Wednesday, April 25, 2007

विडंबन - केव्हा तरी पहाटे

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित अभिषेक-ऐश्वर्या विवाहामुळे अनेकांच्या मनात अनेक भाव दाटुन गेले. असेच काही भाव टिपण्याचा हा एक प्रयत्न . मुळ कविता या दुव्यावर बघायला मिळेल

जेव्हा घरी जयाच्या ....

(विवेक आणि सलमान) :
जेव्हा घरी जयाच्या , सजवुन कार गेली
सुजले रडुन डोळे, पलटून नार गेली ॥१॥

(सलमान :)
मारू आता कुणाला, सय दाटते कुणाची
हसवुन मिडियाला, फसवुन नार गेली ॥२॥

(सलमान विवेकला:)
जळलो तुझ्यावरी मी, उरल्या खुणा मनाशी
जळलो तुझ्यावरी मी, जळवुन नार गेली ॥३॥

(विवेक:)
फिरले क्षणात माझे, ग्रह एक त्या नभाचे
इमले स्वकल्पनाचे, उधळुन नार गेली ॥४॥

(राणी - अभिषेकशी लग्न करण्याची इच्छा अपुर्णच राहिली) :
उरली मनात आता, नशिबा कटू कहाणी
युवराज हा जयाचा, गटवुन नार गेली ॥५॥

--- सुभाष डिके (कुल)

No comments: