Wednesday, April 25, 2007

विडंबन - केव्हा तरी पहाटे

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित अभिषेक-ऐश्वर्या विवाहामुळे अनेकांच्या मनात अनेक भाव दाटुन गेले. असेच काही भाव टिपण्याचा हा एक प्रयत्न . मुळ कविता या दुव्यावर बघायला मिळेल

जेव्हा घरी जयाच्या ....

(विवेक आणि सलमान) :
जेव्हा घरी जयाच्या , सजवुन कार गेली
सुजले रडुन डोळे, पलटून नार गेली ॥१॥

(सलमान :)
मारू आता कुणाला, सय दाटते कुणाची
हसवुन मिडियाला, फसवुन नार गेली ॥२॥

(सलमान विवेकला:)
जळलो तुझ्यावरी मी, उरल्या खुणा मनाशी
जळलो तुझ्यावरी मी, जळवुन नार गेली ॥३॥

(विवेक:)
फिरले क्षणात माझे, ग्रह एक त्या नभाचे
इमले स्वकल्पनाचे, उधळुन नार गेली ॥४॥

(राणी - अभिषेकशी लग्न करण्याची इच्छा अपुर्णच राहिली) :
उरली मनात आता, नशिबा कटू कहाणी
युवराज हा जयाचा, गटवुन नार गेली ॥५॥

--- सुभाष डिके (कुल)

Thursday, April 19, 2007

मी हसतो - माझ्यावर

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
*****************************************************
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
******************************************
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. रात्रीच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

Monday, April 16, 2007

ट्रेकींगच्या आठवणी (मोबाईलच्या साह्याने)

माहुलीच्या पायथ्याशी शंभुमहादेवाचे प्रसन्न देउळ


वासोट्याच्या पायथ्याशी
















माहुलीवरुन उतरतांना टळटळीत उन्हात नजरेला सुखावणारी रंगाची उधळण


















जुन्या वासोट्याच्या बाजुला असलेला बाबुकडा














माहुली - डावीकडे भंडारगड, मध्ये चंदेरी सुळका आणि उजवीकडे माहुली















खांदेरी - समुद्रात खंबीरपणे उभा असलेला
















कनकेश्वराच्या मंदिरावरिल कलाकुसर


















जंगली जयगडाहुन दिसणारी घाटातली वाट













वासोटा - नागेश्वराकडे जाणारी वाट














वासोट्याहुन परततांना













- सुभाष डिके

Thursday, April 12, 2007

अविस्मरणीय जंगली जयगड !!

खुपच सुंदर झाला हा ट्रेक. 'घनदाट' जंगल हे या ट्रेक चे वैशिष्ठ्य. प्रत्येक बाण्याच्या खुणेपाशी नजर पुढच्या खुणेचा शोध घेण्यासाठी भिरभिरत होती आणि त्याचवेळी मन त्या अनामिक गिरीप्रेमींना धन्यवाद देत होते. आणि 'त्या' माचीवरुन दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतीम, खाली दिसणारे गच्च जंगल, त्यामधुन धावणारी नागमोडी घाटातली वाट, या सगळ्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्य. इतर ट्रेक मधे कुठेतरी रस्त्याने मानवी अस्तित्वाच्या काही तरी खुणा जाणवत राहतात पण या जंगलात शिरल्यानंतर अशा काहीही खुणा दिसत नव्हत्या. काही क्षण स्तब्ध बसल्यानंतर पक्ष्यांच्या विविध आवाज मन प्रसन्न करुन टाकते. स्वतः चे अस्तित्व विसरायला लावण्याचे कसब या परिसरात नक्कीच आहे. वसंतगडावरचे पक्षीदर्शन, चाफळच्या राममंदीरातील प्रसन्न वातावरण, तिकडे मनसोक्त अनुभवलेल्या पक्ष्यांच्या लीला, आणि रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' , किती किती लिहावे काय काय आठवावे. हे सगळे सगळे दिर्घकाळ स्मरणात राहणार यात शंका नाही.. जयगडाच्या संदर्भातील एक लिन्क http://www.wikimapia.org/#y=17454951&x=73698939&z=17&l=0&m=a&v=2 उजविकडे दुरवर पसरलेले जंगल सगळे काही सांगुन जाईल .. सुभाष(कुल)

Thursday, March 22, 2007

वासोटा (व्याघ्रगड)

घनदाट या शब्दाचा पुरेपुर अर्थ कळतो वासोट्याला गेल्यावर. गच्च भरलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करतांना निसर्गाच्या कमालीचा अनेक वेळा प्रत्यय येत होता. आंबोळगीची चव अजुनाही तोंडावर रेंगाळते आहे.

ट्रेकर्सची पंढरी, इतरांना सर येईल काय
'भयाण' रस्ता तरिही, ओढीने चालती पाय
'घनदाट' जंगल अन पाण्यातुन प्रवास
याची साठी केला होता हा अट्टहास

नितळ पाणी ओढ्याचे, मारुती मार्गदर्शक
मनोहर विश्रांतीस्थळ अन बाबुकड्याचा धाक
उंच उंच झाडी, अन रानफुलांचा सुवास
याची साठी केला होता हा अट्टहास

मन झाले सैरभैर, कंठ आला दाटुन
असावीस तू आसपास, क्षणभर गेले वाटुन
इथे मी अन तिथे तू, मन होई उदास
याची साठी केला होता हा अट्टहास

Subhash Dike (सुभाष डिके)

Friday, March 09, 2007

आनंदाचा रम्य सोहळा

बऱ्याच दिवसापासुन कुठलाही ट्रेक झाला नव्हता, पावसाळ्यानंतर हिवाळा पुर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे होळीला चंद्रग्रहणाच्या रात्री सुधागडाला ट्रेक करायचा आहे, हे ऐकुनच मन प्रसन्न झाले. शब्दात लिहिता येणार नाही एवढा आनंद या ट्रेकने दिला. दुरवर पसरलेल्या गावांमधुन दिसणारी होळी, स्वच्छ चंद्रप्रकाश. चंद्र तर एवढा मोहक दिसत होता की, कुणालाही कविता सुचावी. एवढे अप्रतिम दर्शन देणारा चंद्र डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चंद्रग्रहणाचा दिड तास तर एक एक क्षण जपुन ठेवावा असाच होता. सर्वत्र पसरलेला प्रकाश, सुधागडावरील माळरान, सोबतीला गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज, मधुनच एखाद्या टिटवीनं ओरडुन जाणं, अशात हळुहळु चंद्रग्रहणाला सुरुवात, सपाट धरणीवर आडवे होउन आम्ही दुर्बिणीतुन त्या निसर्गाच्या चमत्काराचा आस्वाद घेतोय. आज लिहितांना सुद्धा अंगावर काटा येतोय, असे खुप कमी क्षण जगायला मिळतात. रोजच्या घाई गडबडीत आपण या सर्व स्वर्गीय गोष्टींना विसरुनच जातो, आणि अशा शांत वेळी निसर्गच आपल्याला हाताला धरुन त्याचा आस्वाद घ्यायला शिकवतो. संपुर्ण चंद्रग्रहण लागल्यावर, आकाश ताऱ्यांनी भरुन गेले होते. एरवी फार कमी वेळेला दिसणारे ताऱ्यांनी आभाळ गच्च भरले होते.

दिड दोन तास त्या मोहक वातावरणात काढल्याने ट्रेक सार्थ झाल्या सारखे वाटत होते, पण दुसऱा दिवस तर बोनस ठरला. सुंदर आणि प्रसन्न सकाळी, चवदार पोह्यांचा आस्वाद घययला मिळाला. त्यानंतर चोरदरवाजा ते महादरवाजा अशी गडाची सफर. त्यातच समोर आपल्या विशिष्ट आकारासहीत मस्त दर्शन देणारा तेलबैला आणि दुरवर पसरलेली सह्याद्रिची रांग. याच रांगेवरुन सह्याद्रीचे महाराष्ट्रभुमीवर किती विशाल छत्र आहे याची कल्पना येउन जाते आणि याच सह्याद्रिच्या कुशीत आपला जन्म झाल्याबद्दल अभिमानाने उर भरुन येतो, उन्हात डोळ्यांना सुखावणारी सुधागडावरची झाडे. सुधागडावरची झाडे फारच डौलदार आहेत, दोन्ही बाजुला प्रशस्त पसरलेली असतात. कडक उन्हातुन गेल्यानंतर अशी झाडे काय आनंद देत असतील हे अनुभवच सांगु शकेल. बोलत्या कडावरुन येणारा प्रतिध्वनी विचार करायला लावतोच. मग त्याच बोलत्याकड्यावरुन खड्या आवाजात गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार मारलेली आरोळी अजुनही कानात घुमत नसली तरच नवल. सुखाचे एवढे सगळे सोहळे एकत्र अनुभवुन आलो आणि पुढच्या अनेक दिवसांसाठी दैनंदिन व्यवहारातील संकटाना समोर जाण्याचे उंदड बळ मिळाले.
कुणालाही संधी मिळाल्यास कधीही सोडु नका असा हा ट्रेक.

Tuesday, February 20, 2007

आस्वाद

कुसुमाग्रजांच्या कविता - आस्वाद घेण्यासाठी

अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालोफ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्तचित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्रफ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !


पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू
तुझ्या मीकितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासेन
ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी
अन्मलाज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

Tuesday, January 16, 2007

पुरंदर दुर्गभ्रमण

नेहमीप्रमाणे या रविवारी सुद्धा कुठेतरी दुर्गभ्रमणासाठी जायचे असे ठरवले होते. इतर सर्व मंडळी आपापल्या कामात खुपच व्यस्त असल्यामुळे या वेळी सुद्धा एकट्याने जावे लागेल असे लक्षात आले आणि पुन्हा एकदा जी.एस. चा सल्ला घेतला आणि पुरंदरला जावे असे ठरवले. सकाळी उन जास्त होण्याच्या अगोदर सुरुवात करावी असा विचार करुन पाच वाजता लोणावळ्यातुन निघण्याचा विचार होता पण दुर्दैवाने अगदी धावत पळत जाउन सुद्धा पाच वाजताची लोकल चुकली मग नाईलाजाने सहा वाजता सुरुवात करावी लागली. पुण्यातुन पुरंदरला जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे पुण्यातुन दिवे घाट मार्गे सासवडला यावे आणि तिकडुन सासवड - नारायणपुर गाडी मिळवुन नारायणपुरला पोहोचावे. नारायणपुर हे पुरंदराच्या पायथ्याचे गाव, तेथील दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातुन थेट नारायणपुरला जाण्यासाठी सुद्धा गाडी मिळते. पुरंदरासाठी दुसरा मार्ग म्हणजे पुणे बंगलोर हायवे वर कापुरहोळ नावाच्या गावात पोहोचावे, आणि तिकडुन नारायणपुरला येण्यासाठी गाडी पकडावी. मी पुण्यात पोहोचल्यानंतर सासवड मार्गे नारायणपुरला पोहोचलो. मी पोहोचलो तेंव्हा साधारण दहा वाजले होते. नारायणपुरमधुन पुरंदरला जाण्यासाठी एक मोठा रस्ता मिळतो. हा वळवळणाचा रस्ता थेट आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी घेउन जातो. या रस्त्याने गाडी घेउन सुद्धा जाता येते. मी मात्र गावातुन जाणारा दुसरा एक छोटा रस्ता निवडला होता. हा रस्ता जंगलातुन जातो आणि थेट दरवाजा जवळ गावातुन येणार्या रस्त्याला जावुन मिळतो. या रस्त्याने गेल्यास अवघ्या पाउण तासात बिनिदरवाजावर पोहोचता येते. मी या रस्त्यावरुन निघालो. गावातुन निघुन पुढे अर्धा रस्ता संपेपर्यंत उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता. मागच्या वेळच्या अनुभवावरुन मी एकदम तयारी करुन गेलो होतो त्यामुळे उन्हापासुन चांगले संरक्षण झाले. पुढे मात्र दाट झाडी लागली, कडक उन्हातुन छान सावलीत आल्यानंतर खुप बरं वाटलं त्यामुळे पहिल्याच झाडाच्या सावली बराच वेळ बसलो. आता दरवाजा जवळच वर दिसत होता. झपाझप चालत जाउन दरवाजा गाठला, मागे वळुन बघितल्यावर दुरुन नारायणपुर मधुन येणारा वळणावळणाचा रस्ता दिसत होता. मधल्या रस्त्याने आल्यामुळे माझा वेळ आणि श्रम दोन्ही वाचल्याचं लक्षात आले.

आता समोर बिनि दरवाजा दिसत होता. दरवाजातुन आत गेल्याबरोबर डाव्या बाजुला एक छान जुने चर्च दिसले. उजव्या बाजुला थोडेसे मागे आल्यानंतर मुरारबाजीचा लढाईच्या आवेशातील पुतळा दिसला. पुतळ्याकडे बघुन खरोखर अंगावर रोमांच उभे राहतात. दोन सैनिक त्या पुतळ्याच्या आजुबाजुला आधुनिक चित्रकलांचे नमुने स्वच्छ करण्याचं काम करत होते. पुन्हा चर्चजवळ येउन पुढे निघालो. तेवढ्यात तिकडे आलेल्या एका कुटुंबाकडे माझे लक्ष गेले. त्या काकांनी लगेचच मला कुठुन आलास, एकटाच का आलास वैगरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग चला बरोबरच जाउ असा विचार त्यांनी मांडला, सोबत मिळते आहे हे लक्षात घेउन मी सुद्धा होकार दिला. पुढे गेल्यावर उजव्या बाजुला पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची बांधणी खुपच सुबक अशी आहे, आणि परिसरातील भरगच्च झाडांनी एकुणच शोभा वाढलेली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यावर त्या सोबत आलेल्या काकांबरोबर झालेल्या चर्चेतुन त्यांची ओळख झाली आणि त्यांची सोबत लाभलेचा मला खुपच आनंद झाला. कारण ते स्वतः एका माध्यमिक शाळेत शिक्षक असुन १९८२ सालापासुन नियमीत दुर्गभ्रमण करत आहेत. एकट्याने, कुटुंबाबरोबर, ग्रुपबरोबर अश्या सर्वप्रकारांनी त्यांनी किल्याच्या भ्रमंती केलेली आहे. आजवर त्यांनी अनेक किल्ले अनेक वेळेला बघितले होते. राजगड, रायगड हे किल्ले तर सर्व मोसमात, सर्व वेळात, सर्व बाजुंनी असे पुर्ण केलेले आहेत. स्वतः शिवाजी चरित्रावर अभ्यास करत असुन, याच विषयावर त्यांनी व्याख्यान सुद्धा केलेली आहेत, त्याच बरोबर आध्यात्मिक प्रवचन सुद्धा करतात. या वेळी पुरंदरवर येण्याची सातवी - आठवी वेळ होती आणि प्रयोजन म्हणजे आपल्या कन्येचा अठरावा वाढदिवस इतिहासाच्या साक्षीने साजरा करण्यासाठी त्यांनी ही पुरंदरवारी केली होती. विशेष म्हणजे त्यांचं पुर्ण कुटूंबीय सुद्धा अगदी उत्साहात त्यांच्या सोबत आलेले दिसत होते. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचं मला विशेष कौतुक वाटलं आणि अशा माणसाची संगत मिळणे म्हणजे पर्वणीच. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पुरंदरेश्वराच्या उजव्या बाजुने एक वाट थेट बालेकिल्ल्यावर घेउन जाते. त्या वाटेने चालत थोड्याच वेळात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे, आणि वळण घेतल्यावर लगेचच दिल्ली दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अगदी समोर बुरुजात एक मारुतीची मुर्ती आहे. वर गेल्यावरोबर दिल्ली दरवाजात बसुन काकांच्या खणखणीत आवाजात शिवचरित्रातील काही भाग ऐकणे हा पुर्ण दिवसातील परमोच्च भाग होता. तिकडुन पुढे निघाल्यावर अत्यंत उत्साहात पुरंदराची कथा सांगत होते. त्यांच्या इतर ट्रेक च्या आठवणी, वैद्य सर नावाचे त्यांचे सहकारी यांच्या आठवणी, अनेक किल्ल्यांवर आलेले अनुभव या सर्व गोष्टी अगदी तन्मयतेने सांगत होते. दिल्ली दरवाजातुन पुढे गेल्यावर सरळ केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. मी एकटा असतो तर कदाचित याच वाटेने गेलो असतो, पण काका मला खाली केदार दरवाजा बघुन येउ असा आग्रह करत तिकडे घेउन गेले.

तटबंदिच्या बाजुने जात आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. वाटेत आम्हाला सातारा येथुन आलेला 'रानवाटा' नावाचा पंधरा वीस जणांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्याशी सुद्धा काकांची ओळख होती. पुढे चालत जाउन आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. दरवाजा एकेकाळी बंद करुन ठेवल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजुने माती ढासळलेली होती. केदार दरवाजा मधुन बाहेर निघुन बघितले. समोर एक सुंदर पठार दिसत होते. पुर्ण पुरंदराच्या बाजुने जीप जाईल एवढी मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे, मिलिटरीच्या ताब्यात पुरंदर असतांना या सर्व व्यवस्था केल्याचं कळलं. मग पुन्हा केदारेश्वराच्या मंदिराकडे निघालो. केदारेश्वराच्या मंदिराकडे जातांना काही पायया लागतात. त्या चढुन जातांना तुला पांडवांच्या स्वर्गारोहणाचा अनुभव येईल असं मला काकांनी सांगितलं, त्याचा मला काही अर्थ कळला नाही. मात्र त्या पायर्या चालु लागताच मला त्याचा अर्थ कळून आला. पाययाच्या दोन्ही बाजुने उंच भिंती आहेत त्यामुळे त्यांच्यामधुन चालतांना दोन्ही बाजुचे काहिही दिसत नाही, आणि समोर सुद्धा काही दिसत नाही वर फक्त आकाश दिसते. त्यांची ही उपमा मला खुपच आवडली. केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. हे पुरंदरावरील सर्वोच्च ठिकाण आहे. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजुला गेल्याबरोबर समोर सिंहगड, राजगड, आणि तोरणा अगदी चटकन ओळखु येत होते. पुरंदराचा शेंदरया बुरुज, खंदकडा हा सर्व भाग दिसत होता. हे सर्व बघितल्यानंतर मंदिराच्या सावलीतच जेवणाला सुरुवात केली. एवढा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यामुळे मला वेगळे जेवण करु देणे शक्यच नव्हते. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडुन निघालो. आता पुन्हा दिल्ली दरवाजा जवळ आल्याबरोबर परत राजगादी बघण्यासाठी मागे निघालो. राजगादी ही जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. तिकडे पोहोचल्यावर मात्र थोडासा भ्रमनिरास झाला आणि वाईट सुद्धा वाटलं. छत्रपतींच्या प्रथम पुत्र, स्वराज्याचे युवराज, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्मस्थळाची ही अवस्था. आज तिकडे फक्त तटबंदी शिल्लक आहे. तिकडुन माघारी फिरल्यानंतर पुन्हा दिल्ली दरवाजावर पोहोचलो. आता बालेकिल्ला उतरुन निघायला सुरुवात केली. खाली उतरल्यावर वज्रगडावर जाण्याची अत्यंत इच्छा होती पण वेळ शिल्लक नसल्याने आता माघारी परतावे लागणार होते. मग परत आम्ही बीनी दरवाजावर पोहोचलो. परत एकदा मुरारबाजीचा पुतळा बघितला आणि दरवाजातुन मागे परतायला सुरुवात केली. संपुर्ण दिवस अगदी मनासारखा गेल्याने उतरतांना खुप समाधान जाणवत होते. पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिर आणि शिवमंदिर बघितले. मग पुण्याकडे जाण्याअगोदर जवळच असलेल्या बालाजीचं दर्शन घेतले आणि संध्याकाळी पुण्यात येउन पोहोचलो. संपुर्ण दिवसभराच्या श्रमाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. आणखी एक रविवार अतिव आनंद आणि समाधान देउन संपत होता.

Tuesday, January 02, 2007

विडंबन: अजुन तरी

सर्व वाचकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे.

मुळ कविता :

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर

आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर

अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर

मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी

कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी

अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी

मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी

रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी

सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी

अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते

वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते

कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते

मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...



विडंबन:

(आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न)

अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर

त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर

अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर

शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती

कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती

मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती

सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥

दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर

कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर

वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर

निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा'

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥

मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय

तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय

मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय

जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा



---- सुभाष डिके (कुल)

Tuesday, December 26, 2006

सिद्धगड

सिद्धगडाचा ट्रेक , पुढील काही फोटोमधुन गडाचं आणि गडाकडे जाणाऱ्या वाटांचं सौंदर्य वर्णन करण्यास पुरेसे आहेत...


केवळ सौंदर्य शब्दच नाहीत वर्णन करायला !!!!



वाटेवरुन दिसणारा गोरखगड

मागे परततांनाची रम्य संध्याकाळ

Tuesday, December 12, 2006

काही तुकडे

हत्तीची मूर्ती कशी बनवायची?
-सोपं आहे.. दगड घेउन त्यातला हत्तीसारखा न दिसणारा भाग छिन्नीने काढून टाकायचा.

एक सरदारजी बससाठी रांगेत उभा होता. त्याचा क्रमांक चौथा होता.त्याला हवी असलेली बस आली. बस रिकामी होती बर्‍यापैकी. पण सरदारजी बसमधे चढला नाही. मागे सरकला. का?
-बसवर 'दो या तीन..बस्स' लिहीले होते म्हणून.


एकदा हत्ती आणि मुंगी स्कुटरवर जात असतात.
त्याचा अपघात होतो
हत्ती मरतो, पण मुंगी वाचते...
ते कसं काय?
..... कारण तिनी हेलमेट घातलेलं असतं...



केनियामध्ये पोहोण्याचा तलाव बांधला तर त्याचे नाव काय ठेवावे?
"या डुंबा डुंबा"



एकदा एक डास आणि माशी लग्न करतात. त्यांच्या लग्नाला बरेच दिवस होतात पण त्यांना काहिच मूलबाळ होत नाही. का?

.

.

.

.

.

.

कारण ती माशी 'ओडोमॉस' लावून झोपायची .



प्र. : सुईच्या नेढ्यातून हत्ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे
पळापळ करत असेल .. तर त्याला कसं थांबवायचं?
उ. : त्याच्या शेपटीला गाठ मारून !

प्र. : एक माणूस काळा शर्ट , काळी पँट , काळा टाय , काळे मोजे , काळे बूट , काळी टोपी आणि दिसायलाही काळा असा रस्त्यानी चाललेला.. समोरून एक काळी गाडी येते आणि रस्ता ओलांडताना हा माणुस त्या गाडी समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या अग्गदी जवळ येऊन ती गाडी ब्रेक मारून थांबवली जाते.. अग्गदी थोडक्यात तो वाचतो.. रस्त्यावर लाईट वगैरे लावलेले नसतात.. मग हे कसं काय होतं?
उ. : कारण तेव्हा दिवस असतो !

प्र. : एका शर्यतीत एक मुलगा १५० मिनिटातच शेवटाला येतो आणि एक मुलगा मात्र अडीऽऽऽच तासानी कुठे धपापत शेवटाला येतो. तर कोण जिंकतं?
उ : दोघंही. कारण १५० मिनिट = अडीच तास.

प्र. : एक माणूस खूपच बुटका असतो. त्याचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर असतं. तो घरून बाहेर जाताना नेहमीच लिफ्ट वापरायचा पण बाहेरून घरी जायचं म्हटलं तर त्याची गंमत असायची.. ती म्हणजे.. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तो अर्धा भाग लिफ्टनी आणि बाकीचा भाग चालत चालत जायचा.. पण पावसाळ्यात मात्र घरापर्यंत लिफ्टनी जायचा तर असं का?
उ. : त्याची उंची कमी होती .. त्यामुळे त्याला खाली उतरायच्या वेळेस तळमजल्याचं बटन दाबणं जमायचं आणि तो थेट येऊ शकायचा. पण तेच खालून वर जाताना उंचीमुले हात न पुरल्यानी त्याच्या अपेक्षित मजल्याचं बटन दाबता न आल्यानी जेवढा हात पुरेल तेवढं करून ज्या मजल्यापर्यंत जाता येईल तितकं जाऊन तो बाकीचं चालत जायचा.. पण पावसाळ्यात छत्री सोबत असल्यानी त्याला त्याच्या मजल्याचं बटन दाबता येत असल्यानी तो तिथपर्यंत लिफ्ट वापरू शकायचा ! :)




एक माणूस ( तलावात बुडताना): वाचवा, मला पोहता येत नाही; मला पोहता येत नाही.

शेजारुन चाललेला सायकलस्वार चिडतो: काय रे ए, ओरडतो कशाला ? मलाहि पोहता येत नाही, मी ओरडतोय का ?



एकदा एका सुंदर उपवर खेकडीला बघायला एक खेकडा येतो. त्यांची प्रश्नोत्तरे वगैरे होतात. खेकडा पण चांगला असतो. खेकडीला आवडतो. मग शेवटची परिक्षा म्हणून खेकडी खेकड्याला म्हणते, 'चालून दाखव.त्या खांबापर्यंत जा.' खेकडा चालून दाखवतो. अगदी सरळ नाकासमोर चालत जाऊन खांबासमोर थांबतो. खेकडीण त्याला नाकारते. का बरे???
- ती म्हणते 'हा खेकडा दारु पितो.म्हणून सरळ चालतो.' (गृहित: नेहमीची खेकड्याची चाल वाकडी असते.)

Saturday, December 02, 2006

पाडगावकर यांची एक सुंदर कविता

दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !

मंगेश पाडगावकर

Thursday, October 19, 2006

Puzzle

मला फार आवडलेले एक कोडे...

समजा एका जंगलात दोन गुहा आहेत, एक आहे जीवनाची गुहा, आणि दुसरी आहे मृत्युची गुहा. दोन्ही गुहे समोर प्रत्येकी एक रक्षक उभा आहे. या रक्षकांपैकी एक जण केवळ खरेच बोलतो तर दुसरा केवळ खोटेच बोलतो. कल्पना करा की तुम्ही त्या दोघांच्या समोर उभे आहात. तर तुम्हाला त्या दोघांपैकी कुणालाही एक असा प्रश्न (दिशादर्शक)विचारायचा आहे की समोरच्याने तुम्हाला जीवनाच्याच गुहे कडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. लक्षात असु द्या त्यांच्या सवयी, खरे आणि खोटे बोलण्याच्या आणि हे सुद्धा लक्षात असु द्या की तुम्हाला याची कल्पना नाही की त्यातिल कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, पण त्या दोघांना मात्र आपसात याची कल्पना आहे की आपणांपैकी कोण खरे बोलतो आणि कोण खोटे. ...

करा विचार..

...

...
असा प्रश्न की जो दोघांपैकी कुणालाही विचारला तरी उत्तर तेच मिळेल, अर्थात जीवनाच्या गुहेकडे जाणारा मार्ग.. एकच प्रश्न...


विचार सुरु ठेवा,... हा विनोदी प्रश्न नाही हे लक्शात घ्या...




काय नाही जमत म्हणुन कसे चालेल कागद आणि पेन घ्या आणि प्रयत्न करा, ....


ज्या तत्वाच्या आधारे उत्तर येणार आहे ते आपण दहावीच्या वर्गात शिकलो आणि संगणकाच्या जगात याचा फार मोठा वापार होतो...


अजुनही नाही

प्रयत्न करा आणि उत्तर










उत्तर :

तुझ्या शेजारचा मला मृत्युची गुहा म्हणुन कुठली गुहा दाखवेल

प्रयत्न करुन पहा..

Wednesday, October 04, 2006

प्रेरणादायी

प्रिय गुरूजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात ; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.

माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.

त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.

माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.

….अब्राहम लिंकन
रूपांतर - वसंत बापट

Saturday, September 23, 2006

Ekaa Vaakyaat

लग्न म्हणजे असे नाते की जिथे एका व्यक्तीचे नेहमी बरोबर असते आणि दुसऱ्या व्यक्तीला 'नवरा' म्हणतात.

आमचे मांजर चिनी हस्तक आहे, अहो, सारखे 'माओ माओ' असा जप करत असते.
"शेजाऱ्यांवर प्रेम करा"*
- पण पकडले जाऊ नका.

नवरा आणि बायको म्हणजे लिव्हर आणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी कारण.............. लिव्हर खराब तर किडनी लगेच फ़ेल होते आणि किडनी फ़ेल झाली तर...............लिव्हर दुसऱ्या किडनी वर काम चालवत.........

पुरेशी झोप घेतल्याने म्हातारपण टाळत येते म्हणे... विशेषतः गाडी चालवतना.
तुकाराम महाराज म्हणून गेलेत "नावात काय आहे?"

एकदा एका लॉर्डला स्वप्न पडलं की तो हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहे आणि त्याला जाग आली तेव्हा त्याला आढळलं की आपण खरोखरच हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये भाषण देत आहोत.

१. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.

आपल्या शत्रूंना नेहमी क्षमा करा..त्याने त्यांचा तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही.
काही माणसे जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, काही जेव्हा तिथून जातात तेव्हा.
मला भितींशी बोलायला आवडतं, त्या दुरुत्तर करत नाहीत.
अनुभव हे चुकांना दिलेलं गोड गोंडस नाव आहे.
मी मोह सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.
आत्मचरित्र हा मृत्यूबद्दलची भीती आणखी वाढवणारा साहित्यप्रकार आहे...

नवरा, "लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचे?", बायको, " अशा ठिकाणी जिथे मी कधीही गेले नाही", नवरा, "स्वयंपाकघर कसे वाटते?"

हे औषध दम्यावर अगदी रामबाण उपाय! मी जन्मभर वापरतोय.


दारू म्हणजे हळू हळू मारणारं विष आहे.......

- असूदे की.... इथे घाई कोणाला आहे ?

*********************************************************************************

दोन सरदार बुध्दीबळ खेळत होते.


*********************************************************************************

'मी या घरचा स्वामी आहे' आणि असे विधान करायला माझ्या बायकोची मला परवानगी आहे.

*********************************************************************************
दोन बायका समोरासमोर गप्प बसल्या होत्या.

*********************************************************************************

शेवटी पैसा म्हणजे सर्व काही नाही .....


- व्हीसा आणि मास्टरकार्ड आहेत ना !
*********************************************************************************
जगात एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे......... थांबा हं, जरा आठवून सांगतो......
*********************************************************************************

प्राण्यांवर नेहेमी प्रेम करावं....


- किती चविष्ट असतात ते !
*********************************************************************************
९९% वकीलांच्या वागणुकीमूळे बिचारे बाकीचे वकील बदनाम होतात.
*********************************************************************************
"तुम्ही किती वाजेपर्यंत उघडे असता?" एका मध्यमवयीन स्त्रीने औषधांच्या दुकानात (पुरुष) दुकानदाराला विचारलेला प्रश्न!
*********************************************************************************
जगात यशस्वी होण्याची दोनच सोपी सूत्रं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला माहित असलेलं सारं काही दुसऱ्याला सांगू नका.
*********************************************************************************
आळस हा माणसाचा शत्रु आहे.....

पण माझे आळसावर प्रेम आहे.... का?

कारण ....

माणसाने शत्रुवरहि प्रेम करावे

*********************************************************************************

दोन बटणे असलेल्या विजारीचे एक बटण तुटल्यावर दुसऱ्या बटणावर येते ना, ती "जबाबदारी" !



[COURTSY: INTERNET]

Monday, July 24, 2006

वैराटगड

२२-२३ जुलै ला हरिश्चंद्रगड करायचा असे सर्वानुमते (एकमताने नव्हे) ठरले होते, मात्र मर्फीच्या नियमाला अनुसरुन ठरवल्याप्रमाणे होउ शकले नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी तो बेत टाळावा लागला (यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण तरी सुद्धा निदान एक दिवस तरी सत्कारणी लागावा असा विचार करुन शनिवारी वैराटगडावर जाण्याचे ठरले (हे मात्र एकमताने). सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थनकावर सर्वांनी यायचे असे ठरले होते, त्याप्रमाणे आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले (येथे ताप शब्दावर श्लेष असावा का ?). मग जमलेल्या मंडळींनी वैराटगड की चंदन वंदन या मधुन वैराटगडाला पसंती दिली. आणि कर्नाटक सरकारची सातार्‍याला जाणारी बस पकडली. जोरदार पाउस सुरु होता, आणि वाटेत कात्रज घाटापासुनच आम्हाला निसर्गाची आमच्या वर कृपा होणार हे लक्षात आले. वाटेत तुडुंब भरुन वाहणार्‍या नीरा नदिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.

वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्‍या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्‍यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्‍या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्‍याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्‍या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही.

गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्‍यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो.

मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.

Thursday, June 29, 2006

मेस

'मी कारल्याची भाजी खाणार नाही'
'अरे चांगलं असतं आरोग्याला, शाळेत शिकतोस ना तु हे ' आई
'ते काही असो पण मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी खाणार नाही'
'आता करतोयस नाटकं, मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल'

शेपुट फुटण्याचा काळातला हा संवाद दिवसाआड घरा घरातुन होतच असे. शाळेतले दिवस संपुन कॉलेजची ओढ लावणार्‍या अनेक गोष्टींपैकी मेस हि सुद्ध एक महत्वाची गोष्ट होती. अगोदर कॉलेजच्या निमित्तने आणि नंतर नोकरीच्या निमित्तने मेस या प्रकरणाशी सातत्याने संबध येत गेला. कॉलेजला प्रवेश मिळवणे, रहाण्यासाठी रुम शोधणे वैगरे प्रकार संपले की मग शोध सुरु व्ह्यायचा चांगल्या मेस साठी. कॉलेजचं होस्टेल आणि मेस उपलब्ध असेल तरिही बरीच मंडळि बाहेरच राहणं आणि खाणं पसंत करीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रोफेसरांसमोर दिवस घालवणच जीवावर येतं त्यांच्या समोर जेवण करणं किती जीवावर येत असेल. आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस" तसेच त्यावेळी मित्र समोरासमोर भेटल्यावर विचारले जाणारे प्रश्न दोनच, कुठे जेवतोस आणि कुठे राहतोस.

मेस या गोष्टिचा खाण्याशी जरी बराच जवळचा संबध असला तरी मेस शोधतांना इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष दिल जात असे. कारण अत्यंत चांगलं जेवण देणारी मेस (एखाद दुसरा अपवाद वगळता) मिळणं अशक्य होतं. त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला मेस बदलण हा नित्याचा उपक्रम असे. त्यातुन प्रत्येक मेस ची पाटी 'आमच्याकडे घरच्या सारखे जेवण मिळेल' अशी असल्याने त्या पाटीचा उपयोग फक्त 'इथे मेस आहे' हे समजण्यापुरताच होत असे. मेस मुख्यतः तिथे मिळणार्‍या खाण्या पेक्षा तिच्या मालकावरुन (विशेषतः मालकिणीवरुन) ओळखली जात असते. मालकिणीवरुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे स्वयंपाकाचे खाते त्यांच्याकडेच, आणि अशा बर्‍याच मेस मधुन हिशेब लावण्यापासुन भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे काकुच करत, आणि काकांच काम फक्त चटई टाकणे आणि चटई उचलणे एवढेच असे.जेवण काय मिळते या पेक्षा ते कसे मिळते याकडेच सर्वांचे लक्ष जास्त. उदाहरण द्यायचे झाले तर, आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासुन बराच दुर अंतरावर एक मेस होती, या मेस मधे गर्दी होत असे ती केवळ विशिष्ठ वेळेलाच, आणि ही विशिष्ठ वेळ म्हणजे क्रिकेटची मॅच. त्या काकांना क्रिकेटची एवढी आवड होती की मॅच असलेल्या दिवशी ते आतल्या खोलीतला TV आम्ही जेवायचो त्या हॉल मधे आणुन ठेवत, त्यावेळी Mobile score वैगर फारसे प्रचलीत नसल्यामुळे काकांची ही युक्ती फार काम करत असे, कारण प्रत्येकाला जेवणाच्या quality पेक्षा मॅच महत्वाची वाटत असे. त्यामुळे अधुन मधुन कुठल्या क्रिकेटरने अतिक्रिकेट बद्दल शब्द काढला तर काकांची फार चिडचिड होत असे, कारण याच अतिक्रिकेट मुळे त्यांची मेस जोरात चालत असे.

अर्थात सगळ्याच मेस काही खराब जेवण देत नसत, मला कॉलेजच्या दुसर्‍या वर्षी लाभलेली एक मेस फारच उत्तम जेवण देणार्‍यांपैकी होती. त्या काकु अगदी अगत्याने स्वागत करुन मायेने जेवु वैगरे घालत असत. मात्र त्यांच्या याच अगत्यशीलतेचा फायदा घेउन बर्‍याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले आणि त्यांना मेस बंद करण्यावाचुन इलाज उरला नाही. काही काही मेस वाले तर फारच बेरकी होते, म्हणजे काय की पहिल्या दिवशी जेवयाला गेलो त्यांच्याकडे की अत्यंत उत्तम पद्धतीचे जेवण देणार, आणि चांगले जेवण मिळते म्हणुन तुम्ही पैसे भरलेत की मग त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात. त्यामुळे अशा अनेक मेस एक दोन महिन्यातुनच बदलाव्या लागत. त्या काळात weekends ची आम्ही जेव्हढी वाट पहायचो तेव्हढी आज नाही बघत, याचं मुख्य कारण म्हणजे शनिवारी घरी जायला मिळायचे. आणि घरी गेल्यावर आई ने किंवा आज्जीने जवळ घेउन 'फारच चेहरा उतरला हो आमच्या सोनुचा' एवढं म्हटलं की लगेच आपण जेवणाची ऑर्डर सोडायला मोकळे. पुढे दोन दिवस मात्र आवर्जुन आपल्या आवडत्या भाज्या बनविल्या जायच्या.

मेस मधुन दोन प्रकारांनी जेवण मिळत असे. एक म्हणजे त्यांच्याच घरी जायचे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कडुन डब्बा घेउन आपापल्या रुम वर जावुन जेवायचे. आमची सहसा पसंती दुसर्‍या प्रकाराला असायची, कारण सुज्ञपणाने प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी मेस लावलेली असे, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकत्र येउन त्याचा गोपाळकाला तयार होई. त्यात भर घालत आमचे स्थानीक मित्र, सर्वांनी एकत्र रहायचे या धोरणाला अनुसरुन प्रत्येक जण आपापल्या घरुन जेवणासाठी काहीतरी घेउन येत असे. मग कॉलेजचे सर्व दोस्त, वेगवेगळ्या चवीचे जेवण आणि सोबतीला गप्पा असा सामुदायीक जेवणाचा एक सोहळा साजरा होत असे. अशा अनेक सोहळ्याच्या जन्माला पुरतील एवढ्या आठवणी आहेत. दुसर्‍या प्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात मेसवर जावुन जेवणे हा विकल्प काही विशीष्ठ परिस्थीत निवडला जाई. या विशीष्ठ परिस्थीतीचंच एक उदाहरण सांगयच झालं तर, एकदा एका मेसकडे अचानक गर्दी वाढली आणि सर्वांनीच थेट मेस मधेच जेवणाचा आग्रह सुरु केला, पुढे जाउन याचे कारण लक्षात आले की त्याच मेसला लेडिज हॉस्टेल ची अधिकृत मेस म्हणुन मान्यता मिळाली होती. बाग, कॉलेजचे वाचनालय, वर्ग याच बरोबर मेस हे सुद्धा अनेक प्रेमिकांचे भेटण्याचे ठिकाण होते, आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.

मेसचे नियम हा तर एक फार मोठा संशोधनाचा विषय होउ शकेन. पुणेरी पाट्या आपण बर्‍याच ठिकाणी वाचतो, पण कुठलीही पाटी न लावता मेस मधुन नियम ठरवले जात असत. आमच्या एका मेस मधे नियम होत (आणि तो ही लिखीत) 'तुमच्या नातेवाईकांचे तुमच्यावर फारच प्रेम आहे हे आम्ही जाणतो, पण तरिही पुर्वपरवानगी शिवाय नातेवाईकांना जेवायला आणु नये'. दिवस मोजतांना होणारा गोंधळ तर फारच कॉमन होता. काही ठिकाणी एकुण जेवणावर पैसे, तर काही ठिकाणी
दिवसांप्रमाणे. काही ठिकाणि अगोदर न सांगता जेवण न केल्यास पैसे कट, तर काही ठिकानी सोबत guest आणल्यास पैसे कट. प्रत्येक रविवारी Feast नामक एक वैताग बर्‍याच मेस मधुन असायचा. ही Feast म्हणजे सकाळी काही तरी (म्हणजे दोन तेलकट आणी एक गोड पदार्थ) खायचे आणि संध्याकाळी मेसला सक्तीची सुट्टी. कॉलेजच्या काळात घरुन मीळणारे पुर्ण पैसे ऑडिट करुन मिळत असल्यामुळे, संध्याकाळी बाहेर जेवायला जाणे सर्वच जण टाळायचे आणि या वेळी परत मदत घेतली जायची स्थानिक मित्रांची.

काही मेस मात्र आवर्जुन लक्षात रहाव्यात अश्या, म्हणजे आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या सुख दुखआत सामील करुन घेत. घरी सत्य नारायण असेल तर आवर्जुन सर्वांना जेवण देत (अर्थात पैसे न घेता), स्वयंपाक अगोदर उरकला असेल तर त्या काकु, दळण दळता दळता आपल्या लेकीच्या संसारातील अडचणी आम्हाला सांगत बसायच्या. कुणि विद्यार्थी आजरी असेल तर त्याला पथ्याचं खाण पिणं सुद्धा मिळायच त्यांच्यकडेच. शक्य तेव्हढ्या लोकांच्या आवडीनिवडी जपत भाजी ठरवली जायची. मात्र या सगळ्यात व्यावसायीकता कुठेही नसल्याने जास्त दिवस चालवणे अशक्य होउन बसे.

नोकरीच्या निमित्ताने बाहेर रहाणे होत असल्यास एखाद्या दिवशी जेवण आवडले नाही तर बाहेर जाउन जेवता येत पण कॉलेजच्या वेळी असे काही शक्य नव्हते. कॉलेजच्या आठवणित अनेक गोष्टिंचा समावेश होतो, पण मेस ही त्यातील महत्वाची आठवण. अन्न हे पुर्णब्रह्म शिकवणारी ही मेस, आईच्या हाताची चवीची खरी ओळख करुन देणारी ही मेस, घरापासुन दुर गेल्यावर झालेल्या सैरभैर मनाशी थेट नाते जोडणारी ही मेस.

आजही आठवतात जेवतांना मारलेल्या गप्पा, गोपाळकाला, काकुंनी मधेच येउन पोळीवर वाढलेलं तुप, feast , आणि हो 'फारच चेहरा उतरलाय माझ्या सोनुचा' हे वाक्य.

सुभाष डिके

Monday, June 26, 2006

'जादु तेरी नजर'

शनिवारी प्रशांत दामलेचं 'जादु तेरी नजर' बघण्याचा योग जुळुन आला. अगोदरच या नाटकाविषयी बरचं ऐकुन होतो, त्या सर्व अपेक्षांवर हे नाटक पुर्ण पणे उतरते. प्रशांत दामलेच्या अभिनयाच्या बाबतीत तर बोलायलाच नको, पण सर्वात जास्त पसंती मिळते ती सतीश तारे ला. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत प्रत्येक प्रवेशाला हास्याचे कल्लोळ निर्माण करतो हा माणुस. यातच प्रशांत दामलेच्या बहिणिचे काम केले आहे (त्या मुलिचे नाव लक्शात नाही आता) त्या अभिनेत्रीचे काम खुपच आवडले, प्रेमासाठी आतुर तरुणी फार सुंदर रेखाटली आहे तिने. नाटकात बरिच गाणी आहेत, एक-दोन गाणी सोडली तर बाकी सर्व गाणी संगित, शब्द आणि प्रसंग सगळ्याच बाबतीत चांगली आहेत.

खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..

Monday, June 12, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.

१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -

माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.

२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.

३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.

४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.

५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके

१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-

एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.

या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.

शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.

Wednesday, June 07, 2006

विडंबन - कदाचीत

या विडंबनासाठीची प्रेरणा असलेली कविता 'कदाचीत' या दुव्यावर वाचावयास मिळेल
(सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्‍याचं मनोगत...)

कदाचित

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता


(केवळ निरिक्षणातुनच )