावर होते त्यांनी बाहेरुन दिलेला पाठींबा काढुन घेतल्यामुळे अल्पमतात आले. राष्ट्रपतींनी त्यांना आठ दिवसांच्या आत विश्वासमत प्रस्ताव सिद्ध करण्यास सांगितले पण तसे न होउ शकल्यामुळे सरकार बरखास्त करण्यात आले व काळजी वाहू सरकारची स्थापना झाली. काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानांनी मात्र भारतीय सैन्याला अणुबॉम्ब साठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पण याला लगेचच निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत असे सांगत आक्षेप घेतला. त्याविरोधात मग एक जनहीत याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मात्र काळजीवाहु सरकारला असा निर्णय घेता येत असल्याचा निर्णय दिला.


तिकडे पाकिस्तानी सैन्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!. त्यांनी लगेचच पुढच्या प्रयत्नाची तयारी केली पण यावेळी नियोजीत वेळेच्या आधीच काही लष्करी अधिकाऱ्यांनी तो बॉम्ब दहशतवाद्यांना विकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पुन्हा तयारी सुरु झाली त्यांच्या पुढच्या प्रयत्ना साठी., यावेळी त्यांनी मागच्या अनुभवावरुन शहाणपण शिकुन अमेरिका किंवा चीन यांच्याकडुन बॉम्ब आणि त्याचे तंत्र घेण्याचे ठरविले.


इकडे भारतात सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर लगेचच काळजीवाहु प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय सभा बोलावली आणि यावेळी बॉम्ब टाकण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच पक्ष तयार झाले. पण सैन्यापर्यंत ती परवानगी पोहोचण्याच्या अगोदरच, मानवी हक्क आयोग आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. मानवी साखळ्या आणि रास्ता रोको सारखे हातखंडे वापरुन हा विरोध सुरु होता. याच संदर्भात कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन मधे 'Send this to every indian you know' असा विषय असणाऱ्या ई मेल ची चेन सुरु करुन विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली.


तिकडे पाकिस्तानात त्यांच्या बॉम्बने बिघडण्याचे आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे कधी वाळवंटात तर कधी अरबी समुद्रात जाउन त्यांचे बॉम्ब पडत असत. शेवटी त्यांनी अमेरिकेकडुन मिळालेला एक बॉम्ब पाठवण्याचे ठरवले, पण पाकिस्तानी सैन्य त्या बॉम्बचे तंत्र समजावुन घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी तो आहे तसाच पाठवला. पण तो अमेरिकेने बनविलेला असल्यामुळे त्याचे मुळ लक्ष 'रशिया' होत्या त्याप्रमाणे तो भारताच्या दिशेने येण्या ऐवजी रशियाच्या दिशेने गेला. रशियन सैन्याला याची अगोदरच खबर लागल्यामुळे अर्ध्यावाटेतच निकामी करण्यात ते यशस्वी झाले. पण याला उत्तर म्हणुन त्यांनी आपल्याकडील काही क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पाठवले. पाकिस्तानी सैन्याचे सगळे लक्ष भारतावर असल्यामुळे त्यांना हा प्रकार समजण्यास वेळ लागला आणि त्या बॉम्ब ने त्यांच्या राजधानीवर हमला चढवला, सर्वत्र गोंधळ माजला, पाकिस्तान ने लगेच आपल्यावर अन्याय झाला आहे अशी ओरड करुन जागतिक मदतीची मागणी केली.


भारताने यावर लगेचच आपले तीव्र दुःख व्यक्त करुन मदतीसाठी मिलियन डॉलर चे पारले जी बिस्किटे पाठवुन दिली..

अशा प्रकारे भारतीय सैन्याला कधीही परवानगी मिळाली नाही
आणि पाकिस्तानी सैन्याला कधीही व्यवस्थीत पणे आपले काम करता आले नाही.

And both lived happily everyafter!!!!
(इंटरनेट वरुन साभार)

Thursday, May 11, 2006

ते आत्ताच करा...

प्रभाव


इ मेल वरुन कधी कधी आपल्याला खुप चांगलं असं काहीतरी मिळुन जातं, असंच काहीतरी... ज्यांचा आपल्यावर नकळत प्रभाव पडुन जातो...

Wednesday, May 10, 2006

निर्णय

निर्णय

एका शहरात राहणार्‍या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्‍या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्‍याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्‍याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.

बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्‍या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्‍या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्‍यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.

एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्‍याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्‍या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्‍यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.


पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्‍या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.

मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.

"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."

"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."

"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"

"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "

"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."

"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."

या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.

तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,

"आई, ते काका कशाला गं आले होते "

"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "

"\'ती\' "

"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "

"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"

"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "

"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "

"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "

"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"

"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "

"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "

"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..

त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....

या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...

थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....

"हॅलो, "

"मी बोलतेय.."

"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..

".. अरे काय झालं.. "

"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..

"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."

"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...

थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्‍याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..

"अरे, काय झालं "

"......"

"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "

त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...

"नीट सांगशील काय झालं.."

"आई ने नकार दिला "

"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."

तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला

"मग आता काय विचार केलायस तु... "

"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."

"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..

"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."

"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."

"पण काय .."

"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..

"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..

"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."

तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.

त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.

"का नियती ला हे मंजुर नसावे " तो

"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..

... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..

आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्‍या होतात

दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...

सुभाष डिके

Monday, May 08, 2006

पांडवगड ट्रेक

नुकताच आम्ही पांडवगड ट्रेक पुर्ण केला.

माझ्या अनेक ट्रेक पैकी अत्यंत उत्तम असे या ट्रेक चे वर्णन करता येईल.. चढतांनाच चुकलेली वाट, आम्ही नकळत निवडलेला अवघड रस्ता, त्यावर चढतांना आलेला अनुभव सगळच अवर्णणीय. शेर वाडिया यांची भेट हा त्यातीलच अजुन एक चांगला अनुभव. आम्ही वाडिया यांची एक छोटेखानी मुलाखतच घेतली, त्यात इकडे एकटे रहाण्याचा निर्णय घेतांना काय वाटले असे विचारल्यावर त्यांनी आम्हाला You live in a city, still you are alone. I am lucky that I am living alone, but I am not alone असे तत्वज्ञान सुद्धा ऐकवले. ते वर्षातुन एकदा, किंवा दोनदाच गड उतरतात तरीहि जगाशी जोडलेले आहेत, चक्क Internet , cell phone च्या साह्याने. दृढ निश्चय, तो तडिस नेण्याची धडपड, आणि तरीही चेहर्‍यावर टिकुन राहीलेले हास्य या गोष्टी शिकवायला शेर वाडीया यांच्या सारखा गुरु मिळणे ही त्या ट्रेक ची उपलब्धी. अशी भेट घडल्यावर आम्ही त्यांच्या सोबत फोटो न काढणे शक्यच नव्हते. गड फिरुन आम्ही परत उतरल्यावर मेणवली गावातील कृष्णेच्या चंद्राकार घाटावर आलेला अनुभव हा तर या सगळ्या अध्यायाचा कळस. अत्यंत थकलेल्या अवस्थेत आम्ही इकडे पोहोचलो आणि आमचे स्वागत केले ते दुधडी भरुन वाहणाऱ्या कृष्णे ने मग काय त्या अद्वितीय आनंदात आम्ही जवळपास तास भर बसलो. भरीस भर म्हणुन वाई गावातील बंडु गोरेंकडचे जेवण होतेच. आणि हे सगळे कमीच म्हणुन की काय एका मोराने आम्हाला सुंदर असे दर्शन दिले, पुढे धोम गावातील मंदिर, त्याबाहेरील छानसा नंदी

एखाद्या दिवसाने आपल्याला भरभरुन द्यावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा ट्रेक

Saturday, May 06, 2006

विडंबन - अरे अरे बुटा झालासी साधन

सर्वोच्च न्यायालयाने बुटासिंग यांच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली होती. सर्व जाणतात की या निर्णयामागे नेमके कोण होते... पण तरीही

(चाल - अरे अरे ज्ञाना झालासी पावन)

अरे अरे बुटा झालासी साधन,
तुझे तुज स्थान कळो आले ॥धृ॥

मोडुनी मनासी, तोडुनी नियमासी
केली विधानसभा भंग जेंव्हा ॥१॥

सोनियाचे मन, लालुचेही गुण
कोर्टी अडलकलासी तुची तेंव्हा ॥२॥

स्वतःची निवृत्ती, अन्यथा गच्छंती
नसे अन्य मार्ग तुजपुढे ॥३॥

याची एक खेळा, होती सर्व गोळा
चिरडली जनता तुमच्या मधे ॥४॥

अरे अरे बुटा झालासी साधन,
तुझे तुज स्थान कळो आले

.................. सुभाष डिके

Friday, May 05, 2006

काही तुकडे

येता जाते कशावर तरी नजर पडते, काही तरी ऐकु येतं, ते सगळचं लिहुन ठेवण शक्य नाही पण तरिही अशेच काही तुकडे...


अकेली होती गर उन वादियों में तो कभी लौटकर ना आती,
क्‍यो खयाल बनकर साथ साथ चलते रहे तुम ?.....
जाने कब किस मोडपर हमराह बनी हैं तनहाईयॉं
हम तो समझे थे अकेले ही है सफरमें.....'



एक अधिक एक किती?
अंकगणित : दोन
मैत्री : अकरा
प्रेम : एक !!!

आदत हो गयी ...

बेवफाई की यह इंतहा हो गयी ,
के तुझसे जुदा होकर भी जीने की आदत हो गयी ।

तुम लौट के आओगे हमसे मिलने,
रोज दिल को बहलाने की आदत हो गयी ।

तेरे वादे पे क्या भरोसा किया हमने,
के शब भर तेरा इंतजार करने की आदत हो गयी ।

खुशी मे भी हम क्या मुस्कुराते की,
तेरे गम मे रोने की आदत हो गयी ।

काफ़िले निकल गये हमे छोड के
के अकेले सफ़र करने की आदत हो गयी ।

हर मोड पर मिली गम की परछाईया
जिंदगी से समझोता करने की आदत हो गयी ।

जानते थे नही हो सकते कभी आप हमारे
फिर भी खुदा से आपको ही मांगने की आदत हो गयी

पैमान-ए-वफ़ा हमे क्या मालुम इबाद
के बेवफाओंसे दिल लगाने की आदत हो गयी ...

Thursday, May 04, 2006

प्रमोद महाजन

अशी खुप थोडकीच असतात ज्यांना सर्वांचच प्रेम लाभत रहातं, अशांपैकीच एक..दिल्ली गाजविणाऱ्या काही मोजक्या मराठी माणसांपैकी एक ..


प्रमोद महाजन




जमल्यास परतुन या हो...

Wednesday, May 03, 2006

यादे याद आती है

लोणावळ्याहुन पुण्याला आलो त्याला काल एक महिना पुर्ण झाले. गेली अडीच वर्षे मी नोकरीच्या निमित्ताने लोणावळ्याला काढली. कालच एका मित्राने मला प्रश्न केला "काय रे कसे वाटतेय?, What do you miss ".. या प्रश्नावर खरं म्हणजे मी विचारच केला नव्हता. आणि जसं जसा मी विचार करु लागलो तसतश्या अनेक गोष्टी माझ्या नजरे समोरुन तरळुन गेल्या.

नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपण ज्या कुठल्या गावात रहात असतो त्या गावाशी तिथल्या अनेक गोष्टींशी आपला ऋणानुबंध राहणे साहजिकच आहे. लोणावळ्याची आठवण झाली आणि सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर आला तो तिथला पाउस... लोणावळ्याला Join करण्यापुर्वी खरं म्हणजे मनात खुप हुरहुर होती तिथल्या वातावरणाबाबत आणि एकंदरितच निसर्गाबाबत. पण अगदी पहील्या दिवसापासुन तर पुढे अडीच वर्षे याचा निर्सगाने मला वेळोवेळी साथ दिली. मी Office join केले होते ऐन जुलै महिन्यात आणि अगदी त्याच दिवशी आलेल्या जोरदार पावसामुळे मी खरं म्हणजे वैतागलो होतो, अर्थात त्याच माझा दोष नव्हताच म्हणा. कारण एवढा मुसळधार पाउस मी कधी अनुभवलाच नव्हता. पण पुढे जसजसा मी रुळु लागलो तस तसं या पावसाशी माझी जवळीक वाढायला लागली. आमच्या ऑफिस ला जाण्यासाठी सुमारे २५ किमी लांबीचा आणि ४५ मिनिटे प्रवासाचा एक अत्यंत सुंदर असा घाटातला मार्ग होता. या मार्गावर अनेक वळणावर हा निसर्गराजा आपल्या वेगवेगळ्या रुपाने दर्शन देत असे. कुठे कोसळणारा धबधबा, तर कुठे घनदाट धुके, दुरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि अशा रस्त्यावरुन रोज ऑफिसला जायचे असल्यामुळे सकाळी सकाळी मनाला एक नवा तजेला मिळत असे आणि संध्याकाळी दिवसभराच्या कामाचा सगळा शीण घालवण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यामधे होतं. ऑफिस मधुन सुद्धा एका हातात कॉफीचा कप आणि खिडकीतुन बाहेर दिसणारे पावसाचे प्रताप असा दुहेरी मिलाफ साजरा होत असे. पावसाळ्यात आम्ही ऑफिसमधील ए. सी. चालु करणे शक्यतो टाळत असु कारण बाहेरुन येणारी ताजी स्वच्छ हवा आम्हाला जास्त सुखावत असे. अशा वातावरणात काम करण्यात एक निराळीच मजा असे, कधीही ताणतणावाचे प्रसंग आले की ऑफिस मधुन बाहेर निघावं आणि समोर दिसणाऱ्या पावसाकडे बघत रहावं. काहीच क्षणात आपण आत्ता खुप चिडलो होतो, किंवा चिंतेत होतो हे सांगुन सुद्धा खरं वाटायचं नाही. अशा या पावसात भिजण्याची मजा तर आणखी निराळी. पुण्या मुंबई हून सुट्टी च्या दिवशी अनेक लोक त्या पावसात भिजण्यासाठी येत असतं. अर्थात त्यांच्या भिजण्याला धांगडधिंग्याचचं स्वरुप असे. पण तरिहि अशा भाउगर्दीतुन दुरजाउन एखाद्या वळणावर उतरावं आणि या पावसाचा आनंद घ्यावा. माझ्या घराच्या खिडकीतुन दुरवरचा एक छोटासा धबधबा अगदी स्पष्ट दिसत असे. तो धबधबा आणी त्याच खिडकीमधुन दिसणारा पौर्णिमेचा चंद्र या भांडवला वर मी त्या घरात जवळपास एक वर्ष एकट्याने काढु शकलो. याच पावसाशी निगडीत अशा अनेक वैयक्तीक आठवणी सुद्धा आहेत आणि हा पाउस आठवता आठवाता त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळुन जातो. आता नोकरीच्या निमित्ताने लोणावळा सोडावं लागलं आणि पुण्यात यावं लागलं , पण आजही डोळे मिटले की पटकन डोळ्यासमोर तो पाउस, तो रस्ता, तो धबधबा दिसत रहातो आणि मन चिंब होउन जातं त्या आठवणींनी.... I miss all the fun..


लोणावळ्यापासुन दुर राहतांना अजुन एक गोष्ट मी खुप miss करतो ती म्हणजे मुंबईचे FM Radio Channels आणि विशेषतः Radio Jokies. मी जेंव्हा लोणावळ्याला रहायला आलो तेंव्हा विविधभारती आणि पुणे आकाशवाणी यांच्या पलीकडे तिसरे Radio Channel मला ठाउक नव्हते. पण लोणावळ्याला मुंबईमधुन प्रसारीत होणाऱ्या सर्व वाहीन्या अगदी स्पष्ट ऐकु येत असत, अगदी Love at first sight म्हणतात ना तसा प्रकार झाला. जुलै २००३ साली जेंव्हा मी join झालो त्यावेळी Win ९४.६ नावाचे एक Radio Channel होते. त्यावर सकाळी ५.०० वाजता अंजली पाटिल यांनी सादर केलेला एक मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागत असे. नितांत सुंदर अशी गाणी अगदी पहाटे पहाटे ऐकायला मिळत असे, त्यातुन अंजली पाटील यांचं निवेदन तर दुधात साखरचं.. त्यांचा आवाज ऐकत दिवस सुरु होत असे.. पुढे लगेचच ७.०० वाजता 'मलिष्का' येत असे, आणि मग पुढे तिच्या चटपटीत कार्यक्रमांना सुरुवात होत असे. याच वाहिनीवर अनुराग पांडे सुद्धा एक कार्यक्रम सादर करत असे. पुढे पुरेसे पैसे न जमवु शकल्यामुळे ती वाहिनी बंद झाली.. मलिष्का आणी अनुराग पांडे यांनी ९३.५ Red FM मधे प्रवेश केला पण अंजली पाटील कुठे गेल्या ठावुक नाही, I miss her... मुंबईतुन सध्या (म्हणजे मी लोणावळा सोडेपर्यंत तरी) ९१.० रेडिओ सिटी, ९२.५ गोल्ड एफ एम, ९३.५ ऱेड एफ एम, ९८.३ रेडिओ मिरची, १००.१ एफ एम गोल्ड, आणी १०७.० एफ एम रेनबो असे अनेक channel लागत असे. प्रत्येकाची एक एक खासियत असे. सकाळी ७.०० वाजता मलिष्का, आणि रेडिओ सिटी वर सिंपली प्राची यांचा कार्यक्रम सुरु होत असे आणि मला दोघीही आवडत असल्यामूळे आलटुन पालटुन ऐकावं लागत असे. मला गाण्यापेक्षा त्यांच्या आवाजातील गोडवा जास्त सुखावत असे. पुढे दहा वाजता रेडिओ सखा अश्विन किंवा लावण्या येत असतं, त्यानंतर दिवाना नंबर 1 to infinity अनिरुद्ध,, आत्त्त्ता सुद्धा एक एक नाव त्यांचा आवाज आठवण करुन देत आहे.. I miss them all,.....

Tuesday, May 02, 2006

इक्बाल - एक चित्रपट एक संदेश

बऱ्याच दिवसांपुर्वी एका मित्राने 'इक्बाल' जरुर पहा असा मेसेज पाठविला होता. त्यानंतर सुद्धा अनेकांकडुन तशीच शिफारस झाल्याने चित्रपट पहाणे आवश्यक होते., म्हणुन काल सुट्टीत वेळात वेळ काढुन चित्रपट पाहिला, आणि एवढी उत्तम कलाकृती बघण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागला म्हणुन वाईट वाटले.

दोनच तासाच्या चित्रपटात 'इक्बाल' तुम्हाला खुर्चीला खिळवुन ठेवतो आणि चित्रपट गृहातुन बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनतर एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसते. Bollywood चा नेहमीचा एकही फॉर्म्युला (सासु सुन, संपत्तीचे झगडे, दहशतवाद, मारधाड, निव्वळ गोड प्रेमकथा) न वापरता सुद्धा चांगला चित्रपट निर्माण करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'इक्बाल'.
'इक्बाल' - एका छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुकबधीर मुलगा. आपल्या आईकडुन गर्भातुनच क्रिकेटविषयीचे प्रेम घेउन आलेला. वडिल घराच्या अडीअडचणी मुळे त्रासलेले, साहजिकच त्यांची इच्छा की त्यांच्या मुलाने शेतीत हातभर लावावा अशी. पण क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या 'इक्बाल'ला ते मंजुर नाही. आपल्या बहिणीच्या साह्याने गावात सुरु असलेल्या academy च्या बाहेर दुर उभा राहुन academy च्या शिक्षकांकडुन शिकण्याचा प्रयत्न करतो. नंतर बहिण त्याअअ academy मधे प्रवेश मिळवुन देते, पण काही कारणाने त्याला academy सोडुन जावे लागते, मग नसिरुद्दीन शहा कडुन शिकायचे असे 'इक्बाल' ठरवतो, पण नसिरुद्दीन शहा त्याला तयार नसतो, मग मह्त्प्रयत्नाने 'इक्बाल' आणि त्याची बहीन त्याला तयार करतात. पुढे वडिलांचा नकार आडवा येतो तेंव्हा रात्रीचा दिवस करुन 'इक्बाल' तयारी करतो, रणजी team मधे निवड होण्यासाठी 'राजकारण' मधे येते पण तरिही त्याची निवड होते, पुढे Indian team मधे निवड होण्याची वेळ येते, मग नेमके काय होते हे तर चित्रपटातच पाहण्यासारखे.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर श्रेयस तळपदे ने संधिचे सोने केलेयं. एकही शब्द न बोलता संपुर्ण चित्रपटावर तो एक छाप सोडुन जातो. आनंदाचे आणि जबरदस्त इच्छाशक्ती दाखविण्याच्या प्रत्येक प्रसंगात त्याच्या चेहऱ्यावरिल हावभाव एवढे नैसर्गिक आहेत, त्याचे डोळे एवढे बोलके दिसतात की हा मुकबधीर आहे की नाही असा प्रश्न पडावा. श्वेता प्रसाद चे तर करावे तेवढे कौतुन थोडे आहे, समोर नसिरुद्दीन शहा सारखा अभिनेता असतांना सुद्धा तिच्या अभिनयातुन कुठेही नवखेपणा जाणवत नाही. शाब्बास श्वेता.. नसिरुद्दीन शहा आणि गिरिश कर्नाड यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यास मी असमर्थ आहे, त्यांच्या नावाचा उल्लेखच सर्व काही वर्णन करण्यास समर्थ आहे. प्रतिक्षा लोणकर ने साकारलेली आई आणि यतीन ने साकारलेला असहाय्य बाप हे सुद्धा तेवढ्याच तोडीचे आहेत. नागेश चं दिग्दर्शन याविषयी तर लिहावं तेवढ थोडं आहे, साध्या साध्या आणि छोट्या प्रसंगातुन संपुर्ण चित्रपट पुर्ण करत जाण हे त्याचं वैशिष्ट्य. चित्रपटाचं संगित आणि विशेषतः KK ने गायलेलं 'आशायें' हे गाणं एवढं सुंदर आहे की तुमच्या मनातील निराशा दुर करण्याचं सामर्थ्य त्यामधे नक्कीच आहे.

पण चित्रपट पाहणे व त्याची प्रशंसा करणे यावरच 'इक्बाल' संपत नाही. 'इक्बाल' च्या निमित्ताने अनेक गोष्टी आपण शिकु शकतो. आपल्या जीवनात काहीतरी करुन दाखविण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते पण 'इक्बाल' बघतांना या इच्छापुर्ती साठी घ्यावे लागणारे कष्ट किति आणि कसे असावेत याचे धडे आपल्याला मिळत जातात. बोलता व ऐकता येत नाही तरिही मनात जोपासलेल्या स्वप्नपुर्ती साठी अथक परिश्रम करण्याची तयारी 'इक्बाल' दाखवतो. एवढेच नव्हे तर आपल्या गुरुला सुद्धा तयार करण्यासाठी तो मागे पुढे पहात नाही. वडिल शेतावर जाण्यासाठी सांगतात तेंव्हा दिवसा शेतावर आणि रात्री मैदानावर जाण्याची तयारी तो दाखवतो. यशाच्या जवळ पोहोचत असतांना मोहाचे काही क्षण त्याला आपल्या लक्षापासुन दुर बोलावतात पण ध्येय समोर दिसत असतांना इतर कशालाही गौण मानुन केवळ आणी केवळ ध्येयाकडेच पाहण्याची शिकवण 'इक्बाल' आपल्याला देतो.
'इक्बाल' मधील सुंदर गाणे पुढे देत आहे

आशायें आशायें आशायें
कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास
हर कोशिश मे हो बार बार, करे दरियाओंको आर पार ..
तुफानोको चीर के , मंजिलो को छीन ले ॥१॥
आशायें खिले दिलकी, उम्मीदे हसे दिलकी
अब मुश्किल नही कुछ भी, अब मुश्किल नही कुछ भी ॥धृ॥
उड जाये लेके खुशी अपने संग तुझको वहा
जन्नत से मुलाकात हो पुरी हो तेरी हर दुआ ॥२॥
गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाइशोसे बात बात
लेकर सुरज से आग आग, गाए जा अपना राग राग
कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा ॥३॥


--------------
निराशा झटकुन उठा, आपल्या ध्येयावर नजर ठेवा, तयारी असु द्या अफाट परिश्रम करण्याची, ढवळुन निघण्याची तरच कळेल चव यशाची. स्वतःला झोकुन द्या, आणि मग बघा यशाच्या शिखरावरुन दिसणारं सुंदर दृश्य
सुभाष डिके

Email forwards आणि आपण

संगणक आणि संगणकाशी संबंधीत सर्व लोकांनाच आपल्या जीवनाशी ई मेल चे जुळलेले नाते आणि त्याची अपरिहार्यता मान्य असेल. ई मेल चे उपयोग सर्वांना ठाउक आहेतच त्यातीलच एक ई मेल वापरण्यामागचे मुख्य कारण म्हणजे forwarded emails.


प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातुन भल्या बुऱ्या प्रसंगाना तोंड देउन पुढे जात असतो. असं म्हणतात ना की सुखाच्या क्षणी सर्वच पुढे येतात पण दुःखाच्या, अडचणीच्या प्रसंगी जो पुढे येतो तो खरा मित्र. आपल्या सर्वांच्याच जीवनात इतर मित्रांसोबतच या forwarded emails चा खुप मोठा हात आहे हे मान्य करावे लागेल.


सुखी होण्याच्या काही मार्गामधे छोट्या छोट्या गोष्टींमधे सुख शोधावं असं सांगितलेलं असतं. अगदी तेच काम या forwarded emails करत असतात. कधी कधी असं होतं की कुठल्याश्या कारणावरुन आपलं boss बरोबर किंवा सहकर्मचाऱ्या बरोबर वाद होतो, काही क्षण काय करावे काहीच सुचत नाही आणि अशाच वेळी तुमच्या मेल बॉक्स मधे एक तुम्हाला ताजं तवाना करणारा मेल येउन पडलेला असतो. त्यामधे काहीही असो एखादी सुंदर गोष्ट वा एखादा अगदिच फालतु विनोद, पण त्यावेळी तुम्हाला त्याची खरोखरचं गरज असते आणि तुम्ही मग लगेच थोडसं हसुन आपल्या कामाला लागता. तुम्हाला हाच प्रकार अनेकदा जाणवेल, कधी मनात निराशा दाटुन येते, किंवा कुठल्याश्या चुकलेल्या निर्णयामुळे मन विषण्ण झालेलं असतं आणि अश्या वेळी एखादी चांगली गोष्ट तुम्हाला वाचायला मिळाली की ती निराशा कुठल्या कुठे पळुन जाते.


याच ई -मेल्स चे अनेक ग्रुप सुद्धा बनतात, मग त्यातुन अनेकदा अत्यंत उपयुक्त अशी माहीती सर्वांनाच मिळत रहाते. ई मेल मुळे अनेकांना चांगले मित्र मैत्रिणी मिळालाचे उदाहरणं तर अनेक आहेतच. आपल्या अनेक मित्रांपैकी एखादा असा असतो की रोज निदान त्याची एक तरी ई मेल मिळणारच, मग काही दिवसानंतर आपण नकळत त्याच्याकडुन / तिच्याकडुन येणाऱ्या ई मेलची वाट बघु लागतो, आणि एखादा दिवस, दोन दिवस रिकामे गेले की मग सुनेसुने वाटत रहाते. नकळत एकमेकाची ख्याली खुशाली कळविण्याचे काम सुद्धा याच ई मेल्स करतात. कुणाशी भांडण झाल्यास एखादी चांगली ईमेल माफी मागण्याचं काम करुन जाते. आणी कुणाची फारच आठवण येत असल्यास अशीच एखादी ईमेल आपल्या साथीला येउन जाते. बऱ्याचदा ई मेल वरुन येणारे विनोद, कविता, गोष्टी जपुन ठेवुन पुन्हा पुन्हा वाचाव्यात अश्या असतात. मग चटकन आपल्याला आवडलेली एखादी गोष्ट कविता, विनोद इतरांसोबत सुद्धा शेअर करावा या भावनेने आपण सुद्धा तीच ई मेल पुढे पाठवुन मोकळे होतो.


अर्थात याला काळी बाजु सुद्धा आहे ती म्हणजे वेळेचा अपव्यय. काही लोकांना दिवसभर याच गोष्टीत वेळ घालवण्याची सवय असते आणि ती नक्कीच चुकिची आहे. पण थोडक्यात वापर केल्यास याच ई मेल्स आपली उत्पादनक्षमता वाढविण्यास नक्की मदत करतील यात नवल नाही. बऱ्याच लोकांना Email चा वापर फक्त तेवढ्या पुरता करावा असं वाटतं असतं आणि तसं वाटणं साहजिक सुद्धा आहे., पण थोडंस पुढे जाउन तुमच्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने तुम्हाला एखादी चांगली ई मेल पाठविली तर बिघडले कुठे? अर्थात काही मेल्स असतात निव्वळ डोकेदुखी. उदा. हा मेल १० लोकांना पाठवा म्हणजे तुमच्या इच्छा पुर्ण होतील, किंवा तुम्हाला Microsoft कडुन अमुक एक रकमेचा चेक मिळेल वैगरे. आणि सुशिक्षीत (किंबहुना उच्च शिक्षीत) असुनही ही मंडळी का असले मेल्स forward करतात कुणास ठावुक? अश्या मेल्स ना त्याच क्षणी delete करुन टाकण्यातच शहाणपणा आहे. पण अशा काही मेल्स चा अपवाद वगळला तर तुमच्या लक्षात येईल की forwarded mails मधे सुद्धा एक प्रकारची मजा असते. आणि तीच मजा आपण सर्वांनी अनुभवली असेलच

सुभाष डिके

Saturday, April 29, 2006

विडंबन - फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...

अलिकडेच काही खासदारांना sting operation प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतांना दाखवले होते. त्यांच्या मनात आता हेच गाणे सुरु असेल

चाल : फुलले रे क्षण माझे फुलले रे....

फिरले रे ग्रह माझे फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे

लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....

विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....

- सुभाष डिके

कंडक्टर

आमच्या लहानपणी आम्ही एक कोडं घालत असु

कागद फाडतो पण वेडा नाही,
पैसे मागतो पण भिकारी नाही,
घंटा वाजवतो पण पुजारी नाही,.. ओळखा पाहु कोण

उत्तर अर्थातच कंडक्टर..

प्रत्येकाच्या लहानपणी हेवा वाटणार्‍या अनेक व्यक्तींपैकी कंडक्टर हा एक नक्की असेल, मग तो कुठल्याही कारणा मुळे असेल, त्याच्या कडे एवढे पैसे मिळतात जमा होतात मग ते त्याच्याकडेच रहात असतील काय?, किंवा त्याला किती तरी गाव फुकट फिरायला मिळतात वैगरे.

कंडक्टर या व्यक्तीविशेषाशी आपला अनेक वेळा संबंध येत असतो, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत महत्वाचा भाग असलेला हा कंडक्टर. कंडक्टर ला मराठीत वाहक हे नाव आहे पण कंडक्टर मधे जो जोर आहे तो वाहक या शब्दात नाही. मी प्रत्येक वेळा गाडीत बसलो की या कंडक्टर्चे निरिक्षण करत असतो, शक्य असेल तर कंडक्टर च्या शेजारचीच जागा मिळवतो. प्रत्येक कंडक्टरने दाढीचे खुंट वाढवलेलेच असावेत असा त्या खात्याचा अलिखित नियम असवा बहुधा, कारण जवळ्पास ९०% कंडक्टर तसेच येतात नेहमी, आणि जो दाढी वैगरे व्यवस्थीत करुन आला आहे तो नवशिका आहे असं समजावं. त्याच प्रमाणे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे बर्‍याच कंडक्टर ना चष्मा नसतो, म्हणजे कंडक्टर मधे चष्मा असणार्यांची संख्या खुपच कमी असावी, असे नसेलही बहुतेक पण मला तरी तसे बर्‍याच वेळा जाणवले. काही कंडक्टर आतुन त्यांचा नेहमीचा शर्ट घालुन मग वरुन Uniform चढवतात.

कंडक्टर च्या विश्वात अनेक गोष्टि आपल्या आकलनापलिकडील असतात एस. टी. चे कंडक्टर आपल्या बरोबर एक पेटी नेहमी बाळगतात,मला वाटतं त्यांना ही पेटी खात्या कडुन मिळत असावी बहुधा कारण आत्ता पर्यंत मी पाहीलेल्या सर्व पेट्या एकाच प्रकारच्या होत्या. ही पेटी कंडक्टरच्या सीट च्यावर साखळीने बांधुन ठेवलेली असते, या पेटीत नेमके काय असते कुणास ठावुक. कंडक्टर ना आपल्या कडील एका कागदावर कसल्या तरी नोंदी कराव्या लागतात, ते नेमके काय लिहितात हे पाहण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण Doctor च्या prescription सारखीच कंडक्टर च्या नोंदीची एक विशिष्ठ लिपी असते, आणि ती कदाचित फक्त त्यंच्याच अधिकार्‍यालाच वाचता येत असावी. कदाचीत तिकिट किती संपले असे लिहित असावेत. एवढ्या हालणार्‍या गाडीत बसुन सुद्धा ते अगदी व्यवस्थीत लिहित असतात. मला वाटते यांना Retirement नंतर घरी काही लिहायचे असेल तर एक सतत हालणारा टेबल लागत असेल. या नोंदी
प्रमाणेच तिकिटावर कुठे पंच मारावा लागतो हे ही एक वैशिष्ट्य, मला वाटते टप्प्यांप्रमाणे पंच मारत असतील, पण त्यात वेगळे पण असे की एस. टि च्या बस मधे पासुन आणि पर्यंत अश्या दोन्ही ठिकाणि पंच करतात पण शहर बस सेवेत मात्र केवळ एकाच ठिकाणी पंच करतात. मी बंगळुर शहरात तर एक वेगळाच प्रकार अनुभवला, तिथे तिकिट काढुन तुमच्या हातात देतांना त्यावर पंच करत नाही, त्या ऐवजी थिएटर मधे फाडतात तसे तिकिट पाडतात, (दोन भाग करत नाहीत) आणि मग तुमच्या हातात देतात. अशीच आणखी एक गोष्ट म्हणजे, समजा चालु गाडिमधे गर्दी कमी आहे आणि कंडक्टर पुढच्या दरवाजात उभां राहुन Driver सोबत बोलत असेल, त्याच वेळी जर कुणाला उतरायचे असेल तर कंडक्टर घंटीच का मारतो कुणास ठावुक, कधिही तो Driver ला तोंडने थांब म्हणत नाही, अगदी बाजुला उभा असेल तरीही.

कंडक्टर च्या स्वभावाचे अनेकविध नमुने आपण सर्वांनीच अनुभवले असतील. Electronics मधे Good Conductor आणि Bad Conductor अशी concept असते, ती खरी ठरते या कंडक्टर च्या बाबतीत सुद्धा. काही कंडक्टर रागीट असतात, काही अगदिच सौम्य, काही गोंधळलेले असतात तर काही अगदिच तरतरीत.सकाळी सकाळिच तुमची एखाद्या रागीट कंडक्टर सोबत मुलाखात झाली मी मग दिवसाची सुरुवातच खरब होते, हे रागीट कंडक्टर मंडळी या ना त्या कारणाने नुसते ओरडत असतात, मग ते तिकिटासाठी असेल, सुट्ट्या पैशांसाठी किंवा नुसत्याच पुढे सरका पुढे सरका अश्या आरोळ्या असतील., या उलट काही कंडक्टर चा खुपच चांगला अनुभव येतो, अनोळखी माणसाला त्याच्या पत्त्या प्रमाणे नेमके कुठे उतरणे सोयीचे पडेल हे सांगतील एवढेच नव्हे तर उतरल्यानंतर कुठली बस पकडावी ते सांगतील, गर्दी झाली तरी अत्यंत सौम्य शब्दात "अहो पाटिल पुढे चला", "ताई, तुम्ही बसु शकता" वैगरे अशा शब्दांनी बोलावतात. अशा कंडक्टर च्या बस मधुन गेलात की मग प्रवासाचा शिण बर्‍यापैकी निघुन जातो. कंडक्टर चा सर्वात मोहक प्रकार बघायचा असेल तर तो छोट्या गावाकडील मुक्कमी गाडीत बघावा, संध्याकाळी तालुक्याच्या गावावरुन गाडी निघते, आणि मग तिकीट काढता काढता कंडक्टर साहेब वैयक्तीक चौकशी सुरु करतात, रोजचीच गाडी असल्यामुळे त्याची प्रत्येकाशी ओळख असतेच, मग "काय पाटील साहेब, झालं का कोर्टाचं काम?", "काय रे बाळ्या कसा गेला पेपर?","काय जावईबापु,दिवाळसण वाटत?", "काय तात्या, काय म्हणाले doctor ? ", अशा गप्पा सुरु होतात.

कंडक्टरचं काम तस पहाता खुप कौशल्याचं असतं,विशेष म्हणजे शहरातील गाड्यांचे कंडक्टर. जेमतेम उभं राहण्यापुरती जागा, आणि त्या तेवढ्याश्या जागेतुन इकडुन तिकडे तिकिट द्यायचे (ते सुद्धा पैशाचा हिशोब न चुकु देता), दोन दोन मिनिटांवर येणारे थांबे बघुन बेल मारायचि, मधेच एखादा अतिउत्साही व्यक्ती स्वतःच बेल मारतो, मग त्याच्यशी जुंपते, सुट्ट्या पैशांचा गोंढळ होतो, मधेच एखाद्या महीला आरक्षीत सीट वर कुणी पुरुष बसलेला दिसतो त्याला उठवावे लागते, अशा अनेक प्रसंगाना त्याला एकाच वेळी तोंड देत त्याला गाडी शेवट पर्यंत न्यायची असते. अनेकदा कंडक्टर गाडीच्या खाली राहुन गाडी निघुन गेल्याचे आपण पेपर मधुन वचतच असतो. अश्या अनेक प्रसंगाना कंडक्टर ला तोंड द्यावे लागते, एस. टी च्या कंडक्टर वर ही वेळ अनेकदा येते आडवळणाच्या एखाद्या गावात गाडी बिघडते, मग ती ढकलण्यासाठी लोकं गोळा करण्याचं काम कंडक्टर कडेच येत असतं. अपघात वैगरे झाला तरी कंडक्टर लाच त्याची सुचना द्यावी लागते, प्रवासी मंडळी मधे आपापसात होणार्‍या भांडणात सुद्धा त्यालाच हस्तक्षेप करावा लागतो. प्रवासी मंडळि सुद्ध कंडक्टर सोबत खेळ खेळत असतात, मुलाचे वय हाफ तिकिट काढण्या इतपत आहे हे पटवण्यात आई वडील दंग असतात तर त्यचे वय पुर्ण तिकिट घेण्या एवढे आहे हे कंडक्टर पटवुन देत असतो., तोच प्रकार ६५ वर्ष्याच्या सवलतीचा.कधी कधी एखादा प्रवाशी एक्-दोन रुपये कमी आहेत तरी पण तिकिट द्या असा आग्रह धरतात तर काही माझ पाकीट हरवलं मला बसु द्या अश्या विणवण्या करतात. अशा वेळी कंडक्टर निष्कामकर्मयोग साधत असतील. आही कंडक्टर महाचालु असतात, लोकांचे तिकिट दिल्यानंटर सुट्टे पैसे देण्याचे टाळतात, आणि मग लोकांच्या विसरण्याच्या गुणांमुळे ते पैसे त्यंनाच मिळुन जातात. मी तर असे अनेक वेळा एक्-दोन रुपये विसरुन गेलो आहे. प्रत्येक वेळी पैसे विसरल्यावर आता पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवायचे ठरवतो, आणी पुढच्या वेळि कंडक्टर पैसे उतरतांना घ्या असे सांगितले की उतरे पर्यंत पैसे घेउयात, नाही दिल्यास त्याची तक्रार करुयात वैगरे अनेक कल्पना सुचुन जातात, आणि नेमका तो कंडक्टर प्रामाणिक निघतो आणि आठवणीने पैसे देतो.

कंडक्टर मधे काही विशेष गुण असावे लागतात, या कंडक्टरची निवड प्रक्रिया कशी असते माहीत नाही पण मला वाटते त्यांना असे प्रश्न विचारत असावेत ,"अमुक गावावरुन तमुक गावा पर्यंत पाच फुल आणि तीन हाफ चे किती पैसे होतील", "... गावावरुन... गावाचे अंतर किती", "एक गाडी दोन तासाच्या प्रवासात पाच वेळा थांबली तर तिचा स्पीड ओळखा".. वैगरे. या कंडक्टर ना आपली पैशाची bag सांभाळण्याचे एक विशेष प्रशिक्षण देत असावेत कारण त्यात नेहमी एवढे पैसे असुनही ती bag चोरीला गेल्याचे मी तरी कधी ऐकले नाही, त्याच बस मधुन महीलांची पाकीटे पळविली जातात पण कंडक्टरची bag मात्र सुरक्षीत असते. कंडक्टर च्या व्यवसायात वेंधळेपणा आजिबात चालत नसेल्कारण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तिकिटाचे पैसे जमा करतांना तिकिटे आणि पैसे यांचा हिशोब जुळलाच पाहीजे.

कंडक्टरच्या जीवनात हाल सुद्धा कमी नसतात. कामाचे तास कमी जास्त होत रहातात, गाडीतच झोपावे लागते,जेवण कुठे आणि कसे मिळेल याची शाश्वती नाही, गाडी कितिही निसर्गरम्य स्थळामधुन जात असेल तरीही बाहेर लक्ष देता येत नाही, गाडीत झोपता सुद्धा येत नाही, नेहमी लक्ष प्रवाश्यांकडेच, घरापासुन बर्‍याचदा दुर रहाणे, मुलांकडे दुर्लक्ष असे एक ना दोन अनेक समस्या असतात.

चित्रपट सृष्टीचे सुद्धा या कंडक्टर कडे लक्ष जात असते, मेहमूद ने साकारलेला कंडक्टर आपणा सर्वांना
आठवत असेल. मराठी चित्रपटातुन तर नेहमी कंडक्टरची व्यक्तीरेखा हमखास आढळते. आणि तेच त्याची आपल्या जीवनातील अपरिहार्यता प्रकट करते. कंडक्टर कडे तसे विशेष कोणीही लक्ष देत नाही, कारण त्याच्या व्यतीरिक्त बघण्यासारख्या, विचार करण्या सारख्या अनेक गोष्टी असतात. थोड्या वेळाच्या प्रवासाचा सोबती असणार्‍या या कंडक्टर वर काही लिहावसं वाटला म्हणुन आपला हा छोटासा प्रयत्न..

सुभाष डिके

माझे सरसगड दुर्गभ्रमण

माझे सरसगड दुर्गभ्रमण

३१ डिसेंबरची रात्र सह्याद्रीवर साजरी करण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव तो बेत सिद्धीस जाउ शकला नव्हता. त्यामुळे २००६ चा पहीला रविवार तरी निदान सह्याद्रीसोबत घालवावा अशी इच्छा होती, त्यासाठी शनिवारी जी.एस. ला विचारले पण तो खुपच busy असल्यामुळे येउ शकणार नसल्याचं कळलं, पण माझं मन स्वस्थ बसु देईना. कुणी आलं नाही तर एकट्यानं का होईना पण या रविवारी कुठेतरी जायचचं असा निश्चय केला. आणि त्या दृष्टीने कुठे जाता येईल असा विचार सुरु केला असता सर्वात प्रथम सरसगडाचं नाव डोळ्यासमोर आलं. मागच्या वेळी आम्ही सरसगड सर करायला गेलो असतांना एक छोटासा अपघात घडल्यामुळे ट्रेक अर्धवट सोडुन परतावं लागलं होतं त्यामुळे एकट्याने जाउन हा ट्रेक करण्याकडे मन झुकले आणि मी सरसगडावर जाण्याचं नक्की केलं.
सकाळी साडेसात-आठच्या आसपास घराच्या अगदी बाजुला खोपोली नगरपरिषद परिवहनाची लोणावळा खोपोली ही बस पकडली आणि साधारण नऊ वाजता खोपोलीमधे पोहोचलो. सरसगड हा किल्ला अष्टविनायकापैकी एक असणाया पाली गावात आहे. त्यामुळे पाली गावात जाण्यासाठी खुप बस मिळतील अशी माझी समजुत होती. खोपोलीमधुन पाली गावात जाण्यासाठी बसची वाट पहात होतो पण खुप वेळ झाला तरी कुठलीच बस मिळेना पण शेवटी पुणे-रोहा पालीमार्गे अशी एक तुडंब भरलेली बस मिळाली. बरेच दिवस झाले एवढे अंतर बसमधुन उभे राहुन जाण्याचा प्रसंग आला नव्हता आता दुर्गभ्रमणामुळे ती वेळ आली होती. मग अत्यंत खराब अशा रस्त्यातुन पालीगावाकडे प्रवास सुरु झाला. अर्थात उभा राहणायांना बसणायापेक्षा कमी धक्के बसत होते. कशिबशी गाडी साडेअकराच्या आसपास पाली गावात पोहोचली. उतरल्याबरोबर भुकेची जाणीव झाली मग लगेचच एका हॊटेलमधे जाउन पोटपुजा करायला सुरुवात केली. बाजुच्याच टेबलवरची काही मंडळी होटेल मालकाला 'गडावर कसे जायचे?','पाण्याचं सोयं काय?' वैगरे प्रश्न विचारत होते. त्यावरुन ती ट्रेकर मंडळी आहेत हे मी ओळखले आणी पुढे होउन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पांमधे कळले की त्यांचा सिंहगड ग्रुप नावाचा ग्रुप होता आणि नुकताच सरसगड उतरुन आता ते सुधागडावर निघाले होते. जवळपास पन्नास जण होते आणि निघतांना मला त्यांनी चला तुम्ही सुद्धा सुधागडावर आमच्या बरोबर असा आग्रह केला पण माझ्या मनात एकट्याने सरसगड सर करण्याचा निश्चय असल्यामुळे त्यांना नकार द्यावा लागला. मग त्यांना शुभेच्छा देउन मी निघालॊ.
मागच्या वेळी मी येउन गेलेला असल्यामुळे मला गडावर जाण्याचा रस्ता ठाउक होता पण तरी खात्री करावी म्हणुन मी एका गावकयाला रस्ता विचारुन घेतला. आणि त्याने सांगितलेल्या वाटेवरुन पुढे निघालो. सरसगडावर जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. पहिल्या वाटेवरुन जाण्यासाठी पाली गावात यावे लागते. गणपतीच्या मागच्या बाजुने जाणाया रस्त्यावरुन डाव्या बाजुला वळावे आणि समोर एक वाट सोंडेवर जातांना दिसते ती सरळ बुरुजाच्या पायथ्याशी घेउन जाते. दुसरा रस्ता म्हणजे पाली च्या साधारण १ कि.मी. अलिकडे तळई नावाचे एक गाव लागते त्या गावातुन सुद्धा गडाच्या सोंडेवर चढता येते. पाली गावातुन जाणाया रस्त्याने गेल्यास बुरुजावर जाण्यासाठी पायया लागतात आणि त्या पायया ओलांडुन गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तळई मधुन जाणाया रस्त्याने गेल्यास मात्र बुरुजावर जाण्यासाठी बांधलेल्या पायया नाहीत पण कातळात काही खोबणी आहेत त्यामधुन चढावे लागते. मी पाली गावातल्या रत्याने निघालो आणि मुख्य सोंडेवर येउन पोहोचलो. आता खाली पाली गाव दिसत होते आणि समोर सरसगडाचे बुरुज. सरसगडावर झाडांची संख्या खुपच कमी आहे आणि जी थोडेसे झाडे आहेत ती सुद्धा खुरटे. आणि होते नव्हते तेवढे गवत सुद्धा जाळून टाकलेले दिसत होते. त्यामुळे सावली साठी कुठे थांबण्याची सुद्धा सोय नव्हती आणि उन्हाचा मात्र जबरदस्त तडाखा होता. भर दुपारी बारा वाजताच्या सुमारास कडक उन्हात चढणे अतिशय अवघड जात होते. थकल्यानंतर खाली सुद्धा बसता येत नव्हते आणि तशाच परिस्थीत पुढे चालावे लागत होते.
मी माझ्याबरोबर पाण्याचा चार बाटल्या घेउन जात होतो पैकी एक बाटली केंव्हाच संपली होती. थोडेसे पुढे गेल्यावर एक थोडेस बरे वाटावे असे झाड दिसले मग झपाट्याने ते झाड गाठले. त्याच्या सावलीत जाई पर्यंत एवढा थकवा जाणवत होता की पोहोचल्याबरोबर स॔क फेकुन देउन आडवा झालो. बराच वेळ त्याच स्थितीत राहिल्यानंतर अजुन पुढे जायचे आहे ही जाणिव झाली मग पुन्हा निघालो तेवढ्यात 'गडावर चाललात की काय?, थांबा मी पण येतो' असा एक प्रश्न ऐकु आला वळुन बघितले तर एक गावकरी हातात एक प्लास्टीक पिशवी घेउन येत होता. त्याच्याशी बोलतांना कळले की गडावरील दर्गा आणि मंदिर यांची पुजा करण्याचं काम त्याच्याकडे होतं आणी त्यासाठी तो निघाला होता. मग आम्ही दोघे निघालो. एकट्याने जाण्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही असा विचार माझ्या मनात सुरु असतांनाच लगेच मला तो बरोबर असल्याबद्दल बरं वाटलं कारण पुढच्याच वळणावर एका बोरीच्या झाडाकडे तो मला घेउन गेला. काय गोड बोरं होती, वा, त्या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे चालायला लागलो. पण थोड्याच वेळात माझा स्पीड बघुन तो वैतागला असणार कारण मी पुढे जातो तुम्ही या हळुहळु असं म्हणून तो झपाझप चालत निघुन गेला आता मी बुरुजाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो होतो.

समोर त्याच त्या पायया दिसत होत्या ज्यांनी आमचा मागचा ट्रेक पुर्ण करु दिला नव्हता. पुन्हा एकदा उन्हाने त्रास होऊ लागला.यावेळी मात्र खुप जास्त त्रास जाणवत होता. पायया चढायला सुरुवात केली खरी पण त्यावर हात टेकवताच चटका बसत असे आणि खाली सुद्धा बसवत नव्हते साधारण पाच दहा पायया चढुन गेल्यावर मात्र शरिराने लढा पुकारला आणि मस्तकात एक जोरदार सणक भरली. पुढच्या पायरीवर ब॔ग फेकुन देउन मी त्याच परिस्थीत एका पायरीवर आडवा झालो. दोन क्षण काहीच कळेना झटकन ब॔गेतुन एक पाण्याची बाटली काढुन डोक्यावर ओतली. त्याच अवस्थेत काही वेळ पडुन राहिलो पण जास्त वेळ बसणे शक्य नव्हते कारण मी अजुनही उन्हात होतो. मग उरलेले पाणी रुमालावर टाकुन तो रुमाल डोक्याला घट्ट बांधला टोपी चढवली आणी सावकाश एक एक पायरी चढत कसाबसा वरच्या पायरी पर्यंत पोहोचलो पुढे दरवाज्याच्या बाजुला पहारेकयांच्या देवड्या आहेत त्याच्या सावलीत जाउन शांत बसलो. बराच वेळ तेथे थांबल्यानंतर जरा आराम वाटला मग पुढे निघाल्यानंतर लगेचच आलात का म्हणुन एक हाक एकु आली बघतो तर थोड्यावेळापुर्वी भेटलेला गावकरी वर दर्गाच्या बाजुला बसला होता. मग मी बुरुजाला वळसा घालुन उजव्या बाजुने निघालो. आता मी बरोबर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो. समोर एक छोटीशी गुहा होती त्याच्या उजव्या बाजुला पाण्याचे एक टाके होते. त्या गुहेत एक पीराचे थडगे होते. जेमतेम एक व्यक्ती बसु शकेल एवढेच उंची होती त्या गुहेची. मी शांत अशा त्या गुहेत जाउन बसलो. नुकतीच त्याने पुजा केलेली असल्याने अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता बाजुच्या पाण्यामुळे ती गुहा जास्तच थंड होती त्यामुळे एकंदरीत खुपच शांतता लाभली होती त्या क्षणी. त्या जादुई क्षणात काही काळ बसल्यानंतर पुढे निघालो. बालेकिल्ल्याच्या खालुन उजव्या बाजुने वळसा घालुन पुढे जात असतांना डाव्या बाजुला एक खोल अशी गुहा आढळली, एखाद्या थिएटरची बेसमेंट पार्किंग शोभावी अशी ती गुहा होती. तिन उंच दगडी खांब आणि दोन भागात विभागणी. पैकी एका भागात एक मोठी दगडी चुल सुद्धा होती.
पुढे वळसा पुर्ण झाल्यावर तळई गावातुन येणायावाटेच्या बरोबर वर येउन पोहोचलो. बुरुजावरुन ती वाट दिसत होती आणि मला चढतांना खुप त्रास झाल्यामुळे ही वाट त्याप्रमाणात सोपी वाटत होती. बुरुजाच्या बरोबर बाजुला एक पाण्याचे टाके आहेत गडावरील अनेक पाण्याच्या टाक्यापैकी एवढे एकच टाके पिण्याच्या पाण्याचे आहे. एकदम थंड पाण्याने सर्व थकवा निघुन गेला. तिकडुन पुढे निघाल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता दिसतो. त्यावरुन बालेकिल्ल्यावर जायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी अनेक झाडे आहेत.त्यांच्या सावलीतुन चालत बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर लगेचच एक आधुनिक बांधणीचा दर्गा नजरेस पडतो. दर्ग्याच्या उजव्या बाजुला एक छान तळे आहे आणी त्या तळ्याच्या बाजुला एक शंकराचे मंदिर आहे. या तळयत एवढे कमळ फुलले होते की त्या कमळांना बघताच चढाईचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मग गडावर फेरी मारायला सुरुवात केली. गडमाथा एकदम आटोपशीर आहे. एक मंदिर एक दर्गा. मंदिराच्या बाजुला उभे राहुन बघितले की एका बाजुला पाली गाव, अंबा नदी, जांभुळ्पाडा, आणि कुठेलेसे एक धरण दिसते. दुसया बाजुला सह्याद्रीच्या रांगा छान दर्शन देउन जातात. दुरवर दिसणार्या अनेक रांगामधुन मला फक्त तेलबैला त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे ओळखता आला. पुन्हा मंदिराच्या बाजुला एका झाड्याच्या सावलीत तळ्यातल्या पाण्यात पाय टाकुन विसावलो. सोबत आणलेला खाउचा आस्वाद घेत असतांनाच लहान मुलांचा आवाज ऐकु आला. समोरुन दहा बारा लहान मुले येत होती. त्यांच्या मागुन एक गृहस्थ आले. चौकशी नंतर कळले की ते स्वतः IDBI मधे असुन ती सर्व मुले एका तायक्वांदो क्लासेसचे विद्यार्थी होते. मग त्यांच्या बाललीला बघण्यात बराच वेळ घालवला आणी मग परतायला सुरुवात केली. उतरांना मात्र फार त्रास झाला नाही. बालेकिल्ला उतरल्यानंतर पुन्हा खालच्या पाण्याच्या हौदातुन पाणी भरुन घेतले आणी उतरायला सुरुवात केली. पुन्हा बुरुजावर पोहोचल्यानंतर पाययावर बसलो. आता मात्र त्या पायया खुपच मोहक वाटत होत्या. आणि त्यांच्या भव्यतेची खात्री पटत होती. समोर खुपच छान दृश्य दिसत होते. ते दृश्य डोळ्यात साठवत एक एक पायरी उतरलो आणि डोंगर उतरावरुन पळत सुटलो.
खाली सोंडेच्या पायथ्याशी पोहोचलो तेंव्हा मागे वळुन बघितले. डोळे भरुन सरसगड बघितला. मनातील भावना शब्दांच्या पलिकडे गेलेल्या होत्या. आनंद, समाधान यांच्या पुढे थकवा काहीच नाही हे जाणवत होते. स्वर्गीय सुखाचा आनंद भरभरुन उपभोगायला मिळाला. गावात उतरल्याबरोबर हातपाय धुवुन बल्लालेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन घेउन सभामंडपात बराच वेळ बसलो. त्या संपुर्ण दिवसाचा तो कळस होता. उठावेसे वाटत नसतांना सुद्धा पोटाची मागणी झाल्यामुळे उठावे लागले. बाजुच्याच सुखसागर नावाच्या होटेल मधे जाउन जेवणावर आडवा हात मारला आणि पाली-खोपोली बस पकडुन खोपोलीत पोहोचलो. खोपोलीतुन लोणावळ्यात पोहोचण्यासाठी असणारी शेवटची बस मात्र चुकली होती त्यामुळे पुन्हा बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली आणी शेवटी रात्री नऊ वाजता लोणावळ्यात येउन पोहोचलो. घरात शिरल्याबरोबर हर्षातिरेकाने उडी मारली. सकाळी घरातुन निघतांना अनेक प्रश्न मनात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवुन पोहोचलो होतो. सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, सरसगड एकट्याने पुर्ण केल्याचा आनंद, मागच्या वेळी अर्थवट सोडलेला सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, अशा अनेक गोष्टी मला मिळाल्या होत्या. आणि कदाचित म्हणुनच सरसगडाचा फोटो wallpaper म्हणुन केंव्हाच set झालाय जो मला नेहमी माझ्या या आनंदयात्रेची आठवण देत राहील.

Covalent Bond


Covalent Bond


"Covalent Bond : Any atom of a molecule forms a bond with another atom to complete its octate, this bond is known as Covalent Bond"

मी दहावीच्या वर्गात विज्ञान शिकवत होते. नुकतीच मी या छोट्याश्या शहरातील शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणुन रुजु झाले होते आणि मला दहावीचा वर्ग मिळाला होता. हळुहळु विद्यार्थ्यांशी ओळख व्हायला सुरुवात झाली होती.

"तर अशा प्रकारे हा धडा संपला. कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारु शकता. उद्या येतांना व्यवस्थीत अभ्यास करुन या. मी एक छोटीशी चाचणी घेणार आहे. "

वर्ग संपवुन मी बाहेर आले आणि दुसर्‍या वर्गात निघाले तेवढ्यात मॅडम अशी हाक ऐकु आली. मी वळुन बघितले तर मृण्मयी मला बोलावत होती.

" मॅडम, मला काहीतरी विचारायच आहे तुम्हाला "
" काय गं मनु, काय प्रोब्लेम आहे. विचार ना "
" मॅडम मला जरा नेत्रदान कसे करतात त्याविषयी माहीती हवी होती. "

मी कौतुक मिश्रीत आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.

" माहीती सांगते मी तुला पण मला एक सांग, तुझ्या मनात कसा काय आला हा विचार आणि तुला जरा जास्तच विचार करावा लागेल कारण तु अजुन खुप लहान आहेस "

" खरं म्हणजे मी माझ्या डोळ्यासाठी नाही विचारत, पण मला केवळ माहीती पाहिजे. माझ्या आईचे डोळे दान करायचे आहेत. "
" मग त्यासाठी तुझ्या आईची समती हवी, तु एक काम कर तुझ्या आईला किंवा बाबांना माझ्याकडे पाठवुन दे मग मी स्वतःच देईन त्यांना हवी ती माहीती. "

" नाही मॅडम तुम्ही मलाच सांगा. माझे बाबा माझ्या लहानपणीच वारले आणि आईला मी स्वतःच सांगणार आहे. " तिच्या या वागणुकी बद्दल मला काहीच समजेना पण नाईलाजाने मी तिला सर्व माहीती सांगितली धन्यवाद म्हणुन ती पळाली. मी सुद्धा लगेचच पुढच्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमात मी पुन्हा अडकले. तिचा हा प्रश्न मी विसरुन सुद्धा गेले होते तर एक दिवस अचानक ती परत माझ्याकडे आली.

"मॅडम मला जरा किडनी कशी दान करतात ते सांगाल काय.. " आता मात्र मी उडालेच, " काय किडनी दान, अगं वेडी बिडी झालीस काय तु, तु अजुन दहावीतच आहेस आणि कशाला हवी गं तुला ही सर्व माहीती. "
" मॅडम माझ्या आईची एक किडनी दान करावयाची आहे. "
" तसं पहाता ही खुप चांगली गोष्ट आहे पण किडनी दान करण्याचा निर्णय तुझ्या आईने का व कशासाठी घेतला ते सांगु शकशील काय. "
" मॅडम तुम्ही फक्त मला माहीती सांगा. "
" ते काही नाही. तु मला अगोदर सांगितलेच पाहीजे कशासाठी माहीती विचारतेयस ते. "
" मडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला माहीती सांगा. " मी तीला परत सर्व माहीती सांगितली पण या वेळी माझं मन मला स्वस्थ बसु देईना. मी तिच्या आईची भेट घेण्याचं ठरवलं. पण विशेष गोष्ट म्हणजे हुशार आणि लोकप्रिय असलेल्या मृण्मयीचं घर मात्र कुणालाही ठावुक नव्हतं. मुलींच म्हणण होतं की तिने कधीही कुणाला तिच्या घराविषयी काही सुद्धा सांगितलं नव्हतं. शेवटी मी शाळेच्या रजिस्टर मधे तिचा पता शोधायला घेतला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मृण्मयीच्या नावापुढे स्थानीक पालक म्हणुन दुसर्‍याच कुणाचं तरी नाव नोदवण्यात आलं होत. मला काहिच कळेना, मनु आपले वडिल वारले असं काय सांगतेय विचित्र प्रश्न काय विचारतेय. नुसता गोंधळ उडाला होता. त्या पत्त्यावर मी जाउन पोहोचले.

मोठं प्रशस्त घर होत. मी जाताच एक चाळिशीतले गृहस्थ माझ्यासमोर आले. त्यांच नाव ऐकल्यावर मला कळलं की मनुचे स्थानिक पालक ते हेच.

" नमस्कार तुमच्या मुलीची विज्ञान शिक्षिका. मला जरा तुम्हाला काहिसे प्रश्न विचारायचे होते. "
" मडम मी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की मनु माझी मुलगी आहे पण ती माझी मुलगी नाही.
गोधळलात ना. निट सांगतो म्हणजे कळेल. मनु माझ्या मित्राची मुलगी. माझ्या जिवलग मित्र अजय आणि त्याची बायको यांची एकच आवड होती ती म्हणजे समाज सेवा. आणि याच आवडीपायी बाळंतपण शहरात करायचे सोडुन ती दोघे एका खेड्यातील वृद्धाश्रमात गेले. अपुर्‍या वैद्यकीय सोयीमुळे मनुच्या जन्माच्या वेळी तिची आई हे जग सोडुन गेली, पुढे अजय तिला घेउन परत आला. आणि एकाच वर्षात तो सुद्धा गेला. दैवाचा खेळ बघा मरे पर्यंत समाजासाठी काम करणार्‍या अजय च्या मुलीसाठी कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने शेवटी मी तिला घेउन आलो, मनुच्या नावापुढे मी अजयच नाव ठेवलं. मनुला मी घेउन आलो तेंव्हा ती एक वर्षाची होती आणि माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं म्हणुन मी ऑफिसला जातांना मनुला बाजुच्या एका आश्रमात सोडुन जात असे. मनु आई बाबांप्रमाणे त्यांच्यात रमली. आजही ती घरात फक्त काही वेळच असते आणि इतर सर्व वेळ ती आश्रमातच असते. "

मनुचं मला कौतुक वाटल.

" पण मी तुमच्या कडे आले ते एका वेगळ्या संदर्भाने. मनु मला काहीसे विचित्र प्रश्न विचारत असते. एत्रदान, किडनीदान वैगरे.. "

" तुम्ही जरा माझ्या बरोबर चला.. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. "

मी त्यांच्यामागुन निघाले. बाजुलाच एक आश्रम होता. तिथेच एका खोलीच्या दरवाज्याजवळ आम्ही दोघे थांबलो. खिडकीतुन आत डोकावले तर दिसले की मनु एका वृद्धेला मांडिवर घेउन काहीतरी समजावीत होती.

" आजी तु घाबरु नकोस अगं उलट तुला आनंद व्ह्यायला हवा, आज तुझ्या मुळे कुणाला तरी जीवन दान मिळणार आहे, तुला आठवतं की डॉक्टरांनी तुझ्या किडनीचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होत ते ऑपरेशन यशस्वी झालंय आणि तुझी एक किडनी काढुन दान करण्यात आली. किडनी दान म्हणजे.... " मनु मी सांगितलेला एक एक शब्द बोलत होती,

" बघितलंत मडम, मागे असेच एकदा एका आजोबांचा एक डोळा अचानक निकामी झाला, तर मनुने त्यांना नेत्रदाना विषयी माहीती सांगितली आणि त्यांच्या दुःखावर एक फुंकर मारली, कारण गेलेला डोळा परत तर मिळणार नव्हताच उलट आपण कुणाच्या तरी कामी येउ शकलो अशी त्यांची भावना झाली आणि त्यांना परत त्यांच्या जिवनातला आनंद मिळाला. कदाचित मनुचं खोटं बोलण तुम्हाला खटकत असेल पण त्या बोलण्या मागे दुसर्‍यांना निखळ आनंद देण एवढा एकच उद्देश असतो. आपण अगदिच निकामी आहोत ही भावना त्यांच्या मनात निर्माणंच न होउ देण, मला वाटतं हेच खरं मनुच्या कामात फलीत. "

आतुन दोघींच्या हसण्याचा आवाज आला आणि माझ्या डोळे नकळत पाणावले, Covalent Bond चा खरा अर्थ मला समजत होता. आपल्या जीवनातील हिस्सा मनुने अशा प्रकारे दुसर्‍याबरोबर वाटुन घेउन जो बंध निर्माण केला होता तोच Covalent Bond

---------------- सुभाष डिके