Tuesday, May 02, 2006

इक्बाल - एक चित्रपट एक संदेश

बऱ्याच दिवसांपुर्वी एका मित्राने 'इक्बाल' जरुर पहा असा मेसेज पाठविला होता. त्यानंतर सुद्धा अनेकांकडुन तशीच शिफारस झाल्याने चित्रपट पहाणे आवश्यक होते., म्हणुन काल सुट्टीत वेळात वेळ काढुन चित्रपट पाहिला, आणि एवढी उत्तम कलाकृती बघण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागला म्हणुन वाईट वाटले.

दोनच तासाच्या चित्रपटात 'इक्बाल' तुम्हाला खुर्चीला खिळवुन ठेवतो आणि चित्रपट गृहातुन बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनतर एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसते. Bollywood चा नेहमीचा एकही फॉर्म्युला (सासु सुन, संपत्तीचे झगडे, दहशतवाद, मारधाड, निव्वळ गोड प्रेमकथा) न वापरता सुद्धा चांगला चित्रपट निर्माण करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'इक्बाल'.
'इक्बाल' - एका छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुकबधीर मुलगा. आपल्या आईकडुन गर्भातुनच क्रिकेटविषयीचे प्रेम घेउन आलेला. वडिल घराच्या अडीअडचणी मुळे त्रासलेले, साहजिकच त्यांची इच्छा की त्यांच्या मुलाने शेतीत हातभर लावावा अशी. पण क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या 'इक्बाल'ला ते मंजुर नाही. आपल्या बहिणीच्या साह्याने गावात सुरु असलेल्या academy च्या बाहेर दुर उभा राहुन academy च्या शिक्षकांकडुन शिकण्याचा प्रयत्न करतो. नंतर बहिण त्याअअ academy मधे प्रवेश मिळवुन देते, पण काही कारणाने त्याला academy सोडुन जावे लागते, मग नसिरुद्दीन शहा कडुन शिकायचे असे 'इक्बाल' ठरवतो, पण नसिरुद्दीन शहा त्याला तयार नसतो, मग मह्त्प्रयत्नाने 'इक्बाल' आणि त्याची बहीन त्याला तयार करतात. पुढे वडिलांचा नकार आडवा येतो तेंव्हा रात्रीचा दिवस करुन 'इक्बाल' तयारी करतो, रणजी team मधे निवड होण्यासाठी 'राजकारण' मधे येते पण तरिही त्याची निवड होते, पुढे Indian team मधे निवड होण्याची वेळ येते, मग नेमके काय होते हे तर चित्रपटातच पाहण्यासारखे.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर श्रेयस तळपदे ने संधिचे सोने केलेयं. एकही शब्द न बोलता संपुर्ण चित्रपटावर तो एक छाप सोडुन जातो. आनंदाचे आणि जबरदस्त इच्छाशक्ती दाखविण्याच्या प्रत्येक प्रसंगात त्याच्या चेहऱ्यावरिल हावभाव एवढे नैसर्गिक आहेत, त्याचे डोळे एवढे बोलके दिसतात की हा मुकबधीर आहे की नाही असा प्रश्न पडावा. श्वेता प्रसाद चे तर करावे तेवढे कौतुन थोडे आहे, समोर नसिरुद्दीन शहा सारखा अभिनेता असतांना सुद्धा तिच्या अभिनयातुन कुठेही नवखेपणा जाणवत नाही. शाब्बास श्वेता.. नसिरुद्दीन शहा आणि गिरिश कर्नाड यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यास मी असमर्थ आहे, त्यांच्या नावाचा उल्लेखच सर्व काही वर्णन करण्यास समर्थ आहे. प्रतिक्षा लोणकर ने साकारलेली आई आणि यतीन ने साकारलेला असहाय्य बाप हे सुद्धा तेवढ्याच तोडीचे आहेत. नागेश चं दिग्दर्शन याविषयी तर लिहावं तेवढ थोडं आहे, साध्या साध्या आणि छोट्या प्रसंगातुन संपुर्ण चित्रपट पुर्ण करत जाण हे त्याचं वैशिष्ट्य. चित्रपटाचं संगित आणि विशेषतः KK ने गायलेलं 'आशायें' हे गाणं एवढं सुंदर आहे की तुमच्या मनातील निराशा दुर करण्याचं सामर्थ्य त्यामधे नक्कीच आहे.

पण चित्रपट पाहणे व त्याची प्रशंसा करणे यावरच 'इक्बाल' संपत नाही. 'इक्बाल' च्या निमित्ताने अनेक गोष्टी आपण शिकु शकतो. आपल्या जीवनात काहीतरी करुन दाखविण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते पण 'इक्बाल' बघतांना या इच्छापुर्ती साठी घ्यावे लागणारे कष्ट किति आणि कसे असावेत याचे धडे आपल्याला मिळत जातात. बोलता व ऐकता येत नाही तरिही मनात जोपासलेल्या स्वप्नपुर्ती साठी अथक परिश्रम करण्याची तयारी 'इक्बाल' दाखवतो. एवढेच नव्हे तर आपल्या गुरुला सुद्धा तयार करण्यासाठी तो मागे पुढे पहात नाही. वडिल शेतावर जाण्यासाठी सांगतात तेंव्हा दिवसा शेतावर आणि रात्री मैदानावर जाण्याची तयारी तो दाखवतो. यशाच्या जवळ पोहोचत असतांना मोहाचे काही क्षण त्याला आपल्या लक्षापासुन दुर बोलावतात पण ध्येय समोर दिसत असतांना इतर कशालाही गौण मानुन केवळ आणी केवळ ध्येयाकडेच पाहण्याची शिकवण 'इक्बाल' आपल्याला देतो.
'इक्बाल' मधील सुंदर गाणे पुढे देत आहे

आशायें आशायें आशायें
कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास
हर कोशिश मे हो बार बार, करे दरियाओंको आर पार ..
तुफानोको चीर के , मंजिलो को छीन ले ॥१॥
आशायें खिले दिलकी, उम्मीदे हसे दिलकी
अब मुश्किल नही कुछ भी, अब मुश्किल नही कुछ भी ॥धृ॥
उड जाये लेके खुशी अपने संग तुझको वहा
जन्नत से मुलाकात हो पुरी हो तेरी हर दुआ ॥२॥
गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाइशोसे बात बात
लेकर सुरज से आग आग, गाए जा अपना राग राग
कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा ॥३॥


--------------
निराशा झटकुन उठा, आपल्या ध्येयावर नजर ठेवा, तयारी असु द्या अफाट परिश्रम करण्याची, ढवळुन निघण्याची तरच कळेल चव यशाची. स्वतःला झोकुन द्या, आणि मग बघा यशाच्या शिखरावरुन दिसणारं सुंदर दृश्य
सुभाष डिके

No comments: