कुसुमाग्रजांच्या कविता - आस्वाद घेण्यासाठी
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालोफ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्तचित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्रफ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
पृथ्वीचे प्रेमगीत
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू
तुझ्या मीकितीदा करु प्रीतीची याचना
नव्हाळीतले ना उमाळे उसासेन
ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे
परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण
निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ
परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर
गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
अमर्याद मित्रा तुझी थोरवी
अन्मलाज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण
साहिल के सुकून से हमे इन्कार नही, लेकिन तूफानों से कश्ती निकालने का मजा ही कुछ और है..
Tuesday, February 20, 2007
Tuesday, January 16, 2007
पुरंदर दुर्गभ्रमण
नेहमीप्रमाणे या रविवारी सुद्धा कुठेतरी दुर्गभ्रमणासाठी जायचे असे ठरवले होते. इतर सर्व मंडळी आपापल्या कामात खुपच व्यस्त असल्यामुळे या वेळी सुद्धा एकट्याने जावे लागेल असे लक्षात आले आणि पुन्हा एकदा जी.एस. चा सल्ला घेतला आणि पुरंदरला जावे असे ठरवले. सकाळी उन जास्त होण्याच्या अगोदर सुरुवात करावी असा विचार करुन पाच वाजता लोणावळ्यातुन निघण्याचा विचार होता पण दुर्दैवाने अगदी धावत पळत जाउन सुद्धा पाच वाजताची लोकल चुकली मग नाईलाजाने सहा वाजता सुरुवात करावी लागली. पुण्यातुन पुरंदरला जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे पुण्यातुन दिवे घाट मार्गे सासवडला यावे आणि तिकडुन सासवड - नारायणपुर गाडी मिळवुन नारायणपुरला पोहोचावे. नारायणपुर हे पुरंदराच्या पायथ्याचे गाव, तेथील दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातुन थेट नारायणपुरला जाण्यासाठी सुद्धा गाडी मिळते. पुरंदरासाठी दुसरा मार्ग म्हणजे पुणे बंगलोर हायवे वर कापुरहोळ नावाच्या गावात पोहोचावे, आणि तिकडुन नारायणपुरला येण्यासाठी गाडी पकडावी. मी पुण्यात पोहोचल्यानंतर सासवड मार्गे नारायणपुरला पोहोचलो. मी पोहोचलो तेंव्हा साधारण दहा वाजले होते. नारायणपुरमधुन पुरंदरला जाण्यासाठी एक मोठा रस्ता मिळतो. हा वळवळणाचा रस्ता थेट आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी घेउन जातो. या रस्त्याने गाडी घेउन सुद्धा जाता येते. मी मात्र गावातुन जाणारा दुसरा एक छोटा रस्ता निवडला होता. हा रस्ता जंगलातुन जातो आणि थेट दरवाजा जवळ गावातुन येणार्या रस्त्याला जावुन मिळतो. या रस्त्याने गेल्यास अवघ्या पाउण तासात बिनिदरवाजावर पोहोचता येते. मी या रस्त्यावरुन निघालो. गावातुन निघुन पुढे अर्धा रस्ता संपेपर्यंत उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता. मागच्या वेळच्या अनुभवावरुन मी एकदम तयारी करुन गेलो होतो त्यामुळे उन्हापासुन चांगले संरक्षण झाले. पुढे मात्र दाट झाडी लागली, कडक उन्हातुन छान सावलीत आल्यानंतर खुप बरं वाटलं त्यामुळे पहिल्याच झाडाच्या सावली बराच वेळ बसलो. आता दरवाजा जवळच वर दिसत होता. झपाझप चालत जाउन दरवाजा गाठला, मागे वळुन बघितल्यावर दुरुन नारायणपुर मधुन येणारा वळणावळणाचा रस्ता दिसत होता. मधल्या रस्त्याने आल्यामुळे माझा वेळ आणि श्रम दोन्ही वाचल्याचं लक्षात आले.
आता समोर बिनि दरवाजा दिसत होता. दरवाजातुन आत गेल्याबरोबर डाव्या बाजुला एक छान जुने चर्च दिसले. उजव्या बाजुला थोडेसे मागे आल्यानंतर मुरारबाजीचा लढाईच्या आवेशातील पुतळा दिसला. पुतळ्याकडे बघुन खरोखर अंगावर रोमांच उभे राहतात. दोन सैनिक त्या पुतळ्याच्या आजुबाजुला आधुनिक चित्रकलांचे नमुने स्वच्छ करण्याचं काम करत होते. पुन्हा चर्चजवळ येउन पुढे निघालो. तेवढ्यात तिकडे आलेल्या एका कुटुंबाकडे माझे लक्ष गेले. त्या काकांनी लगेचच मला कुठुन आलास, एकटाच का आलास वैगरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग चला बरोबरच जाउ असा विचार त्यांनी मांडला, सोबत मिळते आहे हे लक्षात घेउन मी सुद्धा होकार दिला. पुढे गेल्यावर उजव्या बाजुला पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची बांधणी खुपच सुबक अशी आहे, आणि परिसरातील भरगच्च झाडांनी एकुणच शोभा वाढलेली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यावर त्या सोबत आलेल्या काकांबरोबर झालेल्या चर्चेतुन त्यांची ओळख झाली आणि त्यांची सोबत लाभलेचा मला खुपच आनंद झाला. कारण ते स्वतः एका माध्यमिक शाळेत शिक्षक असुन १९८२ सालापासुन नियमीत दुर्गभ्रमण करत आहेत. एकट्याने, कुटुंबाबरोबर, ग्रुपबरोबर अश्या सर्वप्रकारांनी त्यांनी किल्याच्या भ्रमंती केलेली आहे. आजवर त्यांनी अनेक किल्ले अनेक वेळेला बघितले होते. राजगड, रायगड हे किल्ले तर सर्व मोसमात, सर्व वेळात, सर्व बाजुंनी असे पुर्ण केलेले आहेत. स्वतः शिवाजी चरित्रावर अभ्यास करत असुन, याच विषयावर त्यांनी व्याख्यान सुद्धा केलेली आहेत, त्याच बरोबर आध्यात्मिक प्रवचन सुद्धा करतात. या वेळी पुरंदरवर येण्याची सातवी - आठवी वेळ होती आणि प्रयोजन म्हणजे आपल्या कन्येचा अठरावा वाढदिवस इतिहासाच्या साक्षीने साजरा करण्यासाठी त्यांनी ही पुरंदरवारी केली होती. विशेष म्हणजे त्यांचं पुर्ण कुटूंबीय सुद्धा अगदी उत्साहात त्यांच्या सोबत आलेले दिसत होते. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचं मला विशेष कौतुक वाटलं आणि अशा माणसाची संगत मिळणे म्हणजे पर्वणीच. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पुरंदरेश्वराच्या उजव्या बाजुने एक वाट थेट बालेकिल्ल्यावर घेउन जाते. त्या वाटेने चालत थोड्याच वेळात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे, आणि वळण घेतल्यावर लगेचच दिल्ली दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अगदी समोर बुरुजात एक मारुतीची मुर्ती आहे. वर गेल्यावरोबर दिल्ली दरवाजात बसुन काकांच्या खणखणीत आवाजात शिवचरित्रातील काही भाग ऐकणे हा पुर्ण दिवसातील परमोच्च भाग होता. तिकडुन पुढे निघाल्यावर अत्यंत उत्साहात पुरंदराची कथा सांगत होते. त्यांच्या इतर ट्रेक च्या आठवणी, वैद्य सर नावाचे त्यांचे सहकारी यांच्या आठवणी, अनेक किल्ल्यांवर आलेले अनुभव या सर्व गोष्टी अगदी तन्मयतेने सांगत होते. दिल्ली दरवाजातुन पुढे गेल्यावर सरळ केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. मी एकटा असतो तर कदाचित याच वाटेने गेलो असतो, पण काका मला खाली केदार दरवाजा बघुन येउ असा आग्रह करत तिकडे घेउन गेले.
तटबंदिच्या बाजुने जात आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. वाटेत आम्हाला सातारा येथुन आलेला 'रानवाटा' नावाचा पंधरा वीस जणांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्याशी सुद्धा काकांची ओळख होती. पुढे चालत जाउन आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. दरवाजा एकेकाळी बंद करुन ठेवल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजुने माती ढासळलेली होती. केदार दरवाजा मधुन बाहेर निघुन बघितले. समोर एक सुंदर पठार दिसत होते. पुर्ण पुरंदराच्या बाजुने जीप जाईल एवढी मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे, मिलिटरीच्या ताब्यात पुरंदर असतांना या सर्व व्यवस्था केल्याचं कळलं. मग पुन्हा केदारेश्वराच्या मंदिराकडे निघालो. केदारेश्वराच्या मंदिराकडे जातांना काही पायया लागतात. त्या चढुन जातांना तुला पांडवांच्या स्वर्गारोहणाचा अनुभव येईल असं मला काकांनी सांगितलं, त्याचा मला काही अर्थ कळला नाही. मात्र त्या पायर्या चालु लागताच मला त्याचा अर्थ कळून आला. पाययाच्या दोन्ही बाजुने उंच भिंती आहेत त्यामुळे त्यांच्यामधुन चालतांना दोन्ही बाजुचे काहिही दिसत नाही, आणि समोर सुद्धा काही दिसत नाही वर फक्त आकाश दिसते. त्यांची ही उपमा मला खुपच आवडली. केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. हे पुरंदरावरील सर्वोच्च ठिकाण आहे. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजुला गेल्याबरोबर समोर सिंहगड, राजगड, आणि तोरणा अगदी चटकन ओळखु येत होते. पुरंदराचा शेंदरया बुरुज, खंदकडा हा सर्व भाग दिसत होता. हे सर्व बघितल्यानंतर मंदिराच्या सावलीतच जेवणाला सुरुवात केली. एवढा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यामुळे मला वेगळे जेवण करु देणे शक्यच नव्हते. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडुन निघालो. आता पुन्हा दिल्ली दरवाजा जवळ आल्याबरोबर परत राजगादी बघण्यासाठी मागे निघालो. राजगादी ही जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. तिकडे पोहोचल्यावर मात्र थोडासा भ्रमनिरास झाला आणि वाईट सुद्धा वाटलं. छत्रपतींच्या प्रथम पुत्र, स्वराज्याचे युवराज, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्मस्थळाची ही अवस्था. आज तिकडे फक्त तटबंदी शिल्लक आहे. तिकडुन माघारी फिरल्यानंतर पुन्हा दिल्ली दरवाजावर पोहोचलो. आता बालेकिल्ला उतरुन निघायला सुरुवात केली. खाली उतरल्यावर वज्रगडावर जाण्याची अत्यंत इच्छा होती पण वेळ शिल्लक नसल्याने आता माघारी परतावे लागणार होते. मग परत आम्ही बीनी दरवाजावर पोहोचलो. परत एकदा मुरारबाजीचा पुतळा बघितला आणि दरवाजातुन मागे परतायला सुरुवात केली. संपुर्ण दिवस अगदी मनासारखा गेल्याने उतरतांना खुप समाधान जाणवत होते. पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिर आणि शिवमंदिर बघितले. मग पुण्याकडे जाण्याअगोदर जवळच असलेल्या बालाजीचं दर्शन घेतले आणि संध्याकाळी पुण्यात येउन पोहोचलो. संपुर्ण दिवसभराच्या श्रमाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. आणखी एक रविवार अतिव आनंद आणि समाधान देउन संपत होता.
आता समोर बिनि दरवाजा दिसत होता. दरवाजातुन आत गेल्याबरोबर डाव्या बाजुला एक छान जुने चर्च दिसले. उजव्या बाजुला थोडेसे मागे आल्यानंतर मुरारबाजीचा लढाईच्या आवेशातील पुतळा दिसला. पुतळ्याकडे बघुन खरोखर अंगावर रोमांच उभे राहतात. दोन सैनिक त्या पुतळ्याच्या आजुबाजुला आधुनिक चित्रकलांचे नमुने स्वच्छ करण्याचं काम करत होते. पुन्हा चर्चजवळ येउन पुढे निघालो. तेवढ्यात तिकडे आलेल्या एका कुटुंबाकडे माझे लक्ष गेले. त्या काकांनी लगेचच मला कुठुन आलास, एकटाच का आलास वैगरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग चला बरोबरच जाउ असा विचार त्यांनी मांडला, सोबत मिळते आहे हे लक्षात घेउन मी सुद्धा होकार दिला. पुढे गेल्यावर उजव्या बाजुला पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची बांधणी खुपच सुबक अशी आहे, आणि परिसरातील भरगच्च झाडांनी एकुणच शोभा वाढलेली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यावर त्या सोबत आलेल्या काकांबरोबर झालेल्या चर्चेतुन त्यांची ओळख झाली आणि त्यांची सोबत लाभलेचा मला खुपच आनंद झाला. कारण ते स्वतः एका माध्यमिक शाळेत शिक्षक असुन १९८२ सालापासुन नियमीत दुर्गभ्रमण करत आहेत. एकट्याने, कुटुंबाबरोबर, ग्रुपबरोबर अश्या सर्वप्रकारांनी त्यांनी किल्याच्या भ्रमंती केलेली आहे. आजवर त्यांनी अनेक किल्ले अनेक वेळेला बघितले होते. राजगड, रायगड हे किल्ले तर सर्व मोसमात, सर्व वेळात, सर्व बाजुंनी असे पुर्ण केलेले आहेत. स्वतः शिवाजी चरित्रावर अभ्यास करत असुन, याच विषयावर त्यांनी व्याख्यान सुद्धा केलेली आहेत, त्याच बरोबर आध्यात्मिक प्रवचन सुद्धा करतात. या वेळी पुरंदरवर येण्याची सातवी - आठवी वेळ होती आणि प्रयोजन म्हणजे आपल्या कन्येचा अठरावा वाढदिवस इतिहासाच्या साक्षीने साजरा करण्यासाठी त्यांनी ही पुरंदरवारी केली होती. विशेष म्हणजे त्यांचं पुर्ण कुटूंबीय सुद्धा अगदी उत्साहात त्यांच्या सोबत आलेले दिसत होते. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचं मला विशेष कौतुक वाटलं आणि अशा माणसाची संगत मिळणे म्हणजे पर्वणीच. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पुरंदरेश्वराच्या उजव्या बाजुने एक वाट थेट बालेकिल्ल्यावर घेउन जाते. त्या वाटेने चालत थोड्याच वेळात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे, आणि वळण घेतल्यावर लगेचच दिल्ली दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अगदी समोर बुरुजात एक मारुतीची मुर्ती आहे. वर गेल्यावरोबर दिल्ली दरवाजात बसुन काकांच्या खणखणीत आवाजात शिवचरित्रातील काही भाग ऐकणे हा पुर्ण दिवसातील परमोच्च भाग होता. तिकडुन पुढे निघाल्यावर अत्यंत उत्साहात पुरंदराची कथा सांगत होते. त्यांच्या इतर ट्रेक च्या आठवणी, वैद्य सर नावाचे त्यांचे सहकारी यांच्या आठवणी, अनेक किल्ल्यांवर आलेले अनुभव या सर्व गोष्टी अगदी तन्मयतेने सांगत होते. दिल्ली दरवाजातुन पुढे गेल्यावर सरळ केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. मी एकटा असतो तर कदाचित याच वाटेने गेलो असतो, पण काका मला खाली केदार दरवाजा बघुन येउ असा आग्रह करत तिकडे घेउन गेले.
तटबंदिच्या बाजुने जात आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. वाटेत आम्हाला सातारा येथुन आलेला 'रानवाटा' नावाचा पंधरा वीस जणांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्याशी सुद्धा काकांची ओळख होती. पुढे चालत जाउन आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. दरवाजा एकेकाळी बंद करुन ठेवल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजुने माती ढासळलेली होती. केदार दरवाजा मधुन बाहेर निघुन बघितले. समोर एक सुंदर पठार दिसत होते. पुर्ण पुरंदराच्या बाजुने जीप जाईल एवढी मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे, मिलिटरीच्या ताब्यात पुरंदर असतांना या सर्व व्यवस्था केल्याचं कळलं. मग पुन्हा केदारेश्वराच्या मंदिराकडे निघालो. केदारेश्वराच्या मंदिराकडे जातांना काही पायया लागतात. त्या चढुन जातांना तुला पांडवांच्या स्वर्गारोहणाचा अनुभव येईल असं मला काकांनी सांगितलं, त्याचा मला काही अर्थ कळला नाही. मात्र त्या पायर्या चालु लागताच मला त्याचा अर्थ कळून आला. पाययाच्या दोन्ही बाजुने उंच भिंती आहेत त्यामुळे त्यांच्यामधुन चालतांना दोन्ही बाजुचे काहिही दिसत नाही, आणि समोर सुद्धा काही दिसत नाही वर फक्त आकाश दिसते. त्यांची ही उपमा मला खुपच आवडली. केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. हे पुरंदरावरील सर्वोच्च ठिकाण आहे. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजुला गेल्याबरोबर समोर सिंहगड, राजगड, आणि तोरणा अगदी चटकन ओळखु येत होते. पुरंदराचा शेंदरया बुरुज, खंदकडा हा सर्व भाग दिसत होता. हे सर्व बघितल्यानंतर मंदिराच्या सावलीतच जेवणाला सुरुवात केली. एवढा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यामुळे मला वेगळे जेवण करु देणे शक्यच नव्हते. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडुन निघालो. आता पुन्हा दिल्ली दरवाजा जवळ आल्याबरोबर परत राजगादी बघण्यासाठी मागे निघालो. राजगादी ही जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. तिकडे पोहोचल्यावर मात्र थोडासा भ्रमनिरास झाला आणि वाईट सुद्धा वाटलं. छत्रपतींच्या प्रथम पुत्र, स्वराज्याचे युवराज, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्मस्थळाची ही अवस्था. आज तिकडे फक्त तटबंदी शिल्लक आहे. तिकडुन माघारी फिरल्यानंतर पुन्हा दिल्ली दरवाजावर पोहोचलो. आता बालेकिल्ला उतरुन निघायला सुरुवात केली. खाली उतरल्यावर वज्रगडावर जाण्याची अत्यंत इच्छा होती पण वेळ शिल्लक नसल्याने आता माघारी परतावे लागणार होते. मग परत आम्ही बीनी दरवाजावर पोहोचलो. परत एकदा मुरारबाजीचा पुतळा बघितला आणि दरवाजातुन मागे परतायला सुरुवात केली. संपुर्ण दिवस अगदी मनासारखा गेल्याने उतरतांना खुप समाधान जाणवत होते. पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिर आणि शिवमंदिर बघितले. मग पुण्याकडे जाण्याअगोदर जवळच असलेल्या बालाजीचं दर्शन घेतले आणि संध्याकाळी पुण्यात येउन पोहोचलो. संपुर्ण दिवसभराच्या श्रमाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. आणखी एक रविवार अतिव आनंद आणि समाधान देउन संपत होता.
Tuesday, January 02, 2007
विडंबन: अजुन तरी
सर्व वाचकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे.
मुळ कविता :
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥
आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥
कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥
कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥
कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...
विडंबन:
(आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न)
अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥
त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर
त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर
अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर
शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥
कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती
कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती
मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती
सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥
दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर
कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर
वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर
निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा'
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥
मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय
तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय
मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय
जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥
अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा
---- सुभाष डिके (कुल)
'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे.
मुळ कविता :
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥
आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥
कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥
कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥
कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...
विडंबन:
(आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न)
अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥
त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर
त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर
अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर
शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥
कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती
कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती
मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती
सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥
दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर
कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर
वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर
निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा'
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥
मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय
तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय
मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय
जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥
अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा
खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा
---- सुभाष डिके (कुल)
Tuesday, December 26, 2006
सिद्धगड
Tuesday, December 12, 2006
काही तुकडे
हत्तीची मूर्ती कशी बनवायची?
-सोपं आहे.. दगड घेउन त्यातला हत्तीसारखा न दिसणारा भाग छिन्नीने काढून टाकायचा.
एक सरदारजी बससाठी रांगेत उभा होता. त्याचा क्रमांक चौथा होता.त्याला हवी असलेली बस आली. बस रिकामी होती बर्यापैकी. पण सरदारजी बसमधे चढला नाही. मागे सरकला. का?
-बसवर 'दो या तीन..बस्स' लिहीले होते म्हणून.
एकदा हत्ती आणि मुंगी स्कुटरवर जात असतात.
त्याचा अपघात होतो
हत्ती मरतो, पण मुंगी वाचते...
ते कसं काय?
..... कारण तिनी हेलमेट घातलेलं असतं...
केनियामध्ये पोहोण्याचा तलाव बांधला तर त्याचे नाव काय ठेवावे?
"या डुंबा डुंबा"
एकदा एक डास आणि माशी लग्न करतात. त्यांच्या लग्नाला बरेच दिवस होतात पण त्यांना काहिच मूलबाळ होत नाही. का?
.
.
.
.
.
.
कारण ती माशी 'ओडोमॉस' लावून झोपायची .
प्र. : सुईच्या नेढ्यातून हत्ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे
पळापळ करत असेल .. तर त्याला कसं थांबवायचं?
उ. : त्याच्या शेपटीला गाठ मारून !
प्र. : एक माणूस काळा शर्ट , काळी पँट , काळा टाय , काळे मोजे , काळे बूट , काळी टोपी आणि दिसायलाही काळा असा रस्त्यानी चाललेला.. समोरून एक काळी गाडी येते आणि रस्ता ओलांडताना हा माणुस त्या गाडी समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या अग्गदी जवळ येऊन ती गाडी ब्रेक मारून थांबवली जाते.. अग्गदी थोडक्यात तो वाचतो.. रस्त्यावर लाईट वगैरे लावलेले नसतात.. मग हे कसं काय होतं?
उ. : कारण तेव्हा दिवस असतो !
प्र. : एका शर्यतीत एक मुलगा १५० मिनिटातच शेवटाला येतो आणि एक मुलगा मात्र अडीऽऽऽच तासानी कुठे धपापत शेवटाला येतो. तर कोण जिंकतं?
उ : दोघंही. कारण १५० मिनिट = अडीच तास.
प्र. : एक माणूस खूपच बुटका असतो. त्याचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर असतं. तो घरून बाहेर जाताना नेहमीच लिफ्ट वापरायचा पण बाहेरून घरी जायचं म्हटलं तर त्याची गंमत असायची.. ती म्हणजे.. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तो अर्धा भाग लिफ्टनी आणि बाकीचा भाग चालत चालत जायचा.. पण पावसाळ्यात मात्र घरापर्यंत लिफ्टनी जायचा तर असं का?
उ. : त्याची उंची कमी होती .. त्यामुळे त्याला खाली उतरायच्या वेळेस तळमजल्याचं बटन दाबणं जमायचं आणि तो थेट येऊ शकायचा. पण तेच खालून वर जाताना उंचीमुले हात न पुरल्यानी त्याच्या अपेक्षित मजल्याचं बटन दाबता न आल्यानी जेवढा हात पुरेल तेवढं करून ज्या मजल्यापर्यंत जाता येईल तितकं जाऊन तो बाकीचं चालत जायचा.. पण पावसाळ्यात छत्री सोबत असल्यानी त्याला त्याच्या मजल्याचं बटन दाबता येत असल्यानी तो तिथपर्यंत लिफ्ट वापरू शकायचा ! :)
एक माणूस ( तलावात बुडताना): वाचवा, मला पोहता येत नाही; मला पोहता येत नाही.
शेजारुन चाललेला सायकलस्वार चिडतो: काय रे ए, ओरडतो कशाला ? मलाहि पोहता येत नाही, मी ओरडतोय का ?
एकदा एका सुंदर उपवर खेकडीला बघायला एक खेकडा येतो. त्यांची प्रश्नोत्तरे वगैरे होतात. खेकडा पण चांगला असतो. खेकडीला आवडतो. मग शेवटची परिक्षा म्हणून खेकडी खेकड्याला म्हणते, 'चालून दाखव.त्या खांबापर्यंत जा.' खेकडा चालून दाखवतो. अगदी सरळ नाकासमोर चालत जाऊन खांबासमोर थांबतो. खेकडीण त्याला नाकारते. का बरे???
- ती म्हणते 'हा खेकडा दारु पितो.म्हणून सरळ चालतो.' (गृहित: नेहमीची खेकड्याची चाल वाकडी असते.)
-सोपं आहे.. दगड घेउन त्यातला हत्तीसारखा न दिसणारा भाग छिन्नीने काढून टाकायचा.
एक सरदारजी बससाठी रांगेत उभा होता. त्याचा क्रमांक चौथा होता.त्याला हवी असलेली बस आली. बस रिकामी होती बर्यापैकी. पण सरदारजी बसमधे चढला नाही. मागे सरकला. का?
-बसवर 'दो या तीन..बस्स' लिहीले होते म्हणून.
एकदा हत्ती आणि मुंगी स्कुटरवर जात असतात.
त्याचा अपघात होतो
हत्ती मरतो, पण मुंगी वाचते...
ते कसं काय?
..... कारण तिनी हेलमेट घातलेलं असतं...
केनियामध्ये पोहोण्याचा तलाव बांधला तर त्याचे नाव काय ठेवावे?
"या डुंबा डुंबा"
एकदा एक डास आणि माशी लग्न करतात. त्यांच्या लग्नाला बरेच दिवस होतात पण त्यांना काहिच मूलबाळ होत नाही. का?
.
.
.
.
.
.
कारण ती माशी 'ओडोमॉस' लावून झोपायची .
प्र. : सुईच्या नेढ्यातून हत्ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे
पळापळ करत असेल .. तर त्याला कसं थांबवायचं?
उ. : त्याच्या शेपटीला गाठ मारून !
प्र. : एक माणूस काळा शर्ट , काळी पँट , काळा टाय , काळे मोजे , काळे बूट , काळी टोपी आणि दिसायलाही काळा असा रस्त्यानी चाललेला.. समोरून एक काळी गाडी येते आणि रस्ता ओलांडताना हा माणुस त्या गाडी समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या अग्गदी जवळ येऊन ती गाडी ब्रेक मारून थांबवली जाते.. अग्गदी थोडक्यात तो वाचतो.. रस्त्यावर लाईट वगैरे लावलेले नसतात.. मग हे कसं काय होतं?
उ. : कारण तेव्हा दिवस असतो !
प्र. : एका शर्यतीत एक मुलगा १५० मिनिटातच शेवटाला येतो आणि एक मुलगा मात्र अडीऽऽऽच तासानी कुठे धपापत शेवटाला येतो. तर कोण जिंकतं?
उ : दोघंही. कारण १५० मिनिट = अडीच तास.
प्र. : एक माणूस खूपच बुटका असतो. त्याचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर असतं. तो घरून बाहेर जाताना नेहमीच लिफ्ट वापरायचा पण बाहेरून घरी जायचं म्हटलं तर त्याची गंमत असायची.. ती म्हणजे.. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तो अर्धा भाग लिफ्टनी आणि बाकीचा भाग चालत चालत जायचा.. पण पावसाळ्यात मात्र घरापर्यंत लिफ्टनी जायचा तर असं का?
उ. : त्याची उंची कमी होती .. त्यामुळे त्याला खाली उतरायच्या वेळेस तळमजल्याचं बटन दाबणं जमायचं आणि तो थेट येऊ शकायचा. पण तेच खालून वर जाताना उंचीमुले हात न पुरल्यानी त्याच्या अपेक्षित मजल्याचं बटन दाबता न आल्यानी जेवढा हात पुरेल तेवढं करून ज्या मजल्यापर्यंत जाता येईल तितकं जाऊन तो बाकीचं चालत जायचा.. पण पावसाळ्यात छत्री सोबत असल्यानी त्याला त्याच्या मजल्याचं बटन दाबता येत असल्यानी तो तिथपर्यंत लिफ्ट वापरू शकायचा ! :)
एक माणूस ( तलावात बुडताना): वाचवा, मला पोहता येत नाही; मला पोहता येत नाही.
शेजारुन चाललेला सायकलस्वार चिडतो: काय रे ए, ओरडतो कशाला ? मलाहि पोहता येत नाही, मी ओरडतोय का ?
एकदा एका सुंदर उपवर खेकडीला बघायला एक खेकडा येतो. त्यांची प्रश्नोत्तरे वगैरे होतात. खेकडा पण चांगला असतो. खेकडीला आवडतो. मग शेवटची परिक्षा म्हणून खेकडी खेकड्याला म्हणते, 'चालून दाखव.त्या खांबापर्यंत जा.' खेकडा चालून दाखवतो. अगदी सरळ नाकासमोर चालत जाऊन खांबासमोर थांबतो. खेकडीण त्याला नाकारते. का बरे???
- ती म्हणते 'हा खेकडा दारु पितो.म्हणून सरळ चालतो.' (गृहित: नेहमीची खेकड्याची चाल वाकडी असते.)
Saturday, December 02, 2006
पाडगावकर यांची एक सुंदर कविता
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?
वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !
गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !
कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !
मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !
फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !
बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !
मंगेश पाडगावकर
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?
वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !
गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !
कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !
मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !
फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !
बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !
मंगेश पाडगावकर
Thursday, October 19, 2006
Puzzle
मला फार आवडलेले एक कोडे...
समजा एका जंगलात दोन गुहा आहेत, एक आहे जीवनाची गुहा, आणि दुसरी आहे मृत्युची गुहा. दोन्ही गुहे समोर प्रत्येकी एक रक्षक उभा आहे. या रक्षकांपैकी एक जण केवळ खरेच बोलतो तर दुसरा केवळ खोटेच बोलतो. कल्पना करा की तुम्ही त्या दोघांच्या समोर उभे आहात. तर तुम्हाला त्या दोघांपैकी कुणालाही एक असा प्रश्न (दिशादर्शक)विचारायचा आहे की समोरच्याने तुम्हाला जीवनाच्याच गुहे कडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. लक्षात असु द्या त्यांच्या सवयी, खरे आणि खोटे बोलण्याच्या आणि हे सुद्धा लक्षात असु द्या की तुम्हाला याची कल्पना नाही की त्यातिल कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, पण त्या दोघांना मात्र आपसात याची कल्पना आहे की आपणांपैकी कोण खरे बोलतो आणि कोण खोटे. ...
करा विचार..
...
...
असा प्रश्न की जो दोघांपैकी कुणालाही विचारला तरी उत्तर तेच मिळेल, अर्थात जीवनाच्या गुहेकडे जाणारा मार्ग.. एकच प्रश्न...
विचार सुरु ठेवा,... हा विनोदी प्रश्न नाही हे लक्शात घ्या...
काय नाही जमत म्हणुन कसे चालेल कागद आणि पेन घ्या आणि प्रयत्न करा, ....
ज्या तत्वाच्या आधारे उत्तर येणार आहे ते आपण दहावीच्या वर्गात शिकलो आणि संगणकाच्या जगात याचा फार मोठा वापार होतो...
अजुनही नाही
प्रयत्न करा आणि उत्तर
उत्तर :
तुझ्या शेजारचा मला मृत्युची गुहा म्हणुन कुठली गुहा दाखवेल
प्रयत्न करुन पहा..
समजा एका जंगलात दोन गुहा आहेत, एक आहे जीवनाची गुहा, आणि दुसरी आहे मृत्युची गुहा. दोन्ही गुहे समोर प्रत्येकी एक रक्षक उभा आहे. या रक्षकांपैकी एक जण केवळ खरेच बोलतो तर दुसरा केवळ खोटेच बोलतो. कल्पना करा की तुम्ही त्या दोघांच्या समोर उभे आहात. तर तुम्हाला त्या दोघांपैकी कुणालाही एक असा प्रश्न (दिशादर्शक)विचारायचा आहे की समोरच्याने तुम्हाला जीवनाच्याच गुहे कडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. लक्षात असु द्या त्यांच्या सवयी, खरे आणि खोटे बोलण्याच्या आणि हे सुद्धा लक्षात असु द्या की तुम्हाला याची कल्पना नाही की त्यातिल कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, पण त्या दोघांना मात्र आपसात याची कल्पना आहे की आपणांपैकी कोण खरे बोलतो आणि कोण खोटे. ...
करा विचार..
...
...
असा प्रश्न की जो दोघांपैकी कुणालाही विचारला तरी उत्तर तेच मिळेल, अर्थात जीवनाच्या गुहेकडे जाणारा मार्ग.. एकच प्रश्न...
विचार सुरु ठेवा,... हा विनोदी प्रश्न नाही हे लक्शात घ्या...
काय नाही जमत म्हणुन कसे चालेल कागद आणि पेन घ्या आणि प्रयत्न करा, ....
ज्या तत्वाच्या आधारे उत्तर येणार आहे ते आपण दहावीच्या वर्गात शिकलो आणि संगणकाच्या जगात याचा फार मोठा वापार होतो...
अजुनही नाही
प्रयत्न करा आणि उत्तर
उत्तर :
तुझ्या शेजारचा मला मृत्युची गुहा म्हणुन कुठली गुहा दाखवेल
प्रयत्न करुन पहा..
Wednesday, October 04, 2006
प्रेरणादायी
प्रिय गुरूजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात ; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं
शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा !
धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.
माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.
माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.
….अब्राहम लिंकन
रूपांतर - वसंत बापट
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात ; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं
शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा !
धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.
माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.
माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.
….अब्राहम लिंकन
रूपांतर - वसंत बापट
Saturday, September 23, 2006
Ekaa Vaakyaat
लग्न म्हणजे असे नाते की जिथे एका व्यक्तीचे नेहमी बरोबर असते आणि दुसऱ्या व्यक्तीला 'नवरा' म्हणतात.
आमचे मांजर चिनी हस्तक आहे, अहो, सारखे 'माओ माओ' असा जप करत असते.
"शेजाऱ्यांवर प्रेम करा"*
- पण पकडले जाऊ नका.
नवरा आणि बायको म्हणजे लिव्हर आणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी कारण.............. लिव्हर खराब तर किडनी लगेच फ़ेल होते आणि किडनी फ़ेल झाली तर...............लिव्हर दुसऱ्या किडनी वर काम चालवत.........
पुरेशी झोप घेतल्याने म्हातारपण टाळत येते म्हणे... विशेषतः गाडी चालवतना.
तुकाराम महाराज म्हणून गेलेत "नावात काय आहे?"
एकदा एका लॉर्डला स्वप्न पडलं की तो हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहे आणि त्याला जाग आली तेव्हा त्याला आढळलं की आपण खरोखरच हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहोत.
१. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.
आपल्या शत्रूंना नेहमी क्षमा करा..त्याने त्यांचा तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही.
काही माणसे जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, काही जेव्हा तिथून जातात तेव्हा.
मला भितींशी बोलायला आवडतं, त्या दुरुत्तर करत नाहीत.
अनुभव हे चुकांना दिलेलं गोड गोंडस नाव आहे.
मी मोह सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.
आत्मचरित्र हा मृत्यूबद्दलची भीती आणखी वाढवणारा साहित्यप्रकार आहे...
नवरा, "लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचे?", बायको, " अशा ठिकाणी जिथे मी कधीही गेले नाही", नवरा, "स्वयंपाकघर कसे वाटते?"
हे औषध दम्यावर अगदी रामबाण उपाय! मी जन्मभर वापरतोय.
दारू म्हणजे हळू हळू मारणारं विष आहे.......
- असूदे की.... इथे घाई कोणाला आहे ?
*********************************************************************************
दोन सरदार बुध्दीबळ खेळत होते.
*********************************************************************************
'मी या घरचा स्वामी आहे' आणि असे विधान करायला माझ्या बायकोची मला परवानगी आहे.
*********************************************************************************
दोन बायका समोरासमोर गप्प बसल्या होत्या.
*********************************************************************************
शेवटी पैसा म्हणजे सर्व काही नाही .....
- व्हीसा आणि मास्टरकार्ड आहेत ना !
*********************************************************************************
जगात एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे......... थांबा हं, जरा आठवून सांगतो......
*********************************************************************************
प्राण्यांवर नेहेमी प्रेम करावं....
- किती चविष्ट असतात ते !
*********************************************************************************
९९% वकीलांच्या वागणुकीमूळे बिचारे बाकीचे वकील बदनाम होतात.
*********************************************************************************
"तुम्ही किती वाजेपर्यंत उघडे असता?" एका मध्यमवयीन स्त्रीने औषधांच्या दुकानात (पुरुष) दुकानदाराला विचारलेला प्रश्न!
*********************************************************************************
जगात यशस्वी होण्याची दोनच सोपी सूत्रं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला माहित असलेलं सारं काही दुसऱ्याला सांगू नका.
*********************************************************************************
आळस हा माणसाचा शत्रु आहे.....
पण माझे आळसावर प्रेम आहे.... का?
कारण ....
माणसाने शत्रुवरहि प्रेम करावे
*********************************************************************************
दोन बटणे असलेल्या विजारीचे एक बटण तुटल्यावर दुसऱ्या बटणावर येते ना, ती "जबाबदारी" !
[COURTSY: INTERNET]
आमचे मांजर चिनी हस्तक आहे, अहो, सारखे 'माओ माओ' असा जप करत असते.
"शेजाऱ्यांवर प्रेम करा"*
- पण पकडले जाऊ नका.
नवरा आणि बायको म्हणजे लिव्हर आणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी कारण.............. लिव्हर खराब तर किडनी लगेच फ़ेल होते आणि किडनी फ़ेल झाली तर...............लिव्हर दुसऱ्या किडनी वर काम चालवत.........
पुरेशी झोप घेतल्याने म्हातारपण टाळत येते म्हणे... विशेषतः गाडी चालवतना.
तुकाराम महाराज म्हणून गेलेत "नावात काय आहे?"
एकदा एका लॉर्डला स्वप्न पडलं की तो हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहे आणि त्याला जाग आली तेव्हा त्याला आढळलं की आपण खरोखरच हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहोत.
१. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.
आपल्या शत्रूंना नेहमी क्षमा करा..त्याने त्यांचा तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही.
काही माणसे जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, काही जेव्हा तिथून जातात तेव्हा.
मला भितींशी बोलायला आवडतं, त्या दुरुत्तर करत नाहीत.
अनुभव हे चुकांना दिलेलं गोड गोंडस नाव आहे.
मी मोह सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.
आत्मचरित्र हा मृत्यूबद्दलची भीती आणखी वाढवणारा साहित्यप्रकार आहे...
नवरा, "लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचे?", बायको, " अशा ठिकाणी जिथे मी कधीही गेले नाही", नवरा, "स्वयंपाकघर कसे वाटते?"
हे औषध दम्यावर अगदी रामबाण उपाय! मी जन्मभर वापरतोय.
दारू म्हणजे हळू हळू मारणारं विष आहे.......
- असूदे की.... इथे घाई कोणाला आहे ?
*********************************************************************************
दोन सरदार बुध्दीबळ खेळत होते.
*********************************************************************************
'मी या घरचा स्वामी आहे' आणि असे विधान करायला माझ्या बायकोची मला परवानगी आहे.
*********************************************************************************
दोन बायका समोरासमोर गप्प बसल्या होत्या.
*********************************************************************************
शेवटी पैसा म्हणजे सर्व काही नाही .....
- व्हीसा आणि मास्टरकार्ड आहेत ना !
*********************************************************************************
जगात एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे......... थांबा हं, जरा आठवून सांगतो......
*********************************************************************************
प्राण्यांवर नेहेमी प्रेम करावं....
- किती चविष्ट असतात ते !
*********************************************************************************
९९% वकीलांच्या वागणुकीमूळे बिचारे बाकीचे वकील बदनाम होतात.
*********************************************************************************
"तुम्ही किती वाजेपर्यंत उघडे असता?" एका मध्यमवयीन स्त्रीने औषधांच्या दुकानात (पुरुष) दुकानदाराला विचारलेला प्रश्न!
*********************************************************************************
जगात यशस्वी होण्याची दोनच सोपी सूत्रं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला माहित असलेलं सारं काही दुसऱ्याला सांगू नका.
*********************************************************************************
आळस हा माणसाचा शत्रु आहे.....
पण माझे आळसावर प्रेम आहे.... का?
कारण ....
माणसाने शत्रुवरहि प्रेम करावे
*********************************************************************************
दोन बटणे असलेल्या विजारीचे एक बटण तुटल्यावर दुसऱ्या बटणावर येते ना, ती "जबाबदारी" !
[COURTSY: INTERNET]
Monday, July 24, 2006
वैराटगड
२२-२३ जुलै ला हरिश्चंद्रगड करायचा असे सर्वानुमते (एकमताने नव्हे) ठरले होते, मात्र मर्फीच्या नियमाला अनुसरुन ठरवल्याप्रमाणे होउ शकले नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी तो बेत टाळावा लागला (यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण तरी सुद्धा निदान एक दिवस तरी सत्कारणी लागावा असा विचार करुन शनिवारी वैराटगडावर जाण्याचे ठरले (हे मात्र एकमताने). सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थनकावर सर्वांनी यायचे असे ठरले होते, त्याप्रमाणे आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले (येथे ताप शब्दावर श्लेष असावा का ?). मग जमलेल्या मंडळींनी वैराटगड की चंदन वंदन या मधुन वैराटगडाला पसंती दिली. आणि कर्नाटक सरकारची सातार्याला जाणारी बस पकडली. जोरदार पाउस सुरु होता, आणि वाटेत कात्रज घाटापासुनच आम्हाला निसर्गाची आमच्या वर कृपा होणार हे लक्षात आले. वाटेत तुडुंब भरुन वाहणार्या नीरा नदिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.
वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही.
गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो.
मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.
वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही.
गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो.
मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.
Thursday, June 29, 2006
मेस
'मी कारल्याची भाजी खाणार नाही'
'अरे चांगलं असतं आरोग्याला, शाळेत शिकतोस ना तु हे ' आई
'ते काही असो पण मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी खाणार नाही'
'आता करतोयस नाटकं, मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल'
शेपुट फुटण्याचा काळातला हा संवाद दिवसाआड घरा घरातुन होतच असे. शाळेतले दिवस संपुन कॉलेजची ओढ लावणार्या अनेक गोष्टींपैकी मेस हि सुद्ध एक महत्वाची गोष्ट होती. अगोदर कॉलेजच्या निमित्तने आणि नंतर नोकरीच्या निमित्तने मेस या प्रकरणाशी सातत्याने संबध येत गेला. कॉलेजला प्रवेश मिळवणे, रहाण्यासाठी रुम शोधणे वैगरे प्रकार संपले की मग शोध सुरु व्ह्यायचा चांगल्या मेस साठी. कॉलेजचं होस्टेल आणि मेस उपलब्ध असेल तरिही बरीच मंडळि बाहेरच राहणं आणि खाणं पसंत करीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रोफेसरांसमोर दिवस घालवणच जीवावर येतं त्यांच्या समोर जेवण करणं किती जीवावर येत असेल. आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस" तसेच त्यावेळी मित्र समोरासमोर भेटल्यावर विचारले जाणारे प्रश्न दोनच, कुठे जेवतोस आणि कुठे राहतोस.
मेस या गोष्टिचा खाण्याशी जरी बराच जवळचा संबध असला तरी मेस शोधतांना इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष दिल जात असे. कारण अत्यंत चांगलं जेवण देणारी मेस (एखाद दुसरा अपवाद वगळता) मिळणं अशक्य होतं. त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला मेस बदलण हा नित्याचा उपक्रम असे. त्यातुन प्रत्येक मेस ची पाटी 'आमच्याकडे घरच्या सारखे जेवण मिळेल' अशी असल्याने त्या पाटीचा उपयोग फक्त 'इथे मेस आहे' हे समजण्यापुरताच होत असे. मेस मुख्यतः तिथे मिळणार्या खाण्या पेक्षा तिच्या मालकावरुन (विशेषतः मालकिणीवरुन) ओळखली जात असते. मालकिणीवरुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे स्वयंपाकाचे खाते त्यांच्याकडेच, आणि अशा बर्याच मेस मधुन हिशेब लावण्यापासुन भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे काकुच करत, आणि काकांच काम फक्त चटई टाकणे आणि चटई उचलणे एवढेच असे.जेवण काय मिळते या पेक्षा ते कसे मिळते याकडेच सर्वांचे लक्ष जास्त. उदाहरण द्यायचे झाले तर, आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासुन बराच दुर अंतरावर एक मेस होती, या मेस मधे गर्दी होत असे ती केवळ विशिष्ठ वेळेलाच, आणि ही विशिष्ठ वेळ म्हणजे क्रिकेटची मॅच. त्या काकांना क्रिकेटची एवढी आवड होती की मॅच असलेल्या दिवशी ते आतल्या खोलीतला TV आम्ही जेवायचो त्या हॉल मधे आणुन ठेवत, त्यावेळी Mobile score वैगर फारसे प्रचलीत नसल्यामुळे काकांची ही युक्ती फार काम करत असे, कारण प्रत्येकाला जेवणाच्या quality पेक्षा मॅच महत्वाची वाटत असे. त्यामुळे अधुन मधुन कुठल्या क्रिकेटरने अतिक्रिकेट बद्दल शब्द काढला तर काकांची फार चिडचिड होत असे, कारण याच अतिक्रिकेट मुळे त्यांची मेस जोरात चालत असे.
अर्थात सगळ्याच मेस काही खराब जेवण देत नसत, मला कॉलेजच्या दुसर्या वर्षी लाभलेली एक मेस फारच उत्तम जेवण देणार्यांपैकी होती. त्या काकु अगदी अगत्याने स्वागत करुन मायेने जेवु वैगरे घालत असत. मात्र त्यांच्या याच अगत्यशीलतेचा फायदा घेउन बर्याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले आणि त्यांना मेस बंद करण्यावाचुन इलाज उरला नाही. काही काही मेस वाले तर फारच बेरकी होते, म्हणजे काय की पहिल्या दिवशी जेवयाला गेलो त्यांच्याकडे की अत्यंत उत्तम पद्धतीचे जेवण देणार, आणि चांगले जेवण मिळते म्हणुन तुम्ही पैसे भरलेत की मग त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात. त्यामुळे अशा अनेक मेस एक दोन महिन्यातुनच बदलाव्या लागत. त्या काळात weekends ची आम्ही जेव्हढी वाट पहायचो तेव्हढी आज नाही बघत, याचं मुख्य कारण म्हणजे शनिवारी घरी जायला मिळायचे. आणि घरी गेल्यावर आई ने किंवा आज्जीने जवळ घेउन 'फारच चेहरा उतरला हो आमच्या सोनुचा' एवढं म्हटलं की लगेच आपण जेवणाची ऑर्डर सोडायला मोकळे. पुढे दोन दिवस मात्र आवर्जुन आपल्या आवडत्या भाज्या बनविल्या जायच्या.
मेस मधुन दोन प्रकारांनी जेवण मिळत असे. एक म्हणजे त्यांच्याच घरी जायचे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कडुन डब्बा घेउन आपापल्या रुम वर जावुन जेवायचे. आमची सहसा पसंती दुसर्या प्रकाराला असायची, कारण सुज्ञपणाने प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी मेस लावलेली असे, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकत्र येउन त्याचा गोपाळकाला तयार होई. त्यात भर घालत आमचे स्थानीक मित्र, सर्वांनी एकत्र रहायचे या धोरणाला अनुसरुन प्रत्येक जण आपापल्या घरुन जेवणासाठी काहीतरी घेउन येत असे. मग कॉलेजचे सर्व दोस्त, वेगवेगळ्या चवीचे जेवण आणि सोबतीला गप्पा असा सामुदायीक जेवणाचा एक सोहळा साजरा होत असे. अशा अनेक सोहळ्याच्या जन्माला पुरतील एवढ्या आठवणी आहेत. दुसर्या प्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात मेसवर जावुन जेवणे हा विकल्प काही विशीष्ठ परिस्थीत निवडला जाई. या विशीष्ठ परिस्थीतीचंच एक उदाहरण सांगयच झालं तर, एकदा एका मेसकडे अचानक गर्दी वाढली आणि सर्वांनीच थेट मेस मधेच जेवणाचा आग्रह सुरु केला, पुढे जाउन याचे कारण लक्षात आले की त्याच मेसला लेडिज हॉस्टेल ची अधिकृत मेस म्हणुन मान्यता मिळाली होती. बाग, कॉलेजचे वाचनालय, वर्ग याच बरोबर मेस हे सुद्धा अनेक प्रेमिकांचे भेटण्याचे ठिकाण होते, आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.
मेसचे नियम हा तर एक फार मोठा संशोधनाचा विषय होउ शकेन. पुणेरी पाट्या आपण बर्याच ठिकाणी वाचतो, पण कुठलीही पाटी न लावता मेस मधुन नियम ठरवले जात असत. आमच्या एका मेस मधे नियम होत (आणि तो ही लिखीत) 'तुमच्या नातेवाईकांचे तुमच्यावर फारच प्रेम आहे हे आम्ही जाणतो, पण तरिही पुर्वपरवानगी शिवाय नातेवाईकांना जेवायला आणु नये'. दिवस मोजतांना होणारा गोंधळ तर फारच कॉमन होता. काही ठिकाणी एकुण जेवणावर पैसे, तर काही ठिकाणी
दिवसांप्रमाणे. काही ठिकाणि अगोदर न सांगता जेवण न केल्यास पैसे कट, तर काही ठिकानी सोबत guest आणल्यास पैसे कट. प्रत्येक रविवारी Feast नामक एक वैताग बर्याच मेस मधुन असायचा. ही Feast म्हणजे सकाळी काही तरी (म्हणजे दोन तेलकट आणी एक गोड पदार्थ) खायचे आणि संध्याकाळी मेसला सक्तीची सुट्टी. कॉलेजच्या काळात घरुन मीळणारे पुर्ण पैसे ऑडिट करुन मिळत असल्यामुळे, संध्याकाळी बाहेर जेवायला जाणे सर्वच जण टाळायचे आणि या वेळी परत मदत घेतली जायची स्थानिक मित्रांची.
काही मेस मात्र आवर्जुन लक्षात रहाव्यात अश्या, म्हणजे आपल्याकडे येणार्या विद्यार्थ्यांना आपल्या सुख दुखआत सामील करुन घेत. घरी सत्य नारायण असेल तर आवर्जुन सर्वांना जेवण देत (अर्थात पैसे न घेता), स्वयंपाक अगोदर उरकला असेल तर त्या काकु, दळण दळता दळता आपल्या लेकीच्या संसारातील अडचणी आम्हाला सांगत बसायच्या. कुणि विद्यार्थी आजरी असेल तर त्याला पथ्याचं खाण पिणं सुद्धा मिळायच त्यांच्यकडेच. शक्य तेव्हढ्या लोकांच्या आवडीनिवडी जपत भाजी ठरवली जायची. मात्र या सगळ्यात व्यावसायीकता कुठेही नसल्याने जास्त दिवस चालवणे अशक्य होउन बसे.
नोकरीच्या निमित्ताने बाहेर रहाणे होत असल्यास एखाद्या दिवशी जेवण आवडले नाही तर बाहेर जाउन जेवता येत पण कॉलेजच्या वेळी असे काही शक्य नव्हते. कॉलेजच्या आठवणित अनेक गोष्टिंचा समावेश होतो, पण मेस ही त्यातील महत्वाची आठवण. अन्न हे पुर्णब्रह्म शिकवणारी ही मेस, आईच्या हाताची चवीची खरी ओळख करुन देणारी ही मेस, घरापासुन दुर गेल्यावर झालेल्या सैरभैर मनाशी थेट नाते जोडणारी ही मेस.
आजही आठवतात जेवतांना मारलेल्या गप्पा, गोपाळकाला, काकुंनी मधेच येउन पोळीवर वाढलेलं तुप, feast , आणि हो 'फारच चेहरा उतरलाय माझ्या सोनुचा' हे वाक्य.
सुभाष डिके
'अरे चांगलं असतं आरोग्याला, शाळेत शिकतोस ना तु हे ' आई
'ते काही असो पण मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी खाणार नाही'
'आता करतोयस नाटकं, मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल'
शेपुट फुटण्याचा काळातला हा संवाद दिवसाआड घरा घरातुन होतच असे. शाळेतले दिवस संपुन कॉलेजची ओढ लावणार्या अनेक गोष्टींपैकी मेस हि सुद्ध एक महत्वाची गोष्ट होती. अगोदर कॉलेजच्या निमित्तने आणि नंतर नोकरीच्या निमित्तने मेस या प्रकरणाशी सातत्याने संबध येत गेला. कॉलेजला प्रवेश मिळवणे, रहाण्यासाठी रुम शोधणे वैगरे प्रकार संपले की मग शोध सुरु व्ह्यायचा चांगल्या मेस साठी. कॉलेजचं होस्टेल आणि मेस उपलब्ध असेल तरिही बरीच मंडळि बाहेरच राहणं आणि खाणं पसंत करीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रोफेसरांसमोर दिवस घालवणच जीवावर येतं त्यांच्या समोर जेवण करणं किती जीवावर येत असेल. आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस" तसेच त्यावेळी मित्र समोरासमोर भेटल्यावर विचारले जाणारे प्रश्न दोनच, कुठे जेवतोस आणि कुठे राहतोस.
मेस या गोष्टिचा खाण्याशी जरी बराच जवळचा संबध असला तरी मेस शोधतांना इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष दिल जात असे. कारण अत्यंत चांगलं जेवण देणारी मेस (एखाद दुसरा अपवाद वगळता) मिळणं अशक्य होतं. त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला मेस बदलण हा नित्याचा उपक्रम असे. त्यातुन प्रत्येक मेस ची पाटी 'आमच्याकडे घरच्या सारखे जेवण मिळेल' अशी असल्याने त्या पाटीचा उपयोग फक्त 'इथे मेस आहे' हे समजण्यापुरताच होत असे. मेस मुख्यतः तिथे मिळणार्या खाण्या पेक्षा तिच्या मालकावरुन (विशेषतः मालकिणीवरुन) ओळखली जात असते. मालकिणीवरुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे स्वयंपाकाचे खाते त्यांच्याकडेच, आणि अशा बर्याच मेस मधुन हिशेब लावण्यापासुन भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे काकुच करत, आणि काकांच काम फक्त चटई टाकणे आणि चटई उचलणे एवढेच असे.जेवण काय मिळते या पेक्षा ते कसे मिळते याकडेच सर्वांचे लक्ष जास्त. उदाहरण द्यायचे झाले तर, आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासुन बराच दुर अंतरावर एक मेस होती, या मेस मधे गर्दी होत असे ती केवळ विशिष्ठ वेळेलाच, आणि ही विशिष्ठ वेळ म्हणजे क्रिकेटची मॅच. त्या काकांना क्रिकेटची एवढी आवड होती की मॅच असलेल्या दिवशी ते आतल्या खोलीतला TV आम्ही जेवायचो त्या हॉल मधे आणुन ठेवत, त्यावेळी Mobile score वैगर फारसे प्रचलीत नसल्यामुळे काकांची ही युक्ती फार काम करत असे, कारण प्रत्येकाला जेवणाच्या quality पेक्षा मॅच महत्वाची वाटत असे. त्यामुळे अधुन मधुन कुठल्या क्रिकेटरने अतिक्रिकेट बद्दल शब्द काढला तर काकांची फार चिडचिड होत असे, कारण याच अतिक्रिकेट मुळे त्यांची मेस जोरात चालत असे.
अर्थात सगळ्याच मेस काही खराब जेवण देत नसत, मला कॉलेजच्या दुसर्या वर्षी लाभलेली एक मेस फारच उत्तम जेवण देणार्यांपैकी होती. त्या काकु अगदी अगत्याने स्वागत करुन मायेने जेवु वैगरे घालत असत. मात्र त्यांच्या याच अगत्यशीलतेचा फायदा घेउन बर्याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले आणि त्यांना मेस बंद करण्यावाचुन इलाज उरला नाही. काही काही मेस वाले तर फारच बेरकी होते, म्हणजे काय की पहिल्या दिवशी जेवयाला गेलो त्यांच्याकडे की अत्यंत उत्तम पद्धतीचे जेवण देणार, आणि चांगले जेवण मिळते म्हणुन तुम्ही पैसे भरलेत की मग त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात. त्यामुळे अशा अनेक मेस एक दोन महिन्यातुनच बदलाव्या लागत. त्या काळात weekends ची आम्ही जेव्हढी वाट पहायचो तेव्हढी आज नाही बघत, याचं मुख्य कारण म्हणजे शनिवारी घरी जायला मिळायचे. आणि घरी गेल्यावर आई ने किंवा आज्जीने जवळ घेउन 'फारच चेहरा उतरला हो आमच्या सोनुचा' एवढं म्हटलं की लगेच आपण जेवणाची ऑर्डर सोडायला मोकळे. पुढे दोन दिवस मात्र आवर्जुन आपल्या आवडत्या भाज्या बनविल्या जायच्या.
मेस मधुन दोन प्रकारांनी जेवण मिळत असे. एक म्हणजे त्यांच्याच घरी जायचे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कडुन डब्बा घेउन आपापल्या रुम वर जावुन जेवायचे. आमची सहसा पसंती दुसर्या प्रकाराला असायची, कारण सुज्ञपणाने प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी मेस लावलेली असे, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकत्र येउन त्याचा गोपाळकाला तयार होई. त्यात भर घालत आमचे स्थानीक मित्र, सर्वांनी एकत्र रहायचे या धोरणाला अनुसरुन प्रत्येक जण आपापल्या घरुन जेवणासाठी काहीतरी घेउन येत असे. मग कॉलेजचे सर्व दोस्त, वेगवेगळ्या चवीचे जेवण आणि सोबतीला गप्पा असा सामुदायीक जेवणाचा एक सोहळा साजरा होत असे. अशा अनेक सोहळ्याच्या जन्माला पुरतील एवढ्या आठवणी आहेत. दुसर्या प्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात मेसवर जावुन जेवणे हा विकल्प काही विशीष्ठ परिस्थीत निवडला जाई. या विशीष्ठ परिस्थीतीचंच एक उदाहरण सांगयच झालं तर, एकदा एका मेसकडे अचानक गर्दी वाढली आणि सर्वांनीच थेट मेस मधेच जेवणाचा आग्रह सुरु केला, पुढे जाउन याचे कारण लक्षात आले की त्याच मेसला लेडिज हॉस्टेल ची अधिकृत मेस म्हणुन मान्यता मिळाली होती. बाग, कॉलेजचे वाचनालय, वर्ग याच बरोबर मेस हे सुद्धा अनेक प्रेमिकांचे भेटण्याचे ठिकाण होते, आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.
मेसचे नियम हा तर एक फार मोठा संशोधनाचा विषय होउ शकेन. पुणेरी पाट्या आपण बर्याच ठिकाणी वाचतो, पण कुठलीही पाटी न लावता मेस मधुन नियम ठरवले जात असत. आमच्या एका मेस मधे नियम होत (आणि तो ही लिखीत) 'तुमच्या नातेवाईकांचे तुमच्यावर फारच प्रेम आहे हे आम्ही जाणतो, पण तरिही पुर्वपरवानगी शिवाय नातेवाईकांना जेवायला आणु नये'. दिवस मोजतांना होणारा गोंधळ तर फारच कॉमन होता. काही ठिकाणी एकुण जेवणावर पैसे, तर काही ठिकाणी
दिवसांप्रमाणे. काही ठिकाणि अगोदर न सांगता जेवण न केल्यास पैसे कट, तर काही ठिकानी सोबत guest आणल्यास पैसे कट. प्रत्येक रविवारी Feast नामक एक वैताग बर्याच मेस मधुन असायचा. ही Feast म्हणजे सकाळी काही तरी (म्हणजे दोन तेलकट आणी एक गोड पदार्थ) खायचे आणि संध्याकाळी मेसला सक्तीची सुट्टी. कॉलेजच्या काळात घरुन मीळणारे पुर्ण पैसे ऑडिट करुन मिळत असल्यामुळे, संध्याकाळी बाहेर जेवायला जाणे सर्वच जण टाळायचे आणि या वेळी परत मदत घेतली जायची स्थानिक मित्रांची.
काही मेस मात्र आवर्जुन लक्षात रहाव्यात अश्या, म्हणजे आपल्याकडे येणार्या विद्यार्थ्यांना आपल्या सुख दुखआत सामील करुन घेत. घरी सत्य नारायण असेल तर आवर्जुन सर्वांना जेवण देत (अर्थात पैसे न घेता), स्वयंपाक अगोदर उरकला असेल तर त्या काकु, दळण दळता दळता आपल्या लेकीच्या संसारातील अडचणी आम्हाला सांगत बसायच्या. कुणि विद्यार्थी आजरी असेल तर त्याला पथ्याचं खाण पिणं सुद्धा मिळायच त्यांच्यकडेच. शक्य तेव्हढ्या लोकांच्या आवडीनिवडी जपत भाजी ठरवली जायची. मात्र या सगळ्यात व्यावसायीकता कुठेही नसल्याने जास्त दिवस चालवणे अशक्य होउन बसे.
नोकरीच्या निमित्ताने बाहेर रहाणे होत असल्यास एखाद्या दिवशी जेवण आवडले नाही तर बाहेर जाउन जेवता येत पण कॉलेजच्या वेळी असे काही शक्य नव्हते. कॉलेजच्या आठवणित अनेक गोष्टिंचा समावेश होतो, पण मेस ही त्यातील महत्वाची आठवण. अन्न हे पुर्णब्रह्म शिकवणारी ही मेस, आईच्या हाताची चवीची खरी ओळख करुन देणारी ही मेस, घरापासुन दुर गेल्यावर झालेल्या सैरभैर मनाशी थेट नाते जोडणारी ही मेस.
आजही आठवतात जेवतांना मारलेल्या गप्पा, गोपाळकाला, काकुंनी मधेच येउन पोळीवर वाढलेलं तुप, feast , आणि हो 'फारच चेहरा उतरलाय माझ्या सोनुचा' हे वाक्य.
सुभाष डिके
Monday, June 26, 2006
'जादु तेरी नजर'
शनिवारी प्रशांत दामलेचं 'जादु तेरी नजर' बघण्याचा योग जुळुन आला. अगोदरच या नाटकाविषयी बरचं ऐकुन होतो, त्या सर्व अपेक्षांवर हे नाटक पुर्ण पणे उतरते. प्रशांत दामलेच्या अभिनयाच्या बाबतीत तर बोलायलाच नको, पण सर्वात जास्त पसंती मिळते ती सतीश तारे ला. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत प्रत्येक प्रवेशाला हास्याचे कल्लोळ निर्माण करतो हा माणुस. यातच प्रशांत दामलेच्या बहिणिचे काम केले आहे (त्या मुलिचे नाव लक्शात नाही आता) त्या अभिनेत्रीचे काम खुपच आवडले, प्रेमासाठी आतुर तरुणी फार सुंदर रेखाटली आहे तिने. नाटकात बरिच गाणी आहेत, एक-दोन गाणी सोडली तर बाकी सर्व गाणी संगित, शब्द आणि प्रसंग सगळ्याच बाबतीत चांगली आहेत.
खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..
खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..
Monday, June 12, 2006
पुस्तकनिष्ठांची मांदियाळी
पुस्तकनिष्ठांची मांदियाळी
नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.
१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -
माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.
३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.
२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.
३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.
४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.
५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.
अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके
१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-
एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.
या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.
शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.
नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.
१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -
माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.
३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.
२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.
३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.
४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.
५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.
अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके
१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-
एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.
या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.
शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.
Wednesday, June 07, 2006
विडंबन - कदाचीत
या विडंबनासाठीची प्रेरणा असलेली कविता 'कदाचीत' या दुव्यावर वाचावयास मिळेल
(सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्याचं मनोगत...)
कदाचित
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता
(केवळ निरिक्षणातुनच )
(सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्याचं मनोगत...)
कदाचित
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता
लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत
मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता
(केवळ निरिक्षणातुनच )
Wednesday, May 24, 2006
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
संदिप खरेच्या अनेक आवडत्या कवितांपैकी मला आवडलेली एक कविता
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो
मी जुनाट दारावरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडक्यापरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गांजवीत बसतो
तो लांघुन चौकट पार निघाया बसतो
डोळ्यात माझीया सुर्याहुन संताप
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते
घडवुन दागिने सुर्यफुलापरी झुलतो
मी पायी रुतल्या काचावरी चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडुनी बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक मोजत पुण्याची खोली
नवसांची ठेउनी लाच लावितो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन साऱ्या
अन धन्यवाद देवाचे घेउन जातो
मज अध्यात्माचा रोज नवा श्रृंगार
लपतो ना परि चेहरा आत भेसुर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरिही
त्या श्याम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो.
--- संदिप खरे..
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो
मी जुनाट दारावरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडक्यापरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गांजवीत बसतो
तो लांघुन चौकट पार निघाया बसतो
डोळ्यात माझीया सुर्याहुन संताप
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते
घडवुन दागिने सुर्यफुलापरी झुलतो
मी पायी रुतल्या काचावरी चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडुनी बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक मोजत पुण्याची खोली
नवसांची ठेउनी लाच लावितो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन साऱ्या
अन धन्यवाद देवाचे घेउन जातो
मज अध्यात्माचा रोज नवा श्रृंगार
लपतो ना परि चेहरा आत भेसुर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरिही
त्या श्याम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो.
--- संदिप खरे..
Tuesday, May 23, 2006
हरिश्चन्द्र गड,
हरिश्चन्द्र गड, मी ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर पासुन ज्या किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले होते, तो हरिश्चन्द्र गड अनुभवण्याचा योग असा अचानक जुळुन येईल असे वाटले नव्हते.
हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे.
हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला.
आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..
हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे.
हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला.
आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..
Tuesday, May 16, 2006
भारत पाकिस्तान - एक शीतयुद्ध
अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळुन आले आहे की काही दिवसांपुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे अणुयुद्धासाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. सादर आहे याच सर्व हालचालींचा लेखाजोखा खास बातमी दारांकडुन ...
पाकिस्तानी सैन्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या सरकारची परवानगीची गरज नाही, त्यामुळे लगेचच त्यांनी उलटगणतीला सुरुवात केली. इकडे भारतीय तंत्र सुधारलेले असल्यामुळे भारतीय सैन्याला आठ सेकंदाच्या आत पाकिस्तानच्या या हालचालीची माहीती मिळाली. भारतीय सैन्याने लगेचच उत्तरादाखल आपला अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली पण त्यांना यासाठी सरकारची परवानगी हवी असते त्यामुळे त्यांनी तशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली. राष्ट्रपतींनी ती मागणी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठविली. त्यावर पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनाची घोषणा केली. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा वारंवार होणारे वॉक-आउट्स आणि विरोधी पक्षाने केलेला गदारोळ यामुळे संसद अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपतींनी मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावले. तिकडे दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सैन्याने तयारी करुन ठेवलेला अणुबॉम्ब तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सोडता आला नाही. त्यांचे यासाठी प्रयत्न सुरुच राहीले..
इकडे भारतीय सरकार ज्या पक्षाच्या पाठींब्यावर होते त्यांनी बाहेरुन दिलेला पाठींबा काढुन घेतल्यामुळे अल्पमतात आले. राष्ट्रपतींनी त्यांना आठ दिवसांच्या आत विश्वासमत प्रस्ताव सिद्ध करण्यास सांगितले पण तसे न होउ शकल्यामुळे सरकार बरखास्त करण्यात आले व काळजी वाहू सरकारची स्थापना झाली. काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानांनी मात्र भारतीय सैन्याला अणुबॉम्ब साठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पण याला लगेचच निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत असे सांगत आक्षेप घेतला. त्याविरोधात मग एक जनहीत याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मात्र काळजीवाहु सरकारला असा निर्णय घेता येत असल्याचा निर्णय दिला.
तिकडे पाकिस्तानी सैन्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!. त्यांनी लगेचच पुढच्या प्रयत्नाची तयारी केली पण यावेळी नियोजीत वेळेच्या आधीच काही लष्करी अधिकाऱ्यांनी तो बॉम्ब दहशतवाद्यांना विकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पुन्हा तयारी सुरु झाली त्यांच्या पुढच्या प्रयत्ना साठी., यावेळी त्यांनी मागच्या अनुभवावरुन शहाणपण शिकुन अमेरिका किंवा चीन यांच्याकडुन बॉम्ब आणि त्याचे तंत्र घेण्याचे ठरविले.
इकडे भारतात सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर लगेचच काळजीवाहु प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय सभा बोलावली आणि यावेळी बॉम्ब टाकण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच पक्ष तयार झाले. पण सैन्यापर्यंत ती परवानगी पोहोचण्याच्या अगोदरच, मानवी हक्क आयोग आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. मानवी साखळ्या आणि रास्ता रोको सारखे हातखंडे वापरुन हा विरोध सुरु होता. याच संदर्भात कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन मधे 'Send this to every indian you know' असा विषय असणाऱ्या ई मेल ची चेन सुरु करुन विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली.
तिकडे पाकिस्तानात त्यांच्या बॉम्बने बिघडण्याचे आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे कधी वाळवंटात तर कधी अरबी समुद्रात जाउन त्यांचे बॉम्ब पडत असत. शेवटी त्यांनी अमेरिकेकडुन मिळालेला एक बॉम्ब पाठवण्याचे ठरवले, पण पाकिस्तानी सैन्य त्या बॉम्बचे तंत्र समजावुन घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी तो आहे तसाच पाठवला. पण तो अमेरिकेने बनविलेला असल्यामुळे त्याचे मुळ लक्ष 'रशिया' होत्या त्याप्रमाणे तो भारताच्या दिशेने येण्या ऐवजी रशियाच्या दिशेने गेला. रशियन सैन्याला याची अगोदरच खबर लागल्यामुळे अर्ध्यावाटेतच निकामी करण्यात ते यशस्वी झाले. पण याला उत्तर म्हणुन त्यांनी आपल्याकडील काही क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पाठवले. पाकिस्तानी सैन्याचे सगळे लक्ष भारतावर असल्यामुळे त्यांना हा प्रकार समजण्यास वेळ लागला आणि त्या बॉम्ब ने त्यांच्या राजधानीवर हमला चढवला, सर्वत्र गोंधळ माजला, पाकिस्तान ने लगेच आपल्यावर अन्याय झाला आहे अशी ओरड करुन जागतिक मदतीची मागणी केली.
भारताने यावर लगेचच आपले तीव्र दुःख व्यक्त करुन मदतीसाठी मिलियन डॉलर चे पारले जी बिस्किटे पाठवुन दिली..
अशा प्रकारे भारतीय सैन्याला कधीही परवानगी मिळाली नाही
आणि पाकिस्तानी सैन्याला कधीही व्यवस्थीत पणे आपले काम करता आले नाही.
And both lived happily everyafter!!!!
(इंटरनेट वरुन साभार)
पाकिस्तानी सैन्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या सरकारची परवानगीची गरज नाही, त्यामुळे लगेचच त्यांनी उलटगणतीला सुरुवात केली. इकडे भारतीय तंत्र सुधारलेले असल्यामुळे भारतीय सैन्याला आठ सेकंदाच्या आत पाकिस्तानच्या या हालचालीची माहीती मिळाली. भारतीय सैन्याने लगेचच उत्तरादाखल आपला अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली पण त्यांना यासाठी सरकारची परवानगी हवी असते त्यामुळे त्यांनी तशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली. राष्ट्रपतींनी ती मागणी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठविली. त्यावर पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनाची घोषणा केली. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा वारंवार होणारे वॉक-आउट्स आणि विरोधी पक्षाने केलेला गदारोळ यामुळे संसद अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपतींनी मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावले. तिकडे दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सैन्याने तयारी करुन ठेवलेला अणुबॉम्ब तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सोडता आला नाही. त्यांचे यासाठी प्रयत्न सुरुच राहीले..
इकडे भारतीय सरकार ज्या पक्षाच्या पाठींब्यावर होते त्यांनी बाहेरुन दिलेला पाठींबा काढुन घेतल्यामुळे अल्पमतात आले. राष्ट्रपतींनी त्यांना आठ दिवसांच्या आत विश्वासमत प्रस्ताव सिद्ध करण्यास सांगितले पण तसे न होउ शकल्यामुळे सरकार बरखास्त करण्यात आले व काळजी वाहू सरकारची स्थापना झाली. काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानांनी मात्र भारतीय सैन्याला अणुबॉम्ब साठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पण याला लगेचच निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत असे सांगत आक्षेप घेतला. त्याविरोधात मग एक जनहीत याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मात्र काळजीवाहु सरकारला असा निर्णय घेता येत असल्याचा निर्णय दिला.
तिकडे पाकिस्तानी सैन्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!. त्यांनी लगेचच पुढच्या प्रयत्नाची तयारी केली पण यावेळी नियोजीत वेळेच्या आधीच काही लष्करी अधिकाऱ्यांनी तो बॉम्ब दहशतवाद्यांना विकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पुन्हा तयारी सुरु झाली त्यांच्या पुढच्या प्रयत्ना साठी., यावेळी त्यांनी मागच्या अनुभवावरुन शहाणपण शिकुन अमेरिका किंवा चीन यांच्याकडुन बॉम्ब आणि त्याचे तंत्र घेण्याचे ठरविले.
इकडे भारतात सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर लगेचच काळजीवाहु प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय सभा बोलावली आणि यावेळी बॉम्ब टाकण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच पक्ष तयार झाले. पण सैन्यापर्यंत ती परवानगी पोहोचण्याच्या अगोदरच, मानवी हक्क आयोग आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. मानवी साखळ्या आणि रास्ता रोको सारखे हातखंडे वापरुन हा विरोध सुरु होता. याच संदर्भात कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन मधे 'Send this to every indian you know' असा विषय असणाऱ्या ई मेल ची चेन सुरु करुन विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली.
तिकडे पाकिस्तानात त्यांच्या बॉम्बने बिघडण्याचे आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे कधी वाळवंटात तर कधी अरबी समुद्रात जाउन त्यांचे बॉम्ब पडत असत. शेवटी त्यांनी अमेरिकेकडुन मिळालेला एक बॉम्ब पाठवण्याचे ठरवले, पण पाकिस्तानी सैन्य त्या बॉम्बचे तंत्र समजावुन घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी तो आहे तसाच पाठवला. पण तो अमेरिकेने बनविलेला असल्यामुळे त्याचे मुळ लक्ष 'रशिया' होत्या त्याप्रमाणे तो भारताच्या दिशेने येण्या ऐवजी रशियाच्या दिशेने गेला. रशियन सैन्याला याची अगोदरच खबर लागल्यामुळे अर्ध्यावाटेतच निकामी करण्यात ते यशस्वी झाले. पण याला उत्तर म्हणुन त्यांनी आपल्याकडील काही क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पाठवले. पाकिस्तानी सैन्याचे सगळे लक्ष भारतावर असल्यामुळे त्यांना हा प्रकार समजण्यास वेळ लागला आणि त्या बॉम्ब ने त्यांच्या राजधानीवर हमला चढवला, सर्वत्र गोंधळ माजला, पाकिस्तान ने लगेच आपल्यावर अन्याय झाला आहे अशी ओरड करुन जागतिक मदतीची मागणी केली.
भारताने यावर लगेचच आपले तीव्र दुःख व्यक्त करुन मदतीसाठी मिलियन डॉलर चे पारले जी बिस्किटे पाठवुन दिली..
अशा प्रकारे भारतीय सैन्याला कधीही परवानगी मिळाली नाही
आणि पाकिस्तानी सैन्याला कधीही व्यवस्थीत पणे आपले काम करता आले नाही.
And both lived happily everyafter!!!!
(इंटरनेट वरुन साभार)
Thursday, May 11, 2006
प्रभाव
Wednesday, May 10, 2006
निर्णय
निर्णय
एका शहरात राहणार्या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.
बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.
एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.
पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.
मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.
"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."
"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."
"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"
"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "
"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."
"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."
या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.
तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,
"आई, ते काका कशाला गं आले होते "
"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "
"\'ती\' "
"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "
"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"
"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "
"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "
"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "
"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"
"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "
"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "
"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..
त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....
या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...
थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....
"हॅलो, "
"मी बोलतेय.."
"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..
".. अरे काय झालं.. "
"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..
"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."
"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...
थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..
"अरे, काय झालं "
"......"
"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "
त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...
"नीट सांगशील काय झालं.."
"आई ने नकार दिला "
"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "
"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."
तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला
"मग आता काय विचार केलायस तु... "
"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."
"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..
"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."
"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."
"पण काय .."
"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..
"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..
"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."
तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.
त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.
"का नियती ला हे मंजुर नसावे " तो
"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..
... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..
आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्या होतात
दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...
सुभाष डिके
एका शहरात राहणार्या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.
बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.
एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.
पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.
मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.
"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."
"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."
"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"
"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "
"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."
"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."
या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.
तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,
"आई, ते काका कशाला गं आले होते "
"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "
"\'ती\' "
"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "
"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"
"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "
"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "
"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "
"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"
"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "
"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "
"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..
त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....
या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...
थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....
"हॅलो, "
"मी बोलतेय.."
"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..
".. अरे काय झालं.. "
"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..
"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."
"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...
थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..
"अरे, काय झालं "
"......"
"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "
त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...
"नीट सांगशील काय झालं.."
"आई ने नकार दिला "
"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "
"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."
तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला
"मग आता काय विचार केलायस तु... "
"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."
"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..
"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."
"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."
"पण काय .."
"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..
"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..
"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."
तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.
त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.
"का नियती ला हे मंजुर नसावे " तो
"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..
... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..
आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्या होतात
दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...
सुभाष डिके
Subscribe to:
Posts (Atom)




