Wednesday, May 03, 2006

यादे याद आती है

लोणावळ्याहुन पुण्याला आलो त्याला काल एक महिना पुर्ण झाले. गेली अडीच वर्षे मी नोकरीच्या निमित्ताने लोणावळ्याला काढली. कालच एका मित्राने मला प्रश्न केला "काय रे कसे वाटतेय?, What do you miss ".. या प्रश्नावर खरं म्हणजे मी विचारच केला नव्हता. आणि जसं जसा मी विचार करु लागलो तसतश्या अनेक गोष्टी माझ्या नजरे समोरुन तरळुन गेल्या.

नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपण ज्या कुठल्या गावात रहात असतो त्या गावाशी तिथल्या अनेक गोष्टींशी आपला ऋणानुबंध राहणे साहजिकच आहे. लोणावळ्याची आठवण झाली आणि सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर आला तो तिथला पाउस... लोणावळ्याला Join करण्यापुर्वी खरं म्हणजे मनात खुप हुरहुर होती तिथल्या वातावरणाबाबत आणि एकंदरितच निसर्गाबाबत. पण अगदी पहील्या दिवसापासुन तर पुढे अडीच वर्षे याचा निर्सगाने मला वेळोवेळी साथ दिली. मी Office join केले होते ऐन जुलै महिन्यात आणि अगदी त्याच दिवशी आलेल्या जोरदार पावसामुळे मी खरं म्हणजे वैतागलो होतो, अर्थात त्याच माझा दोष नव्हताच म्हणा. कारण एवढा मुसळधार पाउस मी कधी अनुभवलाच नव्हता. पण पुढे जसजसा मी रुळु लागलो तस तसं या पावसाशी माझी जवळीक वाढायला लागली. आमच्या ऑफिस ला जाण्यासाठी सुमारे २५ किमी लांबीचा आणि ४५ मिनिटे प्रवासाचा एक अत्यंत सुंदर असा घाटातला मार्ग होता. या मार्गावर अनेक वळणावर हा निसर्गराजा आपल्या वेगवेगळ्या रुपाने दर्शन देत असे. कुठे कोसळणारा धबधबा, तर कुठे घनदाट धुके, दुरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि अशा रस्त्यावरुन रोज ऑफिसला जायचे असल्यामुळे सकाळी सकाळी मनाला एक नवा तजेला मिळत असे आणि संध्याकाळी दिवसभराच्या कामाचा सगळा शीण घालवण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यामधे होतं. ऑफिस मधुन सुद्धा एका हातात कॉफीचा कप आणि खिडकीतुन बाहेर दिसणारे पावसाचे प्रताप असा दुहेरी मिलाफ साजरा होत असे. पावसाळ्यात आम्ही ऑफिसमधील ए. सी. चालु करणे शक्यतो टाळत असु कारण बाहेरुन येणारी ताजी स्वच्छ हवा आम्हाला जास्त सुखावत असे. अशा वातावरणात काम करण्यात एक निराळीच मजा असे, कधीही ताणतणावाचे प्रसंग आले की ऑफिस मधुन बाहेर निघावं आणि समोर दिसणाऱ्या पावसाकडे बघत रहावं. काहीच क्षणात आपण आत्ता खुप चिडलो होतो, किंवा चिंतेत होतो हे सांगुन सुद्धा खरं वाटायचं नाही. अशा या पावसात भिजण्याची मजा तर आणखी निराळी. पुण्या मुंबई हून सुट्टी च्या दिवशी अनेक लोक त्या पावसात भिजण्यासाठी येत असतं. अर्थात त्यांच्या भिजण्याला धांगडधिंग्याचचं स्वरुप असे. पण तरिहि अशा भाउगर्दीतुन दुरजाउन एखाद्या वळणावर उतरावं आणि या पावसाचा आनंद घ्यावा. माझ्या घराच्या खिडकीतुन दुरवरचा एक छोटासा धबधबा अगदी स्पष्ट दिसत असे. तो धबधबा आणी त्याच खिडकीमधुन दिसणारा पौर्णिमेचा चंद्र या भांडवला वर मी त्या घरात जवळपास एक वर्ष एकट्याने काढु शकलो. याच पावसाशी निगडीत अशा अनेक वैयक्तीक आठवणी सुद्धा आहेत आणि हा पाउस आठवता आठवाता त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळुन जातो. आता नोकरीच्या निमित्ताने लोणावळा सोडावं लागलं आणि पुण्यात यावं लागलं , पण आजही डोळे मिटले की पटकन डोळ्यासमोर तो पाउस, तो रस्ता, तो धबधबा दिसत रहातो आणि मन चिंब होउन जातं त्या आठवणींनी.... I miss all the fun..


लोणावळ्यापासुन दुर राहतांना अजुन एक गोष्ट मी खुप miss करतो ती म्हणजे मुंबईचे FM Radio Channels आणि विशेषतः Radio Jokies. मी जेंव्हा लोणावळ्याला रहायला आलो तेंव्हा विविधभारती आणि पुणे आकाशवाणी यांच्या पलीकडे तिसरे Radio Channel मला ठाउक नव्हते. पण लोणावळ्याला मुंबईमधुन प्रसारीत होणाऱ्या सर्व वाहीन्या अगदी स्पष्ट ऐकु येत असत, अगदी Love at first sight म्हणतात ना तसा प्रकार झाला. जुलै २००३ साली जेंव्हा मी join झालो त्यावेळी Win ९४.६ नावाचे एक Radio Channel होते. त्यावर सकाळी ५.०० वाजता अंजली पाटिल यांनी सादर केलेला एक मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागत असे. नितांत सुंदर अशी गाणी अगदी पहाटे पहाटे ऐकायला मिळत असे, त्यातुन अंजली पाटील यांचं निवेदन तर दुधात साखरचं.. त्यांचा आवाज ऐकत दिवस सुरु होत असे.. पुढे लगेचच ७.०० वाजता 'मलिष्का' येत असे, आणि मग पुढे तिच्या चटपटीत कार्यक्रमांना सुरुवात होत असे. याच वाहिनीवर अनुराग पांडे सुद्धा एक कार्यक्रम सादर करत असे. पुढे पुरेसे पैसे न जमवु शकल्यामुळे ती वाहिनी बंद झाली.. मलिष्का आणी अनुराग पांडे यांनी ९३.५ Red FM मधे प्रवेश केला पण अंजली पाटील कुठे गेल्या ठावुक नाही, I miss her... मुंबईतुन सध्या (म्हणजे मी लोणावळा सोडेपर्यंत तरी) ९१.० रेडिओ सिटी, ९२.५ गोल्ड एफ एम, ९३.५ ऱेड एफ एम, ९८.३ रेडिओ मिरची, १००.१ एफ एम गोल्ड, आणी १०७.० एफ एम रेनबो असे अनेक channel लागत असे. प्रत्येकाची एक एक खासियत असे. सकाळी ७.०० वाजता मलिष्का, आणि रेडिओ सिटी वर सिंपली प्राची यांचा कार्यक्रम सुरु होत असे आणि मला दोघीही आवडत असल्यामूळे आलटुन पालटुन ऐकावं लागत असे. मला गाण्यापेक्षा त्यांच्या आवाजातील गोडवा जास्त सुखावत असे. पुढे दहा वाजता रेडिओ सखा अश्विन किंवा लावण्या येत असतं, त्यानंतर दिवाना नंबर 1 to infinity अनिरुद्ध,, आत्त्त्ता सुद्धा एक एक नाव त्यांचा आवाज आठवण करुन देत आहे.. I miss them all,.....

1 comment:

A said...

Never had a chance to visit Lonavla...but now feel that I should take out time and visit this lovely place...seems like a hopelessly romantic place :)