Saturday, October 18, 2008

माझा बाप मरतो तेंव्हा ...

ही कविता सकाळच्या मुक्तपीठ या पुरवणीत प्रसिद्ध झाली असुन ती ईसकाळ वर http://esakal.com/esakal/10212008/MUKTAPITHED14349D32.htm या ठिकाणी वाचता येईल


माझा बाप मरतो तेंव्हा ...
सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून

सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥

माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात

म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥

पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,

म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥

साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,

विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥

मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,

त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥

मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती

म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥

साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"

हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥

सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,

बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥

पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,

म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥

मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?

तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥

मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,

किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥

गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,

तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥

शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान

म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥

मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता

रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥

तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,

मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥

निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश

घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥

लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं

"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..

-- सुभाष डिके

8 comments:

Unknown said...

its really too good.... vachatanech dolyat pani aale...good..keep it up

Sumukh said...

Apratim kavya.............

Unknown said...

It's too good.
We don't know that yor are good poem...
Kavy spardhana pathvun de....
Keep it up!

Rushikesh Shinde said...

खुप छान लिहिले आहे, सद्य परीस्थीतीचा खुप सखोल अभ्यास करून कविता लीहीलेली दिसते
Very well written, Keep writting !!!

छोटा डॉन said...

Apratim ...
Ekadam jabaradast aahe kavitaa, manapasun lihaleli aahe tyaamule jaastach baavate ...

Lihit raha asech manapsun ...

Rishi said...

Excellent blog Subhash... Just visited all your posts... Great work!

Debu's Blog said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

तानाजीराव जाधव - चिंचणीकर said...

"माझा बाप मरतो तेंव्हा ..." hi kavita
सांगली येथून प्रसिद्ध होणार्या "साहित्य प्रतिष्ठा" या दिवाळी अंकात प्रसिद्ध keli tar chalel ka?.